शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांच्या आतील शिक्षेबाबत फेरयाचिका हवी

By admin | Updated: December 22, 2014 00:24 IST

उज्ज्वल निकम यांचे मत : अन्यथा गुन्हेगार मोकाट फिरतील

कोल्हापूर : चोरी, मारामारी, फसवणूक, मटका, जुगार, अशा सात वर्षांच्या आतील शिक्षेच्या गुन्ह्णांमध्ये आरोपींना थेट अटक करता येणार नाही. अटक केल्यास, का केली? याचा लेखी खुलासा पोलिसांना न्यायालयात सादर करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाच्या विरोधात फेरयाचिका दाखल करण्याची आज नितांत गरज आहे; अन्यथा गंभीर गुन्ह्णांतील आरोपी दिवसाढवळ्या गुन्हे करीत मोकाट फिरतील, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. खासगी कार्यक्रमानिमित्त ते आज, रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. पोलिसांना सात वर्षांपर्यंत शिक्षा व दंड असलेल्या सर्वच गुन्ह्णांमध्ये आरोपींना थेट अटक करता येत नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासंदर्भात बोलताना अ‍ॅड. निकम म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाविरोधात फेरयाचिका दाखल करून हा आदेश रद्द केला पाहिजे; अन्यथा सराईत गुन्हेगार या कायद्याच्या आधारे राजरोस गुन्हे करून मोकाट फिरतील. आत्मदहन किंवा आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस ३०९ प्रमाणे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करीत होते. न्यायालयाने हे कलम रद्द केले आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, एखादी व्यक्ती ही जीवनाचा कंटाळा आल्यानंतरच अशा निर्णयापर्यंत पोहोचत असते आणि ते करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर उलट गुन्हा दाखल केला, तर मनाने ती व्यक्ती जास्तच खचून जाते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याची मानसिकता बदलण्यासाठी त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे न्यायालयाने घेतलेला निर्णय हा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. एकमेकांवर कुरघोड्या करण्याची व अतिरेक्यांना प्रोत्साहन देण्याची पाकिस्तानची जुनी सवय आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य अजिज हे बेमालूमपणे खोटे बोलत आहेत की, २६-११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा खटला भारतामुळे लांबणीवर पडला. जनतेची दिशाभूल करून त्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अतिरेक्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केवळ पाकिस्तान करीत आहे. त्यामुळेच त्यांनी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचे निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)