शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

कर्नाटकचा संतवचनांना काळिमा : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 1:07 AM

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर ...

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर यांच्या वचनांना काळिमा फासला आहे. यासाठी कर्नाटक सरकारचा त्यांच्याच भूमीत ठामपणे उभे राहून मी जाहीर निषेध करतो, असे परखड मत इदलहोंड (ता. खानापूर, जि.बेळगाव) येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी रविवारी व्यक्त केले.इदलहोंड येथे रविवारी गुंफण सद्भावना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस होते. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बेळगाव पोलीस प्रशासनाने इदलहोंड येथील साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या सहभागावर बंदी घातली. या पार्श्वभूमीवर सबनीस यांनी खानापूर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच सबनीस यांनी इदलहोंड येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे खानापूरयेथूनच उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.कर्नाटकच्या चुकीच्या कृतीने शांततेला धक्कासबनीस म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधव मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचे संवर्धनासाठी झटत आहेत. यामुळेच मी आनंदाने संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले. तथापि कर्नाटक सरकारने दडपशाही करून आम्हाला संमेलनस्थळी जाऊ दिले नाही. कर्नाटक सरकारच्या या चुकीच्या कृतीमुळे शांततेला धक्का लागला आहे. सबनीस म्हणाले, आमचे मराठीवरील प्रेम कानडीच्या द्वेषावर अवलंबून नाही. कानडी ही आमची भगिनी भाषा आहे.साहित्य वादासाठी नव्हे, संवादासाठी : बागवेबेळगाव : वेदना असल्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही, हे साहित्य वादासाठी नाही, तर संवादासाठी आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी अशोक बागवे यांनी केले. कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील बलभीम साहित्य अकादमीतर्फे रविवारी आयोजित १४व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बागवे बोलत होते.कुद्रेमनी(जि.बेळगाव) येथील मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अशोक बागवे उपस्थित होते.