शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

‘कृष्णा’वर वर्चस्वासाठी बड्या नेत्यांच्या खेळ्या

By admin | Updated: April 17, 2015 00:11 IST

जयंत पाटील तटस्थ : विलासकाका उंडाळकर, पतंगराव कदम यांच्या भूमिकेला महत्त्व

अशोक पाटील -इस्लामपूर -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तिन्ही गटांनी पहिल्या फेरीतच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत, तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वरचष्मा ठेवण्यासाठी माजी आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर आणि आ. पतंगराव कदम यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे, तर आमदार जयंत पाटील तटस्थ आहेत. या तिन्ही माजी मंत्र्यांच्या राजकीय खेळ्या अंतिम टप्प्यात काय रूप घेतात, यावर ‘कृष्णा’चा निकाल ठरणार आहे.‘कृष्णा’च्या सत्ताकारणात कऱ्हाड तालुक्याचे मोठे योगदान आहे. या तालुक्यात २५ हजार सभासद आहेत. या तालुक्यातील विलासकाका उंडाळकरांनी स्वत:च्या गटातील सभासदांच्या जोरावर डॉ. सुरेश भोसले यांना पाठिंबा जाहीर केला आहे, परंतु या दोघांचे मनोमीलन सभासदांना कितपत रुचणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या मनोमीलनावर वाळवा तालुक्यात उलटसुलट चर्चा आहे, कारण विलासकाकांच्या रयत कारखान्याने काही ऊस उत्पादकांची बिले दिलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे. मागील निवडणुकीत विलासकाकांचा गट अविनाश मोहिते यांच्या बाजूने होता. सध्या मात्र कऱ्हाड तालुक्यात अविनाश मोहिते यांची बाजू लंगडी असल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हेही कऱ्हाडचेच. त्यांनी डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते यांना पाठिंबा देऊन विधानसभेचा पैरा फेडण्याचा प्रयत्न चालवला आहे, परंतु चव्हाण यांना सहकारी साखर उद्योगाचा अनुभव नाही. शिवाय ग्रामीण भागात त्यांना जनमत नसल्यामुळे त्यांचा कितपत फायदा होणार, याचीही बेरीज-वजाबाकी सुरू झाली आहे. माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या कडेगाव तालुक्यातही ‘कृष्णा’चे कार्यक्षेत्र आहे. त्यांना साखर उद्योगातील मोठा अनुभव असून, त्यांची साथ डॉ. इंद्रजित मोहिते यांनाच आहे. तथापि कडेगाव तालुक्यात केवळ पाच हजार सभासद असल्याने त्यांचाही म्हणवा तितका प्रभाव पडणार नाही, असे बोलले जाते.अंतिम टप्प्यात डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले, अविनाश मोहिते, विलासकाका उंडाळकर यांची राजकीय आकडेमोड महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत तीन गट उतरले असल्याने वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. मागीलवेळी भोसले गटाचे बहुतांशी कार्यकर्ते अविनाश मोहिते यांच्या गटात सामील झाले होते. यावेळी मात्र पुन्हा ते भोसले गटात परतले आहेत. त्यामुळे डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते, अविनाश मोहिते यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णाची निवडणूक लढवणाऱ्या सर्व पॅनेल प्रमुखांनी वाळवा तालुक्यावर वर्चस्व असलेल्या आ. जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवले आहे.कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत माझी भूमिका तटस्थ राहील. डॉ. पतंगराव कदम, विलासकाका उंडाळकर यांच्या भूमिकेविषयी आपले काहीही मत नाही. राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून चार कारखाने चालविले जात आहेत. साखर उद्योग अडचणीत आल्याने हे कारखाने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ‘कृष्णा’त आम्हाला कसलाही रस नाही. आमचे कार्यकर्ते तिन्ही गटात कार्यरत आहेत. मी कोणत्याही कार्यकर्त्यावर दबाव आणणार नाही.- आ. जयंत पाटील, माजी ग्रामविकासमंत्रीनाईकांचे कार्यकर्ते भोसलेंच्या गोटातशिराळा तालुक्यातील भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे वाळवा तालुक्यातील ४८ गावात वर्चस्व आहे. डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले भाजपमध्ये असल्याने आमदार नाईक यांचे कार्यकर्ते भोसले यांच्या गोटात जाऊन प्रचार करू लागले आहेत.