शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदरावर २५ पूर्वीच तोडगा : चंद्रकांतदादा

By admin | Updated: November 3, 2014 00:51 IST

जंगी स्वागत : सहकार क्षेत्रातील निवडणुका ३१ डिसेंबरपूर्वी घेणार

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आमचे सरकार काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या भावना आम्ही जाणतो. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, खासदार राजू शेट्टी यांना ऊसदरासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतची वाट पाहावी लागणार नाही. गेल्या तीन वर्षांत सहकार क्षेत्रातील निवडणुका झालेल्या नाहीत. त्या निवडणुका ३१ डिसेंबरपूर्वी घेणार असल्याची माहिती नूतन सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, रविवारी येथे दिली.भाजप सरकारमध्ये शपथविधी घेतल्यानंतर ते आज कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आम्ही राज्य चालविणार आहोत. महाराजांच्या राज्यात जनतेला मागणी मांडावी लागत नव्हती. त्या धर्तीवर आम्ही काम करू. आमच्या राज्यात शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागणार नाहीत. ऊसदराबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल. खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत एका वृत्तवाहिनीवर ऊसदराबाबत चर्चा झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भावना आम्हांला समजते. त्यामुळे शेतकऱ्यांसह खासदार शेट्टी यांना ऊसदरासाठी २५ तारखेची वाट पाहावी लागणार नाही. सहकारामुळे सामान्य शेतकऱ्यांचे कल्याण झाले; मात्र काळाच्या ओघात या क्षेत्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून भ्रष्टाचार घुसला. सामान्यांपेक्षा स्वत:चे हित बघण्यात नेतेमंडळी गुंतल्याने सहकार संपला. सहकारातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामान्य माणसाला उपयोगी पडणारा सहकार आणणार आहे. गेल्या तीन वर्षांत सहकार क्षेत्रातील निवडणुका झालेल्या नाहीत. त्या ३१ डिसेंबरपूर्वी घेणार आहोत. शिवाय सहकार कायद्यात आवश्यक सुधारणा डिसेंबर अथवा मार्चच्या अधिवेशनात करणार आहोत. आमचा शंभर दिवसांचा अजेंडा पक्का आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदर्शी आहेत. त्यांनी निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाच तासांची बैठक झाली. यात अर्थ, ऊर्जासह चार विभागांचे सादरीकरण झाले. त्यातून नेमकी स्थिती समजली असून, शंभर दिवसांत आम्ही भरीव काम करू, अशी खात्री आहे. टोलमुक्ती, पंचगंगा प्रदूषण, तीर्थक्षेत्र आराखडा, आदी कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर माझे आग्रही प्रयत्न राहतील. (प्रतिनिधी)कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचा आम्ही निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यातून शब्द दिला आहे. हा शब्द आम्ही पाळणार आहोत. ‘रस्ते की खड्डे’ अशा प्रश्नात नागरिकांना पाडण्याऐवजी राज्यात चांगले रस्ते करण्यावर माझा भर राहणार आहे.- चंद्रकांतदादा पाटील, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्रीसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्नकोल्हापूरसह राज्याच्या विकासातील प्रत्येक विषय मला ताकदीने करावयाचा आहे. सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम यांचा पूर्ण अभ्यास करून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.