शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘अज्ञानेश्वर की विज्ञानेश्वर- विज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:41 IST

एकविसावे शतक हे विज्ञानयुग असेल,’ असे म्हणत एकविसावे शतक आले. त्यातील दोन दशके संपतसुद्धा आली. यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतवासीयांना आधुनिक, सशक्त, सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न दाखविले.

- डॉ. व्ही. एन. शिंदेएकविसावे शतक हे विज्ञानयुग असेल,’ असे म्हणत एकविसावे शतक आले. त्यातील दोन दशके संपतसुद्धा आली. यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतवासीयांना आधुनिक, सशक्त, सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न दाखविले. आम्ही ते मनावर घेतले. सर्वांना वाटू लागले भारत महासत्ता बनणार. ते स्वप्न एका वास्तवावर आधारित होते. देशातील लोकसंख्येत या कालखंडात तरुणांची संख्या सर्वाधिक असणार. तरुण म्हणजे नवचैतन्याचा झरा. ‘नवे ते हवे’ म्हणत, स्वप्नांच्या मागे पळणारा. सर्वस्व पणाला लावणारा. तरुणाईने मनावर घेतले तर भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मात्र, आपण त्या दिशेने जात आहोत का?

हा प्रश्न पडण्याचे कारण, नुकतीच ‘लोकमत’मध्ये बातमी आली. मेळघाटातील चाकर्दा गावखेड्यात एका वृद्धाच्या जखमेत अळ्या झाल्या. ही बातमी बाहेर समजली. या घटनेमुळे गावाने त्या दिवशी उपवास केला. झाले असे की, त्या गावातील एका वृद्धाच्या पायाला दुचाकीचा सायलेन्सर भाजला. त्या वृद्धाला मधुमेह आहे. जखम भरून येत नव्हती. त्याच्या जखमेत अळ्या झाल्या. जर कोणाच्या जखमेत अळ्या झाल्या, तर म्हणे गावात वाघ येतो. या वृद्धाच्या जखमेत अळ्या पडल्याची बातमी पसरली आणि गावात पेटलेल्या चुली विझविण्यात आल्या. त्या वृद्धाला तेथील पुजाऱ्याने गावाबाहेर नेले. नदीकाठी पूजा आणि विधी केले. जखमींवर उपचार केले. अळ्या बाहेर काढल्या. त्या व्यक्तीला कोपºयात खड्डा खोदून त्यावर बसविले. तेथे अग्नी पेटविला. ‘भागो रे भागो, तेरा घर जल रहा है’ असे म्हणताच, ती व्यक्ती तेथून बाहेर पडली. त्यानंतर गावातील चुली पेटल्या.

तोपर्यंत अख्खा गाव उपाशी होता. ही बातमी वाचून प्रश्न पडला, खरंच आपण महासत्ता बनणार का? आजपर्यंत ज्या राष्ट्रांनी जगाचे नेतृत्व केले, त्या राष्ट्रांबाबत दोन गोष्टी समान आहेत. एक म्हणजे या राष्ट्रांनी त्यापूर्वी सर्वसमावेशकता जपली होती. दुसरे त्या राष्ट्रांनी विज्ञानाची कास पकडली होती. आपण पहिल्या गोष्टीमध्ये कोठे आहोत? यावर भाष्य करणार नाही. मात्र विज्ञानाची कास आपण खरंच पकडली आहे का? याचा विचार जरूर करणार आहोत.विज्ञान आणि शास्त्र यांत एक साम्य आहे ते म्हणजे हे नियमाला धरून असते. शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाची नियमाला धरून मांडणी करणे. हे नियम स्थल, कालसापेक्ष असू शकतात. अनेकदा व्यक्तिसापेक्षही असतात. यामुळे भाषाशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सारे काही शास्त्र बनते. विज्ञानाचे मात्र तसे नाही. विज्ञानाची मांडणी नियमावरच असते. मात्र, हे नियम स्थल, काल, व्यक्तिसापेक्ष नसतात.

यातून केवळ विज्ञानशास्त्र राहते. फिजिक्स त्यामुळेच मराठीमध्ये पदार्थविज्ञानशास्त्र बनते. ते निखळ सत्य असते. हे सत्य जाणून घेण्याचा हक्क सर्वांना आहे. मात्र, तो अनेक कारणांनी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. काहीवेळा पोहोचू दिला जात नाही. सर्वसामान्य माणसे त्याचा शोध घेऊ शकत नाहीत. त्यांच्याजवळ इतका वेळही असत नाही. त्यामुळे तो सत्यापर्यंत पोहोचत नाही. अशा सर्वसामान्य वैज्ञानिक विचारसरणी नसणाºया लोकांना मग अवैज्ञानिक गोष्टींनी भारावून टाकत, वैज्ञानिक प्रयोगांना चमत्कार म्हणून सांगत फसवले जाते. त्यातून पुढे अंधश्रद्धा निर्माण होतात. असा अंधश्रद्ध समाज कर्मकांडात रूतून बसतो आणि त्याची क्रयशक्ती राष्ट्रबांधणीसाठी वापरली जात नाही. त्यातून चाकार्दासारख्या घटना घडतात.

जखमीला डॉक्टरकडून नव्हे पुजाºयाकडून उपाय होतात. एकीकडे आपण अवकाशात माणूस पाठवणारा चवथा देश बनणार आहोत. तर दुसरीकडे चाकार्दा. म्हणून सामर्थ्यशाली भारत बनवण्यासाठी आपण अज्ञानेश्वर न राहत, विज्ञानाची कास पकडत विज्ञानेश्वर व्हायला हवे.(लेखक विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत.)