शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

शालेय विद्यार्थी ताडी-माडीच्या आहारी, व्यसनाची पहिली पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:57 IST

शित्तूर-वारूण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील वारणा आणि काणसा खोऱ्याची ओळख आता ताडी-माडी विक्रीचे केंद्र म्हणून नव्याने नवारूपास येत आहे. त्यापैकी कांडवण व शित्तूर-वारूण हे मुख्य केंद्र मानले जाते. दारू पिणे खिशाला परवडणारे नसल्याने तळीरामांनी आपला मोर्चा ताडी-माडीकडे वळवला आहे. लाईफ इज एंजॉय म्हणत शालेय विद्यार्थ्यांची ताडी-माडी पिणाºयांच्यामध्ये भर पडली ...

ठळक मुद्देकांडवण, शित्तूर-वारुण परिसरात तीन जिल्ह्यांतील लोकांची वर्दळ

शित्तूर-वारूण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील वारणा आणि काणसा खोऱ्याची ओळख आता ताडी-माडी विक्रीचे केंद्र म्हणून नव्याने नवारूपास येत आहे. त्यापैकी कांडवण व शित्तूर-वारूण हे मुख्य केंद्र मानले जाते. दारू पिणे खिशाला परवडणारे नसल्याने तळीरामांनी आपला मोर्चा ताडी-माडीकडे वळवला आहे. लाईफ इज एंजॉय म्हणत शालेय विद्यार्थ्यांची ताडी-माडी पिणाºयांच्यामध्ये भर पडली आहे. या ताडी-माडीत जास्तीत जास्त नशा निर्माण व्हावी यासाठी नवसागर, चुना अशा घातक रसायनांचा वापर केला जात असल्याची चर्चा या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.दारू पिण्याचे बेसिक ट्रेनिंग म्हणजे ताडी-माडी. पिण्याची सुरुवात ही ताडी-माडीपासून होते. माडी हे औषध म्हणूनही अनेक स्त्रिया, लहान मुले यांना पाजले जाते. मात्र, ती भेसळ केली जात असल्यामुळे फक्त नशेकरिता प्राशन केली जातआहे. परिणामी दहावी-बारावीत शिकणाºया विद्यार्थ्यांच्या ताडी-माडी पिणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. व्यसनाची सुरुवात ही अशा पद्धतीने होते आणि त्यातच दारूचे दर हे पन्नास-शंभर रुपयांपेक्षा अधिक असल्याने अनेकांना ते परवडत नाहीत. तुलनेने माडीचा अर्धा लिटरचा एक तांब्या तीस ते चाळीस रुपयांना मिळतो आणि नशा मात्र जवळजवळ दारूइतकीच होते. त्यामुळे सध्या या परिसरात दारूपेक्षा माडीचा धंदाच अधिक तेजीत चालतो. दगडापेक्षा वीट मऊ असली तरी ती आघातानंतर जखमी करते, प्रसंगी जीवघेणीही ठरू शकते. तशीच अवस्था नशा आणणारे रसायन मिसळल्यामुळे यापरिसरात मिळणाºया ताडी-माडीची आहे.ताडी-माडी ज्या झाडातून काढली जाते, त्याच ठिकाणी विक्रेत्यांमध्ये ती विकली जाते. झाडावरून ताडी-माडी काढण्यापासून ते घशाखाली जाईपर्यंतच्या दोन-तीन टप्प्यांवर ताडी-माडीत भेसळ केली जात असल्याचे बोलले जात आहे. ताडी-माडीत भेसळ होत नसेल तर त्याची नशा जवळपास दारूसारखी कशी, असा सवाल परिसरातून या निमित्ताने उपस्थित होत आहे.सध्याची भेसळयुक्त ताडी-माडी पिणारा तरुण हा उद्याचा तळीराम असण्याचीच शक्यता अधिक असते. अशी अनेक उदाहरणे या भागात गेल्या काही वर्षात घडलेली आहेत. अन्नबाधा, विषबाधा यातून जशी माणसे दगावतात, त्याप्रमाणे ताडी-माडीत होणाºया भेसळीमुळे माडीबाधा होऊन माणसे दगावण्याअगोदर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.दुचाकींची मोठ्या प्रमाणात ये-जाकांडवण, शित्तूर-वारुण या परिसरात ताडी-माडी पिण्यासाठी दुचाकी-चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कºहाड, सातारा, शिराळा, इस्लामपूर, सांगली व कोल्हापूर परिसरातील अनेक लोक ताडी-माडी पिण्यासाठी या परिसरात रोज येतात.या परिसरात ताडी-माडीची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यामध्ये होणारी भेसळ ही माणसाच्या शरीराला हानीकारक आहे. पोलीस यंत्रणेची या व्यवसायाकडे होत असलेली डोळेझाक ही गंभीर बाब आहे. माडी ज्या ठिकाणी झाडावरून काढली जाते, त्या ठिकाणापासून ते विक्रेत्यांपर्यंत कोणावरही कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्यामुळे त्यामध्ये नशिल्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.- हरीश कांबळे (जिल्हा कौन्सिल आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन)