शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कार्यालयातच मिळणार सेवापुस्तके

By admin | Updated: June 10, 2015 00:27 IST

सहायक कामगार आयुक्त : अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा बांधकाम कामगारांना फटका

कोल्हापूर : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सप्टेंबर २०१४ पूर्वी नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना सेवापुस्तके टप्प्याटप्प्याने मिळतील. नोंदणीची आणि नूतनीकरणाच्या कामांसाठी कामगारांनी कार्यालयात हजर राहावे. अर्जुनी येथील कामगारांची सेवापुस्तके तयार आहेत; पण एक जूनपासून ती नेण्यासाठी कामगार आलेले नाहीत. कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे एकदम सेवापुस्तके देण्यात अडचण असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांनी दिली. बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान द्यावे, सेवापुस्तके त्वरित द्यावीत, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेतर्फे सोमवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. त्यातील मागण्यांचे पुढे काय झाले याची चौकशी केली असता कार्यालयात हजर राहणाऱ्या कामगारांना सेवापुस्तके देण्यात येतील, अशी माहिती कदम यांनी दिली.पन्हाळा तालुक्यातील सुमारे ४३० कामगारांनी सप्टेंबर २०१४ पूर्वी नोंदणीसाठी अर्ज केला आहे. नोंदणीसाठीचा ४३० कामगारांसाठीच्या रकमेचा डीडी भरला आहे; पण या कामगारांना सेवापुस्तके मिळालेली नाहीत. नोंदणी आणि नूतनीकरणासाठी कामगारांना कार्यालयात हजर राहण्याची अट आयुक्त कार्यालय घालत आहे; पण कामगार कार्यालयात आले असता, वेळेत त्यांचे काम होत नाही. हेलपाट्यामुळे कामगारांना आर्थिक भुर्दंड बसतो अशा संघटनेच्या तक्रारी आहेत. ( प्रतिनिधी)महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना २००७ मध्ये झाली. मंडळाकडे जिल्ह्यातील ४२ हजार ५० सदस्य नोंदणीकृत आहेत. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नोंदणी जास्त आहे. पूर्वीच्या आकृतिबंधाप्रमाणे ३३ अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता आहे; पण सध्या १६ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. वेतन निरीक्षकांची आठ व तीन लिपिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा निपटारा होण्यास विलंब होतो. - सुहास कदम, सहायक कामगार आयुक्त बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठीच या मंडळाची स्थापना झाली. नोंदणीकरण आणि सेवापुस्तकाविना कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ होत नाही. अपुऱ्या मनुष्यबळाच्या नावाखाली नोंदणीकरण आणि सेवापुस्तकाला कायद्याच्या चौकटीत अडकवून कामगारांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू नये. - चंद्रकांत यादव,‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष