शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पाचगाव उपनगरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: December 5, 2015 00:25 IST

कळंबा तलावात चार दिवसांचाच पाणीसाठा : महापालिकेने पाणीपुरवठा करण्याची महापौरांची सूचना

कोल्हापूर : शहराला लागून असलेल्या कळंबा तलावात सध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असून त्यानंतर काय करायचे, असा गंभीर प्रश्न पाचगाव उपनगरातील सुमारे पंधरा हजारांहून अधिक लोकवस्तीला पडला आहे. सध्या पंधरा दिवसांतून एकदा आणि तोही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन महानगरपालिकेने पाचगाव उपनगरात तातडीने पर्यायी पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. शहराच्या दक्षिण भागात असलेल्या पाचगांवला गावातील हौद व विहिरीतून, तर पाचगाव उपनगरातील २७ कॉलन्यांतील सुमारे १५ हजार लोकवस्तीला कळंबा तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाचगाव ग्रामपंचायतीची क्षमता नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने महासभेच्या मान्यतेने पाचगाव उपनगराला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. सुमारे अडीच ते तीन हजार नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. त्यासाठी स्वतंत्र जलशुद्धिकरण केंद्र सुरू करून कळंबा तलावातील पाणी घेण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला दोन वर्षांपासून नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत होता; परंतु यंदा कळंबा तलावातीलच पाणीसाठा संपत आल्यामुळे आधी आठ दिवसांतून एकदा आणि आता तर पंधरा दिवसांतून एकदा तोही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या तलावात केवळ चार ते पाच दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले असल्याने त्यानंतर पाणीपुरवठाच बंद पडणार आहे. पाचगाव उपनगरांतील पोवार कॉलनी, भोगम कॉलनी, द्रौपदीनगर, जाधव पार्क, वटवृक्ष कॉलनी, शिवनेरीनगर, शांतीनगरसह २७ कॉलन्यांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. परिसरातील नागरिकांनी महापौर अश्विनी रामाणे व माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांची भेट घेऊन पर्यायी व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी महापौरांनी आयुक्तांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याची सूचना केली. महापौरांनी सुचविले पर्यायपाचगावातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी आर. के. नगर पाणी योजना, गिरगाव आणि महानगरपालिका पाणीपुरवठा योजना यांच्याकडून पाणी घेऊन ते पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे महापौर रामाणे यांनी सुचविले आहे. शहर हद्दवाढीत पाचगाव व उपनगरांचा समावेश आहे. त्यामुळे या भागाला आता पाणीपुरवठा केल्यास तेथील नागरिकांचा दृष्टिकोन सकारात्मक होण्यास मदत होणार आहे, असे महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. वाशी नाका, कदम खाण येथील पाणीप्रश्न गंभीरकोल्हापूर : रंकाळा तलावाला लागूनच असलेल्या जुना वाशीनाका, कदमखाण परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दररोज टॅँकरने किती दिवस पाणी देणार? असा सवाल या परिसरातील नागरिकांनी महापालिकेस विचारला आहे. शुक्रवारी नगरसेवक महेश सावंत यांनी या प्रश्नावर आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन पाणी टंचाईकडे त्यांचे लक्ष वेधले. आपटेनगर ते शिवाजी पेठ या मार्गावर टाकलेल्या मुख्य जलवाहिनीतून जुना वाशीनाका ते विजयनगर आणि राजकपूर पुतळा ते राजाराम चौक, कदमखाण या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून पाणीपुरवठा अतिशय सुरळीत आणि नियमितपणे होत होता; परंतु केल्या सहा-सात महिन्यांपासून नागरिकांना अत्यंत कमी प्रमाणात तसेच अनियमितपणे पाणी मिळत आहे. गेल्या तीन वर्षांपासून राजकपूर पुतळा ते टिंबर मार्केट कमान हा रस्ता नगरोत्थान योजनेतून करण्यात येत आहे. त्यावेळी नागरिकांसाठी नळजोडणीचे तसेच ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम करण्यात आले. तथापि, ही कामे करताना कोठेतरी मुख्य जलवाहिनी फुटली असून त्यातून पाणी वाहून जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. असाच प्रकार राजकपूर पुतळा ते विजयनगर या मार्गावरील जलवाहिनीच्या बाबतीत घडला आहे. ही जलवाहिनीही फु टलेली आहे. त्यामुळे काही घरांत पाणी मिळते; पण त्यापुढे पाणी जात नाही. गेले सहा महिने नागरिक पाण्याविना त्रस्त आहेत.याच प्रश्नावर नागरिकांनी महापालिका निवडणूक होण्यापूर्वी ‘रास्ता रोको’ केला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हा प्रश्न आठ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले होते; परंतु पुढे कसलीच कार्यवाही झालेली नाही. पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे. आज नगरसेवक महेश सावंत यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. या मार्गावरील जलवाहिन्या जुन्या असून त्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे त्या बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी खास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी त्यांनी आयुक्तांना विनंती केली.