शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

सलग दुसऱ्या दिवशी वाळवाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:23 IST

कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याला वळवाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले. विजांचा कडकडाट झाला तरी कुठेही अनुचित घटना घडली ...

कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याला वळवाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले. विजांचा कडकडाट झाला तरी कुठेही अनुचित घटना घडली नाही. काही ठिकाणी हुलकावणी, तर कुठे जोरदार आलेल्या या पावसाने उकाड्याने हैराण जिवाला गारव्याची अनुभूती दिली.

या पावसाचा उन्हाळी पिकाच्या काढणीवर परिणाम होणार असला तरी ऊस पिकासाठी पाऊस पोषक असल्याने शेतकरी सुखावला आहे. शुक्रवारी मध्य रात्रीपर्यंत पाऊस पडल्याने शनिवारी सकाळपासूनच कुंद आणि दमट वातावरण होते. प्रचंड उष्माही जाणवत होता. दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढला आणि त्यापाठोपाठ सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवातही झाली. जोरदार आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली तरी दिवसभराच्या उष्म्यापासूनही दिलासा मिळाला. अजून दोन दिवस पावसाचे राहतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी बहुतांश लोक घरातच होते. शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे बऱ्याच गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो लवकर पूर्ववत न झाल्याने घरी असूनही लोकांना सुटीचा आनंद घेता आला नाही. निवांतपणे क्रिकेट सामने पाहण्याच्या आनंदावरही पाणी सोडावे लागले.

शेतकऱ्यांची धांदल

वळवाच्या या जोरदार बरसणाऱ्या सरीमुळे शेतीच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. तथापि, या पावसाने मात्र पशुपालकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. वाळली वैरण पावसात भिजू नये म्हणून ती व्यवस्थित रचून ठेवण्याची लगबग उडाल्याचे चित्र गावात सर्वत्र दिसत आहे.