शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

अर्जुनवाडमध्ये नवनिर्वाचित सात सदस्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:37 IST

अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीनंतर सात सदस्यांचा राजीनामा, एक मत फुटल्याने निर्णय व सरपंच निवडीत घोडेबाजार झाल्याचा ...

अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीनंतर सात सदस्यांचा राजीनामा, एक मत फुटल्याने निर्णय व

सरपंच निवडीत घोडेबाजार झाल्याचा आरोप

अर्जुनवाड : अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीवेळी सत्ताधारी राजश्री शाहू विकास आघाडीमधील एक सदस्य फुटल्याने सत्ता गेली. या कारणामुळे १३ पैकी ७ सदस्यांनी आपला राजीनामा ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई यांच्याकडे दिला आहे. यामध्ये नूतन ग्रा. पं. सदस्य नंदा खोत, संगीता चौगुले, भारती परीट, शोभा डोंगरे, संतोष पाटील, संतोष दुधाळे, परशुराम बागडी यांनी राजीनामा दिला आहे.

अर्जुनवाड ग्रामपंचायतीची सरपंच निवड आज गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी राजर्षी शाहू विकास आघाडीची सदस्य संख्या सात, तर अर्जुनेश्वर विकास आघाडी व अपक्ष अशी सदस्य संख्या सहा आहे. सरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या गुप्त मतदानामध्ये शाहू आघाडीचा एक सदस्य फुटल्याने अर्जुनेश्वर आघाडी व अपक्ष गटाची सत्ता आली आहे. यावेळी सरपंचपदाच्या उमेदवार स्वाती कोळी, उपसरपंचपदाचे उमेदवार विश्‍वनाथ कदम प्रत्येकी सात मते मिळाल्याने त्यांची निवड झाली. शाहू आघाडीतील कोण सदस्य फुटला आहे, हे न कळल्यामुळे आघाडीच्या सात सदस्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई यांच्याकडे राजीनामा दिला. या निर्णयाने अर्जुनवाड गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या निवडणुकीत शाहू आघाडीतील एक सदस्याने गद्दारी केल्याने सत्ता गमवावी लागली; पण राजीनामा दिल्याने मतदारांचा अनादर झाला असल्याची चर्चा होत आहे. याबाबत पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष्य लागले आहे.

चौकट

याबाबत आघाडीप्रमुख यांनी ग्रामपंचायत बरखास्त करून सर्व ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे जाहीर केले आहे, तर उपसरपंचपदाची निवडणूक लढवणारे आघाडीचे उमेदवार संतोष पाटील यांनी या प्रकारात घोडेबाजार झाला असून, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.