शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

अंबाबाईच्या श्रीपूजकांसह सातजणांना अटक

By admin | Updated: April 22, 2016 00:54 IST

जामिनावर मुक्तता : अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात तृप्ती देसाई यांना मारहाण प्रकरण

कोल्हापूर : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना अंबाबाई देवी मंदिर गाभारा प्रवेशावेळी झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी श्रीपूजकांसह सातजणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. सायंकाळी न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.अ‍ॅड. केदार वसंत मुनिश्वर (वय ३८ रा. २७५६ ए वॉर्ड, सासने बोळ, कोल्हापूर), श्रीश रामचंद्र मुनीश्वर (५६ रा. १४८९ बी वॉर्ड, स्वाती अपार्टमेंट, मंगळवार पेठ), आशिष ऊर्फ चैतन्य शेखर अष्टेकर (२६ रा.२७५४ ए वॉर्ड, सासने बोळ, महाद्वार रोड), मयूर मुकुंद मुनिश्वर (४१ आर. के. नगर मूळ सोसायटी, कोल्हापूर) , निखील दीपक शानबाग (२५ कोमटे गल्ली, अर्धा शिवाजी पुतळा, शिवाजी पेठ), किसन मुरलीधर कल्याणकर (५६ रा. १९२४ बी वॉर्ड, मंगळवार पेठ, न्यू इंग्लिश मेडियम शाळेशेजारी), जयकुमार रंगराव शिंदे (५९ रा. ६९० /२८ ताराराणी कॉलनी, संभाजीनगर मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.‘पोलिसांनी सांगितले की ‘अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाई यांच्यासह अन्य महिलांनी दि. १३ एप्रिलला प्रवेश आंदोलन केले. त्यावेळी गाभाऱ्यात जावून देवीचे दर्शन घेवून बाहेर पडत असताना देसाई यांना जोरदार मारहाण झाली होती. त्यांचे केस उपटले होते. शिवीगाळही करण्यात आली होती. मंदिरातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण पाहून संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल मस्के यांनी फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस श्रीपूजकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जयकुमार शिंदे व किसन कल्याणकर यांचा यांचा शोध घेत होते. परंतू गेली पाच दिवस ते पोलिसांना हुलकावणी देत होते.या प्रकरणी गुरुवारी श्रीपूजकांसह सात जणांना अटक केली. यावेळी पोलिस ठाण्यात श्रीपूजकांबरोबर नगरसेवक अजित ठाणेकर, भाजपचे सुरेश जरग व श्रीपूजकांचे वकील आले होते. संशयितांवर कलमे...भारतीय दंड विधान संहिता कलमानुसार या सर्वांवर १४३ व १४७ (गर्दी व मारामारी), ३३२ सरकारी नोकरास मारहाण, ३३६ व ३३७ मानवी जीवितास धोका, ३५३ शासकीय कामात अडथळा व ५०६ धमकी अशी कलमे आहेत. त्याचप्रमाणे देसाई मारहाण प्रकरणात अटक केलेल्या सातजणांसह अन्य ४५ जणांची नावे निष्पन्न होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.अटक केलेल्या सर्वांना दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एम. उन्हाळे यांच्या न्यायालयात पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी हजर केले. यावेळी उन्हाळे यांनी या सर्वांची जामिनावर मुक्तता केली. श्रीपूजकांच्यावतीने अ‍ॅड. अजय कुलकर्णी, अ‍ॅड. प्रवीण देशपांडे व अ‍ॅड. अभिषेक देसाई यांनी काम पाहिले.