शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पोटनिवडणुकीच्या तोंडावर सुरू झाली टीकास्त्रांची मालिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST

बेळगाव : निवडणूक आल्या की, एकमेकांविरोधात नेहमीच राजकारणी टीकास्त्र सोडत असतात. काही वेळा या टीका टोकाला पोहोचतात, तर कधी- ...

बेळगाव : निवडणूक आल्या की, एकमेकांविरोधात नेहमीच राजकारणी टीकास्त्र सोडत असतात. काही वेळा या टीका टोकाला पोहोचतात, तर कधी- कधी या टीका हास्यास्पद आणि मनोरंजन करणाऱ्या ठरतात. बेळगावमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या बेळगाव वाऱ्या सुरू झाल्या आहेत. बेळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेले केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशींनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष हा एखाद्या बसस्टँडप्रमाणे असल्याची टिप्पणी त्यांनी केली.

काँग्रेसमध्ये म्हणजे एखाद्या स्टँडप्रमाणे आहे. नंतर या स्टँडचे परिवर्तन बसस्टँडमध्ये आणि बससोबत टेम्पोमध्येदेखील परिवर्तन होते, अशी टिप्पणी प्रल्हाद जोशींनी केली. राज्यात तीन ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होईल, असा ठाम विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. बेळगावमधून निवडणूक लढविणाऱ्या मंगला अंगडी यांचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

राजकारण्यांसाठी नैतिकता महत्त्वाची : जारकीहोळी प्रकरणावर निसटती प्रतिक्रिया

भारतीय जनता ही नेहमीच इतरांना आदर्शवत ठेवून जगते. मग ते राजकारणी असोत किंवा सुपरस्टार! आपल्याकडे जनता पाहते. आपला आदर राखते यासाठी राजकारण्यांनी आणि सामाजिक स्तरावरील सर्व मान्यवरांनी आपली पत आणि नैतिकता राखणे महत्त्वाचे असल्याचे मत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले. आज बेळगाव दौऱ्यावर आलेल्या प्रल्हाद जोशींनी प्रसारमाध्यमांसमोर हे मत व्यक्त केले आहे.

बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणाविषयी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जनता राजकारण्यांना विशेष आदर देते. जनता आपले अनुकरण करते. यामुळे जनमानसात शोभेल आणि आदर्शवत वाटेल, असेच प्रत्येक लोकप्रतिनिधीने वागणे गरजेचे आहे. या प्रकरणाबद्दल मी अधिक काही बोलणार नाही, असे सांगून त्यांनी विषय टाळला. यासोबतच आरोग्यमंत्री के. सुधाकर यांच्या ‘एकपत्नीत्व’ या वक्तव्याचेही त्यांनी खंडन केले. सध्या बेळगावमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या सर्व प्रकरणांचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केलेल्या विकासाची दखल जनता घेईल आणि याची दखल घेऊन भाजप उमेदवाराला नक्की यश मिळवून देतील, असा विश्वासदेखील केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखविला.