शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

सात हजार पोलिसांचा ४८ तास खडा पहारा, तमिळनाडू, मध्यप्रदेश परिक्षेत्रातील स्पेशल फोर्स तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:41 IST

लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.

ठळक मुद्देपोलिसांचा ४८ तास खडा पहारा तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांचा समावेश

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.लोकसभा निवडणूक बंदोबस्ताची तयारी पोलीस प्रशासनाने दोन महिन्यांपासून केली होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कानोसा घेतला होता. या निवडणुकीत पोलीस प्रशासनाने अतिशय अभ्यासपूर्वक नियोजन केले होते.

परराज्यांतून व परजिल्ह्यांतून आलेल्या पोलिसांची गैरसोय होऊ नये, अशी त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली होती. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी ३०० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. अवैध धंद्यांवर छापे टाकून त्या व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडले. निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच सर्व पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द केल्या. ४० दिवस पोलीस रात्रंदिवस रस्त्यांवर उतरून बंदोबस्त करीत होते. प्रचारसभा, मिरवणुकीच्या बंदोबस्ताचा पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण होता.निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूर परिक्षेत्रातील स्पेशल फोर्सचे दोन हजार पोलीस बंदोबस्तासाठी कोल्हापुरात दाखल झाले. रविवारी सकाळी प्रत्येक पोलीस ठाण्यानुसार बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले होते. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. संवेदनशील मतदारसंघांत पोलिसांची जादा कुमक तैनात केल्याने कोणत्याही गैरप्रकारांना संधी मिळाली नाही.

इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान तैनात असल्याने वादावादीचे प्रकार घडले नाहीत. मतदान केंद्रावर व परिसरात पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. खासगी व शासकीय वाहनांतूनही पोलीस पेट्रोलिंग करीत होते. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांसाठी चहा-नाष्टा, जेवणाची सोय स्वतंत्रपणे केली होती. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी दोन महिने पोलिसांनी खूप मेहनत घेतली. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगले