शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा हंगाम तीन महिन्यांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:52 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि अतिवृष्टीने हे कोठार यंदा रितच राहणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उसाचे ८० लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तविला जात असून, गळीत हंगाम तीन महिने चालविताना साखर कारखान्यांची दमछाक होणार आहे. उसाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहेच, त्याचबरोबर अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडलेले साखर कारखाने आणखी अडचणीत येणार, हे मात्र निश्चित आहे.राज्याच्या एकूण ऊस उत्पादनापैकी ३० टक्के ऊस हा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उत्पादित होतो. मागील हंगामात राज्यात ९ कोटी ५१ लाख टन गाळप झाले होते, त्यामध्ये सर्वाधिक दोन कोटी १६ लाख गाळप कोल्हापूर विभागाचे होते. विशेष म्हणजे अवघ्या ३८ कारखान्यांनी हे गाळप केले असून, साखर उताºयातही हा विभाग आघाडीवर राहिला; पण यंदा हे कोठार अडचणीत सापडले आहे. जुलै-आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरवरील ऊस बाधित झाला आहे. त्याच पटीत सांगली जिल्ह्यातील उसाचे नुकसान झाले. पूरबाधित नाही तिथे एकसारख्या पावसाने वाढ खुंटली. ज्या काळात उसाची वाढ झपाट्याने होते, त्याच काळात पाऊस राहिल्याने वाढीवर परिणाम झाला; त्यामुळे पूरबाधित उसाचे ५० टक्क्याने, तर इतर उसाचे २० ते २५ टक्क्यांनी उत्पादन घटणार आहे. सरासरी ३५ टक्के घट जरी झाली, तरी गेल्या हंगामापेक्षा ८० लाख टन उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामध्ये कोल्हापुरात ८० ते ९० लाख टन, तर सांगलीत ५५ ते ६० लाख टनापर्यंत उत्पादन खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकरकमी ‘एफआरपी’वर ठाम?महापूर व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; त्यामुळे किमान एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यावर ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना ठाम राहणार आहे. मागील हंगामात बहुतांशी कारखान्यांनी दोन, तर काही कारखान्यांनी तीन टप्प्यांत एफआरपी दिली होती. तोच फॉर्म्युला यावर्षी राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.हंगाम महिनाभर लांबणीवरकर्नाटकात आॅक्टोबर अखेरीस हंगाम सुरू होत असल्याने सोलापूर, सांगली व कोल्हापुरातील सीमाभागातील कारखान्यांची १ नोव्हेंबरलाच धुराडी पेटत होती.यंदा मात्र परतीच्या पावसाने शिवारात पाणी उभे आहे, पाणी कमी होऊन जमिनीला वापसा येण्यास अजून १५ दिवस लागणार आहेत; त्यामुळे जर पाऊस थांबला, तर १५ नोव्हेंबरनंतर काही कारखाने सुरू होतील, अन्यथा नोव्हेंबरच्या शेवटचा आठवडा उजाडू शकतो.कारखाना अन् ‘एफआरपी’ रक्कमशाहू २८७८हमिदवाडा २९५३बिद्री २९६४भोगावती २८३७घोरपडे २६६९कुंभी २९२९जवाहर २८७४शिरोळ २८३५शरद २८२७गुरुदत्त ३०७०पंचगंगा २९४६आजरा २७४६राजाराम २७७१वारणा २६००दालमिया ३०१७गडहिंग्लज २७०३डी. वाय. २७६९गायकवाड २८२८इको केन २६१७हेमरस २८७०महाडिक २३१७तांबाळे २६३८