शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वीच अपेक्षांचा प्राधान्यक्रम ठरवा

By admin | Updated: April 27, 2015 00:18 IST

प्रियदर्शिनी हिंगे : 'जोडीदार निवडताना' कार्यक्रमात विवाहोच्छुकांनी साधला दिलखुलास संवाद

कोल्हापूर : प्रेमभावना आणि परस्पर संवादाच्या आधारावरच विवाहसंस्था टिकून राहते. त्यामुळे भावी जोडीदाराकडून पैसा, रूप आणि परंपरा याबाबतच्या अपेक्षा लवचिक ठेवल्या पाहिजेत. या अपेक्षांचा प्राधान्यक्रम लग्नापूर्वीच निश्चित केल्यास आयुष्य आनंदमयी होईल, असा कानमंत्र पॉझिटिव्ह साथी डॉटकॉमच्या प्रकल्प समन्वयक आणि प्रसिद्ध विवाह समुपदेशिका प्रियदर्शिनी हिंगे यांनी दिला. ‘लोकमत सखी मंच’ आणि अथर्व वधू-वर सूचक केंद्रातर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जोडीदार निवडताना’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बसंत-बहार रोड येथील मधुसूदन हॉल येथे कार्यक्रम झाला. हिंगे म्हणाल्या, जोडीदारांकडून अवास्तव अपेक्षा, आर्थिक सुबत्तेचा आग्रह, लग्नाकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोन, पालकांचा अवाजवी हस्तक्षेप यामुळे विवाहसंस्थेवर परिणाम होत आहे. तडजोडीनंतर विवाह झाल्यानंतरही घटस्फोटाच्या आणि आत्महत्येच्या घटना घडत आहेत. अगदी सुखवस्तू कुटुंबेही याला अपवाद नसल्याचे चित्र आहे. परस्परांना प्रेम आणि जिव्हाळ्याचा आधार देण्यासाठी विवाहसंस्था निर्माण झाली आहे, याचे भानच समाजाला राहिलेले नाही. रूप, पैसा या आधारावरच आजही लग्ने ठरविली जात आहेत. लग्न ठरविण्यापूर्वी मुलामुलींची मते विचारात घेणे आवश्यक आहे. वधूवरांमध्ये लग्न ठरविण्यापूर्वी परस्पर संवाद घडवून आणला, तर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येणार नाहीत. वधूवरांनीही जोडीदार निवडताना कुणीतरी सांगतंय म्हणून ऐकण्यापेक्षा स्वत:च्या पातळीवर एकमेकांच्या स्वभावाची चाचपणी करणे गरजेचे आहे. जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांचा प्राधान्यक्रम ठरविण्याबरोबरच आपण कोणकोणत्या बाबतीत तडजोडी करू शकतो, हे ठरविले तर आयुष्याचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास हिंगे यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, विवाहसंस्थेत काळानुरूप बदल केले पाहिजेत. पतीनेच आपल्या जीवनशैलीवर खर्च केला पाहिजे, हा पत्नीचा आग्रह चुकीचा आहे. स्त्री-सक्षमीकरणाचे युग सुरू आहे. त्यामुळे मुलींनी केवळ नवऱ्या मुलानेच कमवले पाहिजे, हा दृष्टिकोन बाजूला ठेवला पाहिजे. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्यास वेळ दिला पाहिजे. सहकाऱ्याच्या प्रेमाची भाषा समजायला वेळ लागतो. ही भाषा समजली की, आपोआपच कौटुंंबिक स्वास्थ्य प्राप्त होईल. यावेळी अथर्व वधूवर सूचक केंद्राचे संचालक अजित तांबेकर यांनी इच्छुक वधूवरांची मोफत नोंदणी केली. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.एचआयव्ही तपासणीचा आग्रह धरा नियोजित वधूवरांनी इतर चौकशीबरोबरच दोघांचीही एचआयव्हीची तपासणी केलीच पाहिजे. याबाबत पालकांनी तसेच संबंधित वधूवरांनी सामाजिक प्रतिष्ठेचा आव न आणता पुढाकार घेतला पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावातील नागरिकांनी एचआयव्हीची तपासणी केल्याशिवाय मुलामुलींची लग्ने न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे अनुकरण आवश्यक आहे. ‘लोकमत सखी मंच’ आणि अथर्व वधूवर सूचक केंद्रातर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जोडीदार निवडताना’ या कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध विवाह समुपदेशिका प्रियदर्शनी हिंगे.