शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नगरसचिवपदाच्या कार्यभाराचा पेच

By admin | Updated: May 26, 2016 00:19 IST

आज स्थायी सभा : उमेश रणदिवे रजेवर; इतर अधिकाऱ्यांचा कार्यभारास नकार

कोल्हापूर : महानगरपालिकेचे नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे अचानक रजा काढून गेल्यामुळे त्यांच्याकडील नगरसचिवपदाचा कार्यभार स्वीकारण्यास कोणी अधिकारी तयार झालेला नाही. बुधवारी दिवसभर या पदाचा कार्यभार सांभाळील अशा सक्षम अधिकाऱ्याचा शोध सुरू होता; पण सायंकाळपर्यंत त्यात अधिकाऱ्यांना अपयश आले. दरम्यान, आज, गुरुवारी सकाळी स्थायी समितीची सभा होत आहे. महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षातून नगरसचिव उमेश रणदिवे यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाव येत असल्याने त्यांनी आपल्याकडील नगरसचिवपदाचा कार्यभार काढून घ्यावा, अशी विनंती आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे; पण आयुक्तांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. सध्या ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून सुनील कदम यांना घेण्याच्या ठरावावरून सभागृहातील सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे रणदिवे यांच्यावरील हा दबाव अधिकच वाढला आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारपासून अचानक रजा काढली असून सोमवार (दि. ३०) पासून ते दीर्घ मुदतीच्या रजेवर जाण्याचा विचार करीत आहेत.आज, गुरुवारी स्थायी समितीची सभा होत आहे. त्यामुळे नगरसचिवपदाचा कार्यभार तात्पुरता कोणाकडे तरी सोपवावा लागणार आहे. त्यामुळे उपायुक्त विजय खोराटे सकाळपासून सक्षम अधिकाऱ्याच्या शोधात होते. त्यांनी दोन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली; पण त्यांनी हा पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून तो मंजूर करण्याच्या हालचाली पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत. या ठरावाद्वारे राज्य सरकारकडे त्यांच्या बदलीची मागणी करण्यात येणार आहे. १६ एप्रिलला झालेल्या सभेत हा ठराव करण्यात यावा, असा आग्रह नगरसेवकांना धरला, परंतु असा ठराव आयत्या वेळी घेता येत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याने तो मागे ठेवण्यात आला होता. आयुक्त पी. शिवशंकर नगरसेवकांची कायदेशीर कामे करत नाहीत, नगरसेवकांचा सन्मान राखत नाहीत, त्यांचा प्रशासनावर वचक नाही, एखाद्या फाईलवर निर्णय घ्यायला जाणीवपूर्वक विलंब लावतात, असे आक्षेप त्यांच्या कामकाजावर घेण्यात आले आहेत. १६ एप्रिलला कारभारी नगरसेवकांनी पुढाकार घेत तातडीने ७२ नगरसेवकांच्या सह्या घेऊन आयुक्तांवर अविश्वास दाखवून बदलीचा ठराव करावा, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांच्याकडे करण्यात आली होती; परंतु आयुक्तांच्या बदलीचा ठराव असा अचानक सभेत चर्चेला घेत येणार नाही. तो विषय अजेंड्यावर घ्यावा लागेल, असे स्पष्टीकरण देण्यात आल्यामुळे हा ठराव मागे ठेवण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक पुन्हा हा बदलीचा ठराव करण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. त्यास काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे; पण भाजप-ताराराणी आघाडी त्याला विरोध करण्याची शक्यता आहे.