शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

यंदा हंगाम तीन महिन्यांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:52 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि अतिवृष्टीने हे कोठार यंदा रितच राहणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उसाचे ८० लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तविला जात असून, गळीत हंगाम तीन महिने चालविताना साखर कारखान्यांची दमछाक होणार आहे. उसाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहेच, त्याचबरोबर अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडलेले साखर कारखाने आणखी अडचणीत येणार, हे मात्र निश्चित आहे.राज्याच्या एकूण ऊस उत्पादनापैकी ३० टक्के ऊस हा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उत्पादित होतो. मागील हंगामात राज्यात ९ कोटी ५१ लाख टन गाळप झाले होते, त्यामध्ये सर्वाधिक दोन कोटी १६ लाख गाळप कोल्हापूर विभागाचे होते. विशेष म्हणजे अवघ्या ३८ कारखान्यांनी हे गाळप केले असून, साखर उताºयातही हा विभाग आघाडीवर राहिला; पण यंदा हे कोठार अडचणीत सापडले आहे. जुलै-आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरवरील ऊस बाधित झाला आहे. त्याच पटीत सांगली जिल्ह्यातील उसाचे नुकसान झाले. पूरबाधित नाही तिथे एकसारख्या पावसाने वाढ खुंटली. ज्या काळात उसाची वाढ झपाट्याने होते, त्याच काळात पाऊस राहिल्याने वाढीवर परिणाम झाला; त्यामुळे पूरबाधित उसाचे ५० टक्क्याने, तर इतर उसाचे २० ते २५ टक्क्यांनी उत्पादन घटणार आहे. सरासरी ३५ टक्के घट जरी झाली, तरी गेल्या हंगामापेक्षा ८० लाख टन उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामध्ये कोल्हापुरात ८० ते ९० लाख टन, तर सांगलीत ५५ ते ६० लाख टनापर्यंत उत्पादन खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकरकमी ‘एफआरपी’वर ठाम?महापूर व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; त्यामुळे किमान एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यावर ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना ठाम राहणार आहे. मागील हंगामात बहुतांशी कारखान्यांनी दोन, तर काही कारखान्यांनी तीन टप्प्यांत एफआरपी दिली होती. तोच फॉर्म्युला यावर्षी राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.हंगाम महिनाभर लांबणीवरकर्नाटकात आॅक्टोबर अखेरीस हंगाम सुरू होत असल्याने सोलापूर, सांगली व कोल्हापुरातील सीमाभागातील कारखान्यांची १ नोव्हेंबरलाच धुराडी पेटत होती.यंदा मात्र परतीच्या पावसाने शिवारात पाणी उभे आहे, पाणी कमी होऊन जमिनीला वापसा येण्यास अजून १५ दिवस लागणार आहेत; त्यामुळे जर पाऊस थांबला, तर १५ नोव्हेंबरनंतर काही कारखाने सुरू होतील, अन्यथा नोव्हेंबरच्या शेवटचा आठवडा उजाडू शकतो.कारखाना अन् ‘एफआरपी’ रक्कमशाहू २८७८हमिदवाडा २९५३बिद्री २९६४भोगावती २८३७घोरपडे २६६९कुंभी २९२९जवाहर २८७४शिरोळ २८३५शरद २८२७गुरुदत्त ३०७०पंचगंगा २९४६आजरा २७४६राजाराम २७७१वारणा २६००दालमिया ३०१७गडहिंग्लज २७०३डी. वाय. २७६९गायकवाड २८२८इको केन २६१७हेमरस २८७०महाडिक २३१७तांबाळे २६३८