शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

वेतनेतर अनुदानाच्या प्रतीक्षेत शाळा

By admin | Updated: October 28, 2014 00:18 IST

आंदोलनाचा इशारा : निकष पूर्ण करूनही निधी नाही

भरत शास्त्री -बाहुबली -राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे बंद करण्यात आलेले वेतनेतर अनुदान १ एप्रिल २०१३ पासून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यासाठी काही निकषांची पूर्तता करण्याचे बंधनकारक केले होते. अनेक शाळांनी अनुदान मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व निकषांची पूर्तता केली व अनुदानास पात्र ठरल्या; परंतु निधीचा अभाव व प्रशासनाचा ढिम्म कारभार यामुळे अजूनही निकष पूर्ण केलेल्या शाळांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे संघटना व संस्थाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शाळांमध्ये शैक्षणिक सामग्री, इमारत भाडे, देखभाल खर्च करण्यासाठी या निधीचा उपयोग शाळांना होणार आहे; परंतु अनुदान न मिळाल्याने संस्थाचालकांमध्ये कमालीची नाराजी आहे. राज्य शासन मान्यताप्राप्त शाळांना १९९३ पासून वेतनेतर अनुदान देत होते. मात्र, २००४-०५ पासून अनुदान बंद केले होते. तेव्हापासून शाळेच्या भौतिक सुविधांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. विद्यार्थ्यांच्यादृष्टीने आवश्यक सोयी-सुविधा पुरविणे शाळा, संस्थाचालकांना कठीण झाले होते. वेतनेतर अनुदान पुन्हा सुरू करण्याची मागणी संस्थाचालकांनी शासनदरबारी लावून धरली होती. त्याला शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार मंत्रिमंडळ समितीची त्याच्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर वेतनेतर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले; परंतु काही जाचक अटी व प्रशासकीय कागदपत्रांमध्ये एक वर्षाहून अधिक काळ गेला. परंतु, अजूनही बहुतेक निकष पूर्ण केलेल्या शाळांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे विविध संघटना व संस्थाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.