शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ग्रामीण मैदानी खेळ काळाच्या जाताहेत पडद्याआड

By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST

मैदाने ओस : टी.व्ही., मोबाईल, व्हिडीओ गेम, कार्टुन पाहण्यातच मुले मग्न

सतीश पाटील -शिरोली -वर्षानुवर्षे चालत आलेले ग्रामीण भागातील मैदानी खेळ आधुनिकीकरणामुळे लोप पावत चालले आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत ग्रामीण आणि शहरी भागातील मुले मैदानी खेळाऐवजी टी. व्ही., मोबाईल, व्हिडीओ गेम पाहण्यातच मग्न आहेत. त्यामुळे हे ग्रामीणबाज असलेले मैदानी खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मे महिन्यात उन्हाळ्याची सुटी पडली की, ग्रामीण भागात पूर्वी लहान मुले विटीदांडू, गलोरी, लगोरी, सुरपारंब्या, लपाछपी, आमरे गोट्या, कुईकुई जामीन कोण, टायर फिरविणे, भवरा, आट्यापाट्या, अबाधबी, आर मारणे हे मुलांचे खेळ, तर जेवणापाण्याने खेळणे, काचकवडी, जिबली, दोरी उड्या, लंगडी, खड्यांनी खेळणे हे मुलींचे खेळ पूर्वी खेळले जात होते. हे खेळ खेळत असताना दिवसभर गल्ली मुलांच्या आवाजाने, दंग्याने गजबजून जात होती. या खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढही होते आणि मुलांच्यात प्रतिकारशक्ती वाढते; पण सध्या जग बदलत आहे. या बदलत्या काळाबरोबर खेळही बदलले आहेत. मुलांच्या हातात विटीदांडू, भवरा यांच्याऐवजी मोबाईल आला आहे. मुले मोबाईलवर गेम खेळण्यातच रमत आहेत. मोबाईलबरोबरच टी.व्ही.वरील कार्टुन दिवसभर बघत बसणे, व्हिडीओ गेम यामुळे मुलांनी ग्रामीण खेळांकडे पाठ फिरविली आहे; पण या आधुनिक मोबाईल आणि टी.व्ही.मुळे मुलांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होत आहे. मुले चिडचिडी बनत असून, त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे मुलांनी आजही ग्रामीण खेळ खेळणे गरजेचे आहे. ग्रामीण खेळाचा बाज नष्ट झाला आहे. मुले पाश्चात्त्य खेळ स्वीकारू लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. या खेळांचा जीवनाशी असलेला संबंध नष्ट होत आहे. इंटरनेट, व्हॉटस् अ‍ॅपमुळे शारीरिक व्यायाम नष्ट होऊ लागला आहे. भविष्यात मुले निष्क्रीय बनण्याची शक्यता आहे.जुनं ते सोनंच. मुलांनी विटीदांडू, आट्यापाट्या हे खेळ खेळले पाहिजेत. आता पालकांनी स्केटिंगसारखे खेळ मुलींना शिकविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण खेळावर क्रिकेटने अतिक्रमण केले आहे; पण ग्रामीण खेळ मुलांनी आजही खेळले पाहिजेत. - आर. डी. पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटना.ग्रामीण भागातील खेळांमुळे मुलांचा सर्वांगीण व्यायाम होत होता; पण पाश्चात्त्य खेळांमुळे हे ग्रामीण भागातील खेळ नष्ट होत चालले आहेत. मुले तंदुरुस्त राहण्यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन ग्रामीण खेळ खेळण्यास प्रवृत्त केले पाहिजे.- एस. डी. लाड, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ.काय केले पाहिजेपालकांनी मुलांना मुक्तपणे खेळायला सोडले पाहिजे.मुलांना मोबाईल देऊ नये.सुटीत टी.व्ही.वरील कार्टुन पाहण्यास नकार द्यावा.त्याऐवजी मैदानावर ग्रामीण खेळ खेळायला घेऊन गेले पाहिजे.