शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कुलपतींना रोज पत्रे पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:44 IST

कोल्हापूर : राज्यातील सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीवरील बंदी उठविण्यासाठी नेट-सेट, पीएच.डी. पदवीधारक आणि पात्रताधारकांकडून आता थेट कुलपतींना विनंती केली जात आहे. पात्रताधारकांनी पुकारलेल्या आंदोलनातील एक टप्पा म्हणून ही पत्रे (पोस्टकार्ड) पाठविली आहेत.राज्यात ९५११ सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. गेल्या सहा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या रिक्तपदांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. सीएचबीधारक हे ...

कोल्हापूर : राज्यातील सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीवरील बंदी उठविण्यासाठी नेट-सेट, पीएच.डी. पदवीधारक आणि पात्रताधारकांकडून आता थेट कुलपतींना विनंती केली जात आहे. पात्रताधारकांनी पुकारलेल्या आंदोलनातील एक टप्पा म्हणून ही पत्रे (पोस्टकार्ड) पाठविली आहेत.राज्यात ९५११ सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. गेल्या सहा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या रिक्तपदांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. सीएचबीधारक हे भविष्यात कायमस्वरूपी नोकरी मिळेल, या आशेवर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याचे शासनाचे वेळकाढू धोरण आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात राज्यातील संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र सेट-नेट, पीएच.डी. पात्रताधारक संघटनेतर्फे आता सहायक प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविण्यासाठी कुलपतींना पत्रे पाठविण्याची विनंती करणार आहेत. राज्यातून साडेतीन हजार पत्रे पाठविण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.कोल्हापुरातून रोज ४० पत्रे पाठविणारपात्रताधारक आणि सीएचबीधारकांची सद्य:स्थिती पाहता सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीवरील बंदी उठविणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, त्यादृष्टीने शासन आणि सरकारकडून काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे आम्ही राज्यभरात आंदोलन पुकारले आहे, असे महाराष्ट्र सेट-नेट, पीएच.डी., पात्रताधारक संघटनेचे कोल्हापूर समन्वयक डॉ. किशोर खिलारे यांनी सांगितले. ते म्हणाले, याअंतर्गत कुलपतींना पत्रे पाठवून भरती बंदी उठवावी. सहायक प्राध्यापकपदाची भरती सुरू करून आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली आहे. कोल्हापुरातून रोज ४० पत्रे पाठविण्यात येणार आहेत.