शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

ज्येष्ठ साहित्यिक गस्ती यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर/बेळगाव : गुन्हेगार जमातीचा शिक्का मारलेल्या बेरड (बेरड-नाईक) समाजाच्या सुधारणांसाठी गेली ४५ वर्षे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि साहित्यिक ‘बेरड’कार डॉ. भीमराव गस्ती (वय ७०) यांचे मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बेळगावजवळील यमनापूर या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.डॉ. गस्ती यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर/बेळगाव : गुन्हेगार जमातीचा शिक्का मारलेल्या बेरड (बेरड-नाईक) समाजाच्या सुधारणांसाठी गेली ४५ वर्षे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि साहित्यिक ‘बेरड’कार डॉ. भीमराव गस्ती (वय ७०) यांचे मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बेळगावजवळील यमनापूर या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.डॉ. गस्ती यांनी देवदासीची कुप्रथा बंद व्हावी यासाठी आयुष्य वेचले. त्यांनी सामाजिक कार्याबरोबरच विपुल लेखनसुद्धा केले आहे. बेरड समाजाच्या व्यथा-वेदना मांडणाºया ‘बेरड’ या त्यांच्या आत्मचरित्राने साहित्य क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.डॉ. गस्ती गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचा मृत्यू न्यूमोनियाने झाल्याचे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगितले. ३ आॅगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची स्वाईन फ्लूची चाचणी करण्यात आली होती. शनिवारी त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली नसल्याचा अहवाल मिळाला होता. त्यांना जंतुसंसर्ग झाला होता; शिवाय त्यांच्या दोन्ही किडन्या काम करीत नव्हत्या. त्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण अधिक होते; तसेच कमी रक्तदाबामुळे ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते, असे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले आहे. अखेर मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन बहिणी, सुना, नातवंडे, काका, आत्या असा मोठा परिवार आहे.पालिकेत वाहिली श्रद्धांजलीबेळगाव महापालिकेतर्फे डॉ. गस्ती यांना आदरांजली वाहण्यात आली. महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, आमदार संभाजी पाटील, पालिका आयुक्त शशिधर कुरेर, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्यासह नगरसेवकांनी पालिकेत मौन पाळून डॉ. गस्ती यांना श्रद्धांजली वाहिली.यमनापूर येथे अंत्यसंस्कारमंगळवारी सकाळी १० वाजता गस्ती यांचे पार्थिव यमनापूर येथे आणण्यात आले. यावेळी भटक्या विमुक्त चळवळीतील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अच्युत माने, प्रा. विठ्ठल बन्ने, माहिती व जनसंपर्क खात्याचे उपसंचालक सतीश लळीत, मधूसुदन व्हटकर (सोलापूर), प्रा. शिवानंद गस्ती, आनंदराव जाधव (सातारा), प्रा. सुनील माने, कल्लापा जंगली, गडहिंग्लजचे बाळेश बंधुनाईक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी यमनापूर येथे गस्ती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.