शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘बालगोपाल’ उपांत्य फेरीत

By admin | Updated: March 3, 2016 00:45 IST

अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धा : ‘साईनाथ’चा ३-१ ने पराभव

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळाने साईनाथ स्पोर्टस्वर ३-१ अशी सहज मात करीत अस्मिता फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सामन्यात ऋतुराज पाटील, रोहित कुरणे, अशिष कुरणे यांनी चमकदार कामगिरी केली. शाहू स्टेडियम येथे बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रारंभापासून बालगोपाल संघाचे वर्चस्व राहिले. बालगोपालकडून सूरज जाधव, सचिन गायकवाड, अजित पोवार, आकाश भोसले, जयकुमार पाटील यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. १५ व्या मिनिटास बालगोपालच्या सूरज जाधवच्या पासवर ऋतुराज पाटील याने गोल करीत सामन्यात आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. साईनाथकडून नीलेश साळोखे, ऋषिकेश पाटील, अभिजित चौगले, प्रसाद पाटील, निखिल तिबिले, ओंकार खोत यांनी सामन्यात बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. ३५ व्या मिनिटास अशिष कुरणे याने गोल नोंदवीत आघाडी २-० अशी केली. उत्तरार्धात बालगोपाल संघ आघाडी वाढविण्याच्या हेतूने, तर साईनाथ संघ सामन्यात बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला. ४८ व्या मिनिटास बालगोपालच्या सूरज जाधवच्या पासवर रोहित कुरणेने गोल नोंदवीत आपल्या संघाची ३-० अशी आघाडी वाढविली. ७२ व्या मिनिटास बालगोपाल संघाच्या पेनल्टी क्षेत्रात गोलरक्षक अक्षय कुरणे याने साईनाथचा आघाडीवीर ऋषिकेश पाटील याला धोकादायकरीत्या अडविले. याबद्दल मुख्य पंचांनी साईनाथ संघास पेनल्टी बहाल केली. यावर ऋषिकेश पाटीलने गोल नोंदवीत सामन्यात ३-१ने आघाडी कमी केली. अखेरपर्यंत बालगोपाल संघाकडून सामन्यावर वर्चस्व राहिल्याने सामना बालगोपाल संघाने ३-१ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. (प्रतिनिधी)