शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

यंदा हंगाम तीन महिन्यांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:52 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि अतिवृष्टीने हे कोठार यंदा रितच राहणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उसाचे ८० लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तविला जात असून, गळीत हंगाम तीन महिने चालविताना साखर कारखान्यांची दमछाक होणार आहे. उसाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहेच, त्याचबरोबर अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडलेले साखर कारखाने आणखी अडचणीत येणार, हे मात्र निश्चित आहे.राज्याच्या एकूण ऊस उत्पादनापैकी ३० टक्के ऊस हा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उत्पादित होतो. मागील हंगामात राज्यात ९ कोटी ५१ लाख टन गाळप झाले होते, त्यामध्ये सर्वाधिक दोन कोटी १६ लाख गाळप कोल्हापूर विभागाचे होते. विशेष म्हणजे अवघ्या ३८ कारखान्यांनी हे गाळप केले असून, साखर उताºयातही हा विभाग आघाडीवर राहिला; पण यंदा हे कोठार अडचणीत सापडले आहे. जुलै-आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरवरील ऊस बाधित झाला आहे. त्याच पटीत सांगली जिल्ह्यातील उसाचे नुकसान झाले. पूरबाधित नाही तिथे एकसारख्या पावसाने वाढ खुंटली. ज्या काळात उसाची वाढ झपाट्याने होते, त्याच काळात पाऊस राहिल्याने वाढीवर परिणाम झाला; त्यामुळे पूरबाधित उसाचे ५० टक्क्याने, तर इतर उसाचे २० ते २५ टक्क्यांनी उत्पादन घटणार आहे. सरासरी ३५ टक्के घट जरी झाली, तरी गेल्या हंगामापेक्षा ८० लाख टन उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामध्ये कोल्हापुरात ८० ते ९० लाख टन, तर सांगलीत ५५ ते ६० लाख टनापर्यंत उत्पादन खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकरकमी ‘एफआरपी’वर ठाम?महापूर व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; त्यामुळे किमान एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यावर ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना ठाम राहणार आहे. मागील हंगामात बहुतांशी कारखान्यांनी दोन, तर काही कारखान्यांनी तीन टप्प्यांत एफआरपी दिली होती. तोच फॉर्म्युला यावर्षी राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.हंगाम महिनाभर लांबणीवरकर्नाटकात आॅक्टोबर अखेरीस हंगाम सुरू होत असल्याने सोलापूर, सांगली व कोल्हापुरातील सीमाभागातील कारखान्यांची १ नोव्हेंबरलाच धुराडी पेटत होती.यंदा मात्र परतीच्या पावसाने शिवारात पाणी उभे आहे, पाणी कमी होऊन जमिनीला वापसा येण्यास अजून १५ दिवस लागणार आहेत; त्यामुळे जर पाऊस थांबला, तर १५ नोव्हेंबरनंतर काही कारखाने सुरू होतील, अन्यथा नोव्हेंबरच्या शेवटचा आठवडा उजाडू शकतो.कारखाना अन् ‘एफआरपी’ रक्कमशाहू २८७८हमिदवाडा २९५३बिद्री २९६४भोगावती २८३७घोरपडे २६६९कुंभी २९२९जवाहर २८७४शिरोळ २८३५शरद २८२७गुरुदत्त ३०७०पंचगंगा २९४६आजरा २७४६राजाराम २७७१वारणा २६००दालमिया ३०१७गडहिंग्लज २७०३डी. वाय. २७६९गायकवाड २८२८इको केन २६१७हेमरस २८७०महाडिक २३१७तांबाळे २६३८