शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘अज्ञानेश्वर की विज्ञानेश्वर- विज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:41 IST

एकविसावे शतक हे विज्ञानयुग असेल,’ असे म्हणत एकविसावे शतक आले. त्यातील दोन दशके संपतसुद्धा आली. यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतवासीयांना आधुनिक, सशक्त, सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न दाखविले.

- डॉ. व्ही. एन. शिंदेएकविसावे शतक हे विज्ञानयुग असेल,’ असे म्हणत एकविसावे शतक आले. त्यातील दोन दशके संपतसुद्धा आली. यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतवासीयांना आधुनिक, सशक्त, सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न दाखविले. आम्ही ते मनावर घेतले. सर्वांना वाटू लागले भारत महासत्ता बनणार. ते स्वप्न एका वास्तवावर आधारित होते. देशातील लोकसंख्येत या कालखंडात तरुणांची संख्या सर्वाधिक असणार. तरुण म्हणजे नवचैतन्याचा झरा. ‘नवे ते हवे’ म्हणत, स्वप्नांच्या मागे पळणारा. सर्वस्व पणाला लावणारा. तरुणाईने मनावर घेतले तर भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मात्र, आपण त्या दिशेने जात आहोत का?

हा प्रश्न पडण्याचे कारण, नुकतीच ‘लोकमत’मध्ये बातमी आली. मेळघाटातील चाकर्दा गावखेड्यात एका वृद्धाच्या जखमेत अळ्या झाल्या. ही बातमी बाहेर समजली. या घटनेमुळे गावाने त्या दिवशी उपवास केला. झाले असे की, त्या गावातील एका वृद्धाच्या पायाला दुचाकीचा सायलेन्सर भाजला. त्या वृद्धाला मधुमेह आहे. जखम भरून येत नव्हती. त्याच्या जखमेत अळ्या झाल्या. जर कोणाच्या जखमेत अळ्या झाल्या, तर म्हणे गावात वाघ येतो. या वृद्धाच्या जखमेत अळ्या पडल्याची बातमी पसरली आणि गावात पेटलेल्या चुली विझविण्यात आल्या. त्या वृद्धाला तेथील पुजाऱ्याने गावाबाहेर नेले. नदीकाठी पूजा आणि विधी केले. जखमींवर उपचार केले. अळ्या बाहेर काढल्या. त्या व्यक्तीला कोपºयात खड्डा खोदून त्यावर बसविले. तेथे अग्नी पेटविला. ‘भागो रे भागो, तेरा घर जल रहा है’ असे म्हणताच, ती व्यक्ती तेथून बाहेर पडली. त्यानंतर गावातील चुली पेटल्या.

तोपर्यंत अख्खा गाव उपाशी होता. ही बातमी वाचून प्रश्न पडला, खरंच आपण महासत्ता बनणार का? आजपर्यंत ज्या राष्ट्रांनी जगाचे नेतृत्व केले, त्या राष्ट्रांबाबत दोन गोष्टी समान आहेत. एक म्हणजे या राष्ट्रांनी त्यापूर्वी सर्वसमावेशकता जपली होती. दुसरे त्या राष्ट्रांनी विज्ञानाची कास पकडली होती. आपण पहिल्या गोष्टीमध्ये कोठे आहोत? यावर भाष्य करणार नाही. मात्र विज्ञानाची कास आपण खरंच पकडली आहे का? याचा विचार जरूर करणार आहोत.विज्ञान आणि शास्त्र यांत एक साम्य आहे ते म्हणजे हे नियमाला धरून असते. शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाची नियमाला धरून मांडणी करणे. हे नियम स्थल, कालसापेक्ष असू शकतात. अनेकदा व्यक्तिसापेक्षही असतात. यामुळे भाषाशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सारे काही शास्त्र बनते. विज्ञानाचे मात्र तसे नाही. विज्ञानाची मांडणी नियमावरच असते. मात्र, हे नियम स्थल, काल, व्यक्तिसापेक्ष नसतात.

यातून केवळ विज्ञानशास्त्र राहते. फिजिक्स त्यामुळेच मराठीमध्ये पदार्थविज्ञानशास्त्र बनते. ते निखळ सत्य असते. हे सत्य जाणून घेण्याचा हक्क सर्वांना आहे. मात्र, तो अनेक कारणांनी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. काहीवेळा पोहोचू दिला जात नाही. सर्वसामान्य माणसे त्याचा शोध घेऊ शकत नाहीत. त्यांच्याजवळ इतका वेळही असत नाही. त्यामुळे तो सत्यापर्यंत पोहोचत नाही. अशा सर्वसामान्य वैज्ञानिक विचारसरणी नसणाºया लोकांना मग अवैज्ञानिक गोष्टींनी भारावून टाकत, वैज्ञानिक प्रयोगांना चमत्कार म्हणून सांगत फसवले जाते. त्यातून पुढे अंधश्रद्धा निर्माण होतात. असा अंधश्रद्ध समाज कर्मकांडात रूतून बसतो आणि त्याची क्रयशक्ती राष्ट्रबांधणीसाठी वापरली जात नाही. त्यातून चाकार्दासारख्या घटना घडतात.

जखमीला डॉक्टरकडून नव्हे पुजाºयाकडून उपाय होतात. एकीकडे आपण अवकाशात माणूस पाठवणारा चवथा देश बनणार आहोत. तर दुसरीकडे चाकार्दा. म्हणून सामर्थ्यशाली भारत बनवण्यासाठी आपण अज्ञानेश्वर न राहत, विज्ञानाची कास पकडत विज्ञानेश्वर व्हायला हवे.(लेखक विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत.)