शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

‘राधानगरी’चे सात दरवाजे खुले

By admin | Updated: September 25, 2016 01:03 IST

धरणक्षेत्रात पावसाचा जोर : नद्यांची पातळी वाढली

कोल्हापूर : धरणक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे शनिवारी खुले झाले. या पावसाळ्यात हे दरवाजे तिसऱ्यांदा खुले झाले आहेत. ‘काळम्मावाडी’तूनही विसर्ग वाढविण्यात आला असून, नद्यांच्या जलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. प्रत्येक तासाला पंचगंगेची पातळी चार इंचांनी वाढत आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात विशेषत: पश्चिमेकडील तालुक्यांत चांगला पाऊस सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, शाहूवाडी या तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. शनिवारी सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांत पाऊस कमी आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. दुपारी तीननंतर जोरदार सरी कोसळल्या; पण दिवसभर गारवा राहिला. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित सातही दरवाजे शनिवारी खुले झाले. या हंगामात तिसऱ्यांदा हे दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ११ हजार ९९६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणक्षेत्रात पाऊस असल्याने सतर्कता म्हणून विसर्ग वाढविण्यात आला असून, प्रतिसेकंद १५ हजार ६०० घनफूट विसर्ग सुरू आहे. विसर्ग जोरात सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता १७.१० फूट होती, सायंकाळी सहापर्यंत ती १९.८ फुटांपर्यंत पोहोचली आहे. दीड महिन्यानंतर दरवाजे उघडले ४राधानगरी : आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने राधानगरी तालुक्यात दोन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. दुपारी साडेबाराला राधानगरी धरणाचे सर्व सातही स्वयंचलित दरवाजे उघडले. दीड महिन्यानंतर यावर्षी दुसऱ्यांदा हे दरवाजे सुरू झाले. सप्टेंबरच्या शेवटी अशाप्रकारे दरवाजे सुरू होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. याद्वारे दहा हजार व दोन्ही वीजनिर्मिर्ती केंद्रातून दोन हजार असा बारा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ४आज सकाळी आठ वाजता येथे ८५ व एकूण ४१३३ मी.मी. पावसाची नोंद झाली. कालपासून दोन स्वयंचलित दरवाजे सुरू होते. सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी चार व पाच क्रमांकाचे, साडेअकरा वाजता सातवा व साडेबाराला पहिला व दुसरा दरवाजा उघडला गेला. ‘पाटगाव’ भरले! पाटगाव धरणक्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप हे धरण भरले नव्हते. गेले तीन-चार दिवस चांगला पाऊस सुरू असल्याने शनिवारी दुपारी साडेचार वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची क्षमता ३.७१६ टी. एम.सी. इतकी आहे. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा हातकणंगले- ०.६३, शिरोळ- १.५७, पन्हाळा- ३.७१, शाहूवाडी- ८, राधानगरी- २५, गगनबावडा- ५३.५०, करवीर- २.१८, कागल- २.७१, गडहिंग्लज- ३.१०, भुदरगड- १५, आजरा- १०.५०, चंदगड- ११.३३. वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग शित्तूर-वारूण : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. धरणाच्या जलाशयात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धरण व्यवस्थापनाने चार दरवाजांतून ११,४४५ क्युसेक तर विद्युत निर्मितीसाठी १५५५ क्युसेक असे एकूण १३,००० क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडले आहे. काळम्मावाडी परिसरात धुवाधार ४सोळांकूर : काळम्मावाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने, धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणातून प्रतिसेकंद ११ हजार क्युसेक दाबाने पाणी जलविद्युत केंद्र व धरणाच्या सांडव्यातून दूधगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दूधगंगा नदीपात्रातील पातळीत वाढ झाल्याने रात्रीपर्यंत काही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. ४शनिवारी (दि. २४) दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. आजअखेर २८३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाण्याची पातळी ६४६.२९ मी. असून, पाणी साठा ७३००२४ द.ल.घ.मी. इतका आहे. धरण १०१.४५ टक्के म्हणजे २५७७ टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. जलविद्युत केंद्रातून १६०० क्युसेक दाबाने, तर सांडव्यावरून ९४५० क्युसेक दाबाने पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत २०१३ व यावर्षी पावसाची नोंद अधिक झाली आहे. ४सन २०१३ साली ३४०५ मिमी पावसाची नोंद असून, त्याखालोखाल सन २०१६ साली २८३५ मिमी पावसाची नोंद आहे; मात्र यावर्षीचा सांडव्यावरील विसर्ग हा गतसालापेक्षा जास्त आहे.