शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

ऊसदरावर २५ पूर्वीच तोडगा : चंद्रकांतदादा

By admin | Updated: November 3, 2014 00:51 IST

जंगी स्वागत : सहकार क्षेत्रातील निवडणुका ३१ डिसेंबरपूर्वी घेणार

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आमचे सरकार काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या भावना आम्ही जाणतो. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, खासदार राजू शेट्टी यांना ऊसदरासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतची वाट पाहावी लागणार नाही. गेल्या तीन वर्षांत सहकार क्षेत्रातील निवडणुका झालेल्या नाहीत. त्या निवडणुका ३१ डिसेंबरपूर्वी घेणार असल्याची माहिती नूतन सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, रविवारी येथे दिली.भाजप सरकारमध्ये शपथविधी घेतल्यानंतर ते आज कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आम्ही राज्य चालविणार आहोत. महाराजांच्या राज्यात जनतेला मागणी मांडावी लागत नव्हती. त्या धर्तीवर आम्ही काम करू. आमच्या राज्यात शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागणार नाहीत. ऊसदराबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल. खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत एका वृत्तवाहिनीवर ऊसदराबाबत चर्चा झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भावना आम्हांला समजते. त्यामुळे शेतकऱ्यांसह खासदार शेट्टी यांना ऊसदरासाठी २५ तारखेची वाट पाहावी लागणार नाही. सहकारामुळे सामान्य शेतकऱ्यांचे कल्याण झाले; मात्र काळाच्या ओघात या क्षेत्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून भ्रष्टाचार घुसला. सामान्यांपेक्षा स्वत:चे हित बघण्यात नेतेमंडळी गुंतल्याने सहकार संपला. सहकारातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामान्य माणसाला उपयोगी पडणारा सहकार आणणार आहे. गेल्या तीन वर्षांत सहकार क्षेत्रातील निवडणुका झालेल्या नाहीत. त्या ३१ डिसेंबरपूर्वी घेणार आहोत. शिवाय सहकार कायद्यात आवश्यक सुधारणा डिसेंबर अथवा मार्चच्या अधिवेशनात करणार आहोत. आमचा शंभर दिवसांचा अजेंडा पक्का आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदर्शी आहेत. त्यांनी निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाच तासांची बैठक झाली. यात अर्थ, ऊर्जासह चार विभागांचे सादरीकरण झाले. त्यातून नेमकी स्थिती समजली असून, शंभर दिवसांत आम्ही भरीव काम करू, अशी खात्री आहे. टोलमुक्ती, पंचगंगा प्रदूषण, तीर्थक्षेत्र आराखडा, आदी कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर माझे आग्रही प्रयत्न राहतील. (प्रतिनिधी)कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचा आम्ही निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यातून शब्द दिला आहे. हा शब्द आम्ही पाळणार आहोत. ‘रस्ते की खड्डे’ अशा प्रश्नात नागरिकांना पाडण्याऐवजी राज्यात चांगले रस्ते करण्यावर माझा भर राहणार आहे.- चंद्रकांतदादा पाटील, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्रीसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्नकोल्हापूरसह राज्याच्या विकासातील प्रत्येक विषय मला ताकदीने करावयाचा आहे. सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम यांचा पूर्ण अभ्यास करून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.