शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

सात हजार पोलिसांचा ४८ तास खडा पहारा, तमिळनाडू, मध्यप्रदेश परिक्षेत्रातील स्पेशल फोर्स तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:41 IST

लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.

ठळक मुद्देपोलिसांचा ४८ तास खडा पहारा तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांचा समावेश

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.लोकसभा निवडणूक बंदोबस्ताची तयारी पोलीस प्रशासनाने दोन महिन्यांपासून केली होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कानोसा घेतला होता. या निवडणुकीत पोलीस प्रशासनाने अतिशय अभ्यासपूर्वक नियोजन केले होते.

परराज्यांतून व परजिल्ह्यांतून आलेल्या पोलिसांची गैरसोय होऊ नये, अशी त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली होती. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी ३०० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. अवैध धंद्यांवर छापे टाकून त्या व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडले. निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच सर्व पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द केल्या. ४० दिवस पोलीस रात्रंदिवस रस्त्यांवर उतरून बंदोबस्त करीत होते. प्रचारसभा, मिरवणुकीच्या बंदोबस्ताचा पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण होता.निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूर परिक्षेत्रातील स्पेशल फोर्सचे दोन हजार पोलीस बंदोबस्तासाठी कोल्हापुरात दाखल झाले. रविवारी सकाळी प्रत्येक पोलीस ठाण्यानुसार बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले होते. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. संवेदनशील मतदारसंघांत पोलिसांची जादा कुमक तैनात केल्याने कोणत्याही गैरप्रकारांना संधी मिळाली नाही.

इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान तैनात असल्याने वादावादीचे प्रकार घडले नाहीत. मतदान केंद्रावर व परिसरात पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. खासगी व शासकीय वाहनांतूनही पोलीस पेट्रोलिंग करीत होते. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांसाठी चहा-नाष्टा, जेवणाची सोय स्वतंत्रपणे केली होती. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी दोन महिने पोलिसांनी खूप मेहनत घेतली. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगले