शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

लग्नापूर्वीच अपेक्षांचा प्राधान्यक्रम ठरवा

By admin | Updated: April 27, 2015 00:18 IST

प्रियदर्शिनी हिंगे : 'जोडीदार निवडताना' कार्यक्रमात विवाहोच्छुकांनी साधला दिलखुलास संवाद

कोल्हापूर : प्रेमभावना आणि परस्पर संवादाच्या आधारावरच विवाहसंस्था टिकून राहते. त्यामुळे भावी जोडीदाराकडून पैसा, रूप आणि परंपरा याबाबतच्या अपेक्षा लवचिक ठेवल्या पाहिजेत. या अपेक्षांचा प्राधान्यक्रम लग्नापूर्वीच निश्चित केल्यास आयुष्य आनंदमयी होईल, असा कानमंत्र पॉझिटिव्ह साथी डॉटकॉमच्या प्रकल्प समन्वयक आणि प्रसिद्ध विवाह समुपदेशिका प्रियदर्शिनी हिंगे यांनी दिला. ‘लोकमत सखी मंच’ आणि अथर्व वधू-वर सूचक केंद्रातर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जोडीदार निवडताना’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बसंत-बहार रोड येथील मधुसूदन हॉल येथे कार्यक्रम झाला. हिंगे म्हणाल्या, जोडीदारांकडून अवास्तव अपेक्षा, आर्थिक सुबत्तेचा आग्रह, लग्नाकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोन, पालकांचा अवाजवी हस्तक्षेप यामुळे विवाहसंस्थेवर परिणाम होत आहे. तडजोडीनंतर विवाह झाल्यानंतरही घटस्फोटाच्या आणि आत्महत्येच्या घटना घडत आहेत. अगदी सुखवस्तू कुटुंबेही याला अपवाद नसल्याचे चित्र आहे. परस्परांना प्रेम आणि जिव्हाळ्याचा आधार देण्यासाठी विवाहसंस्था निर्माण झाली आहे, याचे भानच समाजाला राहिलेले नाही. रूप, पैसा या आधारावरच आजही लग्ने ठरविली जात आहेत. लग्न ठरविण्यापूर्वी मुलामुलींची मते विचारात घेणे आवश्यक आहे. वधूवरांमध्ये लग्न ठरविण्यापूर्वी परस्पर संवाद घडवून आणला, तर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येणार नाहीत. वधूवरांनीही जोडीदार निवडताना कुणीतरी सांगतंय म्हणून ऐकण्यापेक्षा स्वत:च्या पातळीवर एकमेकांच्या स्वभावाची चाचपणी करणे गरजेचे आहे. जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांचा प्राधान्यक्रम ठरविण्याबरोबरच आपण कोणकोणत्या बाबतीत तडजोडी करू शकतो, हे ठरविले तर आयुष्याचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास हिंगे यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, विवाहसंस्थेत काळानुरूप बदल केले पाहिजेत. पतीनेच आपल्या जीवनशैलीवर खर्च केला पाहिजे, हा पत्नीचा आग्रह चुकीचा आहे. स्त्री-सक्षमीकरणाचे युग सुरू आहे. त्यामुळे मुलींनी केवळ नवऱ्या मुलानेच कमवले पाहिजे, हा दृष्टिकोन बाजूला ठेवला पाहिजे. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्यास वेळ दिला पाहिजे. सहकाऱ्याच्या प्रेमाची भाषा समजायला वेळ लागतो. ही भाषा समजली की, आपोआपच कौटुंंबिक स्वास्थ्य प्राप्त होईल. यावेळी अथर्व वधूवर सूचक केंद्राचे संचालक अजित तांबेकर यांनी इच्छुक वधूवरांची मोफत नोंदणी केली. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.एचआयव्ही तपासणीचा आग्रह धरा नियोजित वधूवरांनी इतर चौकशीबरोबरच दोघांचीही एचआयव्हीची तपासणी केलीच पाहिजे. याबाबत पालकांनी तसेच संबंधित वधूवरांनी सामाजिक प्रतिष्ठेचा आव न आणता पुढाकार घेतला पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावातील नागरिकांनी एचआयव्हीची तपासणी केल्याशिवाय मुलामुलींची लग्ने न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे अनुकरण आवश्यक आहे. ‘लोकमत सखी मंच’ आणि अथर्व वधूवर सूचक केंद्रातर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जोडीदार निवडताना’ या कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध विवाह समुपदेशिका प्रियदर्शनी हिंगे.