शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हमीभावापेक्षा कमी दराने साखर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:37 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपये केला असला तरी, ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपये केला असला तरी, राज्यातील काही साखर कारखाने त्यापेक्षा कमी दराने साखरेची विक्री करीत आहेत. प्रतिक्विंटल ५० पासून १०० रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांना सवलत देत असल्याने साखरेचे मार्केट अस्थिर बनले आहे. याबाबतची तक्रार ‘इस्मा’ (इंडियन शुगर मिल असोसिएशन)ने केंद्र सरकारकडे केली आहे.अनिश्चित भावामुळे साखर उद्योगासमोर नेहमीच अडचणी असतात. यंदा साखर कारखान्यांना कधी नव्हे इतका अडचणीचा हंगाम गेला. साखरेचा प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर गृहीत धरून ‘एफआरपी’ निश्चित केली. उसाची एफआरपी आणि साखरेचा दर, त्यावर बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ कारखान्यांना बसत नाही.टनाला ४५० ते ५०० रुपयांची तफावत राहत असल्याने कारखानदारांनी सरकारने मदत करावी, अशी मागणी केली. अडचणीतील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने या हंगामात साखरेचा किमान हमीभाव ठरविला. त्यात वाढ करीत प्रतिक्विंटल ३१०० रुपये केल्याने उद्योगाला थोडासा दिलासा मिळाला. साखरेचा हमीभाव निश्चित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने साखर उद्योगाला मदत होईल, अशी अपेक्षा होती; पण साखरेचा नेमून दिलेला कोटा संपविणे व शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत देण्यासाठी काही साखर कारखाने व्यापाऱ्यांना कमी दराने साखर विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.कोल्हापूर, पुणे विभागांतील काही कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. हे कारखाने क्विंटलला ५० पासून १०० रुपये सवलत देत असल्याने सर्वच कारखान्यांकडे व्यापारी तशी मागणी करू लागले आहेत.त्यामुळे संपूर्ण साखरेचे मार्केट अस्थिर बनले आहे. याबाबत ‘इस्मा’ने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे तक्रार करून संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.साखर विक्रीचा अतिरिक्त कोटादेशातील साखर कारखान्यांना मार्च महिन्यात २४.५ लाख टन साखर विक्रीचा कोटा सरकारने दिला आहे. साधारणत: महिन्याला २० लाख टन साखर विक्री होते. अतिरिक्त ४.५ लाख टन साखर विकायची कशी? असा पेच निर्माण झाला आहे. मार्च व एप्रिल महिन्याचा ४० लाख टनांचा कोटा देण्याची मागणी ‘इस्मा’ने केंद्राकडे केली आहे.पंजाब सरकारकडून मदतउत्तर प्रदेश, हरयाणापाठोपाठ पंजाब सरकारने ‘एसएपी’ देण्यासाठी कमी पडणारी रक्कम कारखान्यांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. पंजाब सरकारने प्रतिक्विंटल साखरेवर २५ रुपये म्हणजे उसाला प्रतिटन २५० रुपये मदत दिली आहे. त्याप्रमाणे महाराष्टÑ सरकारने मदत करण्याची मागणी पुढे येत आहे.