शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा परिसरातल्या सावल्या हरवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:21 IST

अमर पाटील: कळंबा : एकीकडे झाडे लावण्यासाठी सरकार जनजागृती करत असले तरी दुसरीकडे कळंबा परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी ...

अमर पाटील:

कळंबा : एकीकडे झाडे लावण्यासाठी सरकार जनजागृती करत असले तरी दुसरीकडे कळंबा परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी चक्क झाडांवरच कुऱ्हाड चालवून अधिकाऱ्यांनी आपल्याच मोहिमेला हरताळ फासला आहे. रस्त्याच्या कामासाठी या परिसरातील अनेक डेरेदार वृक्षांचा बळी घेत सरकारी धोरणांनी या परिसरातील सावल्या हिरावून घेतल्या आहेत. संभाजीनगर ते कळंबा, संभाजीनगर ते सायबर चौक, आपटेनगर नाका ते क्रशर चौक, क्रशर चौक ते तांबट कमान, फुलेवाडी जकात नाका ते जावळाचा गणपती चौक, असे साठ फुटी रस्ते रुंदीकरण करून विकसित करण्यात आले. तर नगरोत्थान योजनेअंतर्गत साई मंदिर कळंबा ते आपटेनगर चौक, फुलेवाडी रिंगरोड ते आपटेनगर चौक, क्रशर चौक ते शालिनी पॅलेस, तुळजाभवानी कॉलनी ते साळोखेनगर हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल, देवकर पाणंद ते साळोखेनगर रस्ते विकसित करण्यात आले. हे रस्ते विकसित करताना रस्त्याकडेच्या महाकाय वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील सावली हरविली आहे. रस्ते विकास होत असताना वृक्षतोडीला विरोध नसला तरी पर्यावरण समतोल राखण्यासाठी नवीन झाडे लावून जगविणे क्रमप्राप्त आहे. मात्र, संबंधित प्रशासनाचे याप्रश्नी अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने उपनगरांतील या भागांत सावल्या गायब झाल्या आहेत. रस्ते विकसित करताना झाडे तोडली तर नवीन झाडे लावून ती संवर्धित करणे निविदाधारक कंपनीस बंधनकारक असते. पण याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने हे रस्ते झाडांविना सुनेसुने झाले आहेत. काही ठिकाणी झाडे लावण्यात आली असली तरी ती जगविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.

चौकट : वृक्ष संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने तापमान वाढीने उपनगरे आज हिट आयलँड बनत आहेत.

उपनगरात अस्ताव्यस्त वाढणाऱ्या नागरिकरणात अपार्टमेंट घरे बांधताना, अंतर्गत रस्ते विकसित करताना बेसुमार वृक्षतोड होत आहे. किमान घनदाट सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपण, संवर्धन व जतन व्हावे ही मागणी सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरत आहे.

कोट

: रस्ते विकसित करताना झाडे तोडली खरी पण नव्याने वनसंपदा निर्माण करण्याचा प्रशासनास विसर पडला. रस्त्याकडेस झाडेच दुर्मीळ झाल्याने ऐन उन्हाळ्यात विसाव्यासाठी जागाच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने घनदाट सावली देणारी झाडे लावून संवर्धित करावी.

-पल्लवी सोमनाथ बोळाइकर

फोटो १८ कळंबा वृक्ष : ओळ साळोखेनगर ते देवकर पाणंद मुख्य रस्ताच झाडांविना पोरका दिसत आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सावलीच दुर्मीळ झाली आहे.