शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

ग्रामीण मैदानी खेळ काळाच्या जाताहेत पडद्याआड

By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST

मैदाने ओस : टी.व्ही., मोबाईल, व्हिडीओ गेम, कार्टुन पाहण्यातच मुले मग्न

सतीश पाटील -शिरोली -वर्षानुवर्षे चालत आलेले ग्रामीण भागातील मैदानी खेळ आधुनिकीकरणामुळे लोप पावत चालले आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत ग्रामीण आणि शहरी भागातील मुले मैदानी खेळाऐवजी टी. व्ही., मोबाईल, व्हिडीओ गेम पाहण्यातच मग्न आहेत. त्यामुळे हे ग्रामीणबाज असलेले मैदानी खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मे महिन्यात उन्हाळ्याची सुटी पडली की, ग्रामीण भागात पूर्वी लहान मुले विटीदांडू, गलोरी, लगोरी, सुरपारंब्या, लपाछपी, आमरे गोट्या, कुईकुई जामीन कोण, टायर फिरविणे, भवरा, आट्यापाट्या, अबाधबी, आर मारणे हे मुलांचे खेळ, तर जेवणापाण्याने खेळणे, काचकवडी, जिबली, दोरी उड्या, लंगडी, खड्यांनी खेळणे हे मुलींचे खेळ पूर्वी खेळले जात होते. हे खेळ खेळत असताना दिवसभर गल्ली मुलांच्या आवाजाने, दंग्याने गजबजून जात होती. या खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढही होते आणि मुलांच्यात प्रतिकारशक्ती वाढते; पण सध्या जग बदलत आहे. या बदलत्या काळाबरोबर खेळही बदलले आहेत. मुलांच्या हातात विटीदांडू, भवरा यांच्याऐवजी मोबाईल आला आहे. मुले मोबाईलवर गेम खेळण्यातच रमत आहेत. मोबाईलबरोबरच टी.व्ही.वरील कार्टुन दिवसभर बघत बसणे, व्हिडीओ गेम यामुळे मुलांनी ग्रामीण खेळांकडे पाठ फिरविली आहे; पण या आधुनिक मोबाईल आणि टी.व्ही.मुळे मुलांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होत आहे. मुले चिडचिडी बनत असून, त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे मुलांनी आजही ग्रामीण खेळ खेळणे गरजेचे आहे. ग्रामीण खेळाचा बाज नष्ट झाला आहे. मुले पाश्चात्त्य खेळ स्वीकारू लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. या खेळांचा जीवनाशी असलेला संबंध नष्ट होत आहे. इंटरनेट, व्हॉटस् अ‍ॅपमुळे शारीरिक व्यायाम नष्ट होऊ लागला आहे. भविष्यात मुले निष्क्रीय बनण्याची शक्यता आहे.जुनं ते सोनंच. मुलांनी विटीदांडू, आट्यापाट्या हे खेळ खेळले पाहिजेत. आता पालकांनी स्केटिंगसारखे खेळ मुलींना शिकविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण खेळावर क्रिकेटने अतिक्रमण केले आहे; पण ग्रामीण खेळ मुलांनी आजही खेळले पाहिजेत. - आर. डी. पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटना.ग्रामीण भागातील खेळांमुळे मुलांचा सर्वांगीण व्यायाम होत होता; पण पाश्चात्त्य खेळांमुळे हे ग्रामीण भागातील खेळ नष्ट होत चालले आहेत. मुले तंदुरुस्त राहण्यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन ग्रामीण खेळ खेळण्यास प्रवृत्त केले पाहिजे.- एस. डी. लाड, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ.काय केले पाहिजेपालकांनी मुलांना मुक्तपणे खेळायला सोडले पाहिजे.मुलांना मोबाईल देऊ नये.सुटीत टी.व्ही.वरील कार्टुन पाहण्यास नकार द्यावा.त्याऐवजी मैदानावर ग्रामीण खेळ खेळायला घेऊन गेले पाहिजे.