शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कर्नाटकचा संतवचनांना काळिमा : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:07 IST

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर ...

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर यांच्या वचनांना काळिमा फासला आहे. यासाठी कर्नाटक सरकारचा त्यांच्याच भूमीत ठामपणे उभे राहून मी जाहीर निषेध करतो, असे परखड मत इदलहोंड (ता. खानापूर, जि.बेळगाव) येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी रविवारी व्यक्त केले.इदलहोंड येथे रविवारी गुंफण सद्भावना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस होते. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बेळगाव पोलीस प्रशासनाने इदलहोंड येथील साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या सहभागावर बंदी घातली. या पार्श्वभूमीवर सबनीस यांनी खानापूर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच सबनीस यांनी इदलहोंड येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे खानापूरयेथूनच उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.कर्नाटकच्या चुकीच्या कृतीने शांततेला धक्कासबनीस म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधव मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचे संवर्धनासाठी झटत आहेत. यामुळेच मी आनंदाने संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले. तथापि कर्नाटक सरकारने दडपशाही करून आम्हाला संमेलनस्थळी जाऊ दिले नाही. कर्नाटक सरकारच्या या चुकीच्या कृतीमुळे शांततेला धक्का लागला आहे. सबनीस म्हणाले, आमचे मराठीवरील प्रेम कानडीच्या द्वेषावर अवलंबून नाही. कानडी ही आमची भगिनी भाषा आहे.साहित्य वादासाठी नव्हे, संवादासाठी : बागवेबेळगाव : वेदना असल्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही, हे साहित्य वादासाठी नाही, तर संवादासाठी आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी अशोक बागवे यांनी केले. कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील बलभीम साहित्य अकादमीतर्फे रविवारी आयोजित १४व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बागवे बोलत होते.कुद्रेमनी(जि.बेळगाव) येथील मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अशोक बागवे उपस्थित होते.