शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘राधानगरी’चे सात दरवाजे खुले

By admin | Updated: September 25, 2016 01:03 IST

धरणक्षेत्रात पावसाचा जोर : नद्यांची पातळी वाढली

कोल्हापूर : धरणक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे शनिवारी खुले झाले. या पावसाळ्यात हे दरवाजे तिसऱ्यांदा खुले झाले आहेत. ‘काळम्मावाडी’तूनही विसर्ग वाढविण्यात आला असून, नद्यांच्या जलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. प्रत्येक तासाला पंचगंगेची पातळी चार इंचांनी वाढत आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात विशेषत: पश्चिमेकडील तालुक्यांत चांगला पाऊस सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, शाहूवाडी या तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. शनिवारी सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांत पाऊस कमी आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. दुपारी तीननंतर जोरदार सरी कोसळल्या; पण दिवसभर गारवा राहिला. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित सातही दरवाजे शनिवारी खुले झाले. या हंगामात तिसऱ्यांदा हे दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ११ हजार ९९६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणक्षेत्रात पाऊस असल्याने सतर्कता म्हणून विसर्ग वाढविण्यात आला असून, प्रतिसेकंद १५ हजार ६०० घनफूट विसर्ग सुरू आहे. विसर्ग जोरात सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता १७.१० फूट होती, सायंकाळी सहापर्यंत ती १९.८ फुटांपर्यंत पोहोचली आहे. दीड महिन्यानंतर दरवाजे उघडले ४राधानगरी : आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने राधानगरी तालुक्यात दोन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. दुपारी साडेबाराला राधानगरी धरणाचे सर्व सातही स्वयंचलित दरवाजे उघडले. दीड महिन्यानंतर यावर्षी दुसऱ्यांदा हे दरवाजे सुरू झाले. सप्टेंबरच्या शेवटी अशाप्रकारे दरवाजे सुरू होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. याद्वारे दहा हजार व दोन्ही वीजनिर्मिर्ती केंद्रातून दोन हजार असा बारा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ४आज सकाळी आठ वाजता येथे ८५ व एकूण ४१३३ मी.मी. पावसाची नोंद झाली. कालपासून दोन स्वयंचलित दरवाजे सुरू होते. सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी चार व पाच क्रमांकाचे, साडेअकरा वाजता सातवा व साडेबाराला पहिला व दुसरा दरवाजा उघडला गेला. ‘पाटगाव’ भरले! पाटगाव धरणक्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप हे धरण भरले नव्हते. गेले तीन-चार दिवस चांगला पाऊस सुरू असल्याने शनिवारी दुपारी साडेचार वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची क्षमता ३.७१६ टी. एम.सी. इतकी आहे. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा हातकणंगले- ०.६३, शिरोळ- १.५७, पन्हाळा- ३.७१, शाहूवाडी- ८, राधानगरी- २५, गगनबावडा- ५३.५०, करवीर- २.१८, कागल- २.७१, गडहिंग्लज- ३.१०, भुदरगड- १५, आजरा- १०.५०, चंदगड- ११.३३. वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग शित्तूर-वारूण : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. धरणाच्या जलाशयात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धरण व्यवस्थापनाने चार दरवाजांतून ११,४४५ क्युसेक तर विद्युत निर्मितीसाठी १५५५ क्युसेक असे एकूण १३,००० क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडले आहे. काळम्मावाडी परिसरात धुवाधार ४सोळांकूर : काळम्मावाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने, धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणातून प्रतिसेकंद ११ हजार क्युसेक दाबाने पाणी जलविद्युत केंद्र व धरणाच्या सांडव्यातून दूधगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दूधगंगा नदीपात्रातील पातळीत वाढ झाल्याने रात्रीपर्यंत काही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. ४शनिवारी (दि. २४) दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. आजअखेर २८३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाण्याची पातळी ६४६.२९ मी. असून, पाणी साठा ७३००२४ द.ल.घ.मी. इतका आहे. धरण १०१.४५ टक्के म्हणजे २५७७ टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. जलविद्युत केंद्रातून १६०० क्युसेक दाबाने, तर सांडव्यावरून ९४५० क्युसेक दाबाने पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत २०१३ व यावर्षी पावसाची नोंद अधिक झाली आहे. ४सन २०१३ साली ३४०५ मिमी पावसाची नोंद असून, त्याखालोखाल सन २०१६ साली २८३५ मिमी पावसाची नोंद आहे; मात्र यावर्षीचा सांडव्यावरील विसर्ग हा गतसालापेक्षा जास्त आहे.