शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

ओथंबलेले शब्द..भारावलेले सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:48 IST

कोल्हापूर : एखादा अधिकारी आपल्या कार्यपद्धती, आचरण, वक्तृत्वाच्या आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आंतरिक तळमळीच्या जोरावर किती आदर्शवत ठरू शकतो, याचा अनुभव मंगळवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहाने घेतला. निमित्त होते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या निरोप समारंभाचे.देशमुख ३१ जुलै रोजी स्वेच्छानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने निरोप ...

कोल्हापूर : एखादा अधिकारी आपल्या कार्यपद्धती, आचरण, वक्तृत्वाच्या आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आंतरिक तळमळीच्या जोरावर किती आदर्शवत ठरू शकतो, याचा अनुभव मंगळवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहाने घेतला. निमित्त होते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या निरोप समारंभाचे.देशमुख ३१ जुलै रोजी स्वेच्छानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने निरोप देण्यात आला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.देशमुख यांच्या कार्याचा गौरव करताना अध्यक्षा महाडिक म्हणाल्या, आज निरोप देताना शब्द सापडत नाहीत, अशी माझी अवस्था झाली आहे. अनेक ग्रामसेवक तुमच्या हाताखाली शिकल्याचा अभिमान व्यक्त करीत आहेत. त्यांना निवृत्तीनिमित्त निरोप देत असताना त्यांची कार्यसंस्कृती आपल्यामध्ये रुजविण्याची खरी गरज आहे.भाजपचे गटनेते अरुण इंगवले म्हणाले, वाईटपणा घेण्याची सगळी कामे आम्ही देशमुख यांच्याकडे दिली; परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करून जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविला. पाणी व स्वच्छता विभागांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे म्हणाल्या, देशमुख यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारल्यानंतर त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी शासकीय अधिकारी झाले. कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यामध्ये देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा भावना जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी व्यक्त केल्या.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी प्रास्ताविक केले. मुख्य वित्त व लेखा अधिकारी संजय राजमाने, डॉ. एस. एच. शिंदे, धनंजय जाधव यांनीही भावना व्यक्त केल्या.सत्काराला उत्तर देताना देशमुख म्हणाले मी अधिकारी आहे, यापेक्षा मी माणूस आहे, ही वृत्ती मी नेहमीच जागी ठेवली. घराघरांत विधायकतेचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी मला काम करायचं आहे. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. सभापती अंबरीश घाटगे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला सभापती वंदना मगदूम, सर्जेराव पाटील-पेरीडकर, विजय भोजे यांच्यासह विभागप्रमुख सुषमा देसाई, तुषार बुरुड, चंद्रकांत सूर्यवंशी, मारुती बसर्गेकर, सोमनाथ रसाळ, संजय अवघडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.अंगारमळा पुस्तकामुळे निवृत्तीचा निश्चयशेतकऱ्यांचे नेते आणि पहिल्यांदा शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारकांच्या भवितव्याविषयी सखोल मांडणी करणाºया शरद जोशी यांच्या ‘अंगारमळा’ या पुस्तकामुळे माझा स्वेच्छानिवृत्तीचा निश्चय पक्का झाल्याचे देशमुख म्हणाले. श्रीलंकेतील महालांना जर हनुमान भुलला असता तर सीतेची सोडवणूक झाली नसती. त्याचप्रमाणे शेतकºयांच्या पोरांनी अधिकारी व्हावे, शहरात जावे; परंतु तिथल्या वातावरण भुलू नये. आपल्या गावाकडे परत जाऊन तिथला उद्धार करावा, ही भूमिका शरद जोशी यांनी मांडली; म्हणूनच माझा हा निर्णय पक्का झाला.आता तुम्ही ‘कमळ’ फुलवा!देशमुख यांना रोखण्याचा अधिकार जर मला असता तर त्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेतून मी जाऊच दिले नसते, असे सांगून यापुढच्या काळात आपले काम करीत असताना त्यांनी ‘कमळ’ फुलवावे, अशा शब्दांत अध्यक्षा महाडिक यांनी देशमुख यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले.