शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

वेतनेतर अनुदानाच्या प्रतीक्षेत शाळा

By admin | Updated: October 28, 2014 00:18 IST

आंदोलनाचा इशारा : निकष पूर्ण करूनही निधी नाही

भरत शास्त्री -बाहुबली -राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे बंद करण्यात आलेले वेतनेतर अनुदान १ एप्रिल २०१३ पासून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यासाठी काही निकषांची पूर्तता करण्याचे बंधनकारक केले होते. अनेक शाळांनी अनुदान मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व निकषांची पूर्तता केली व अनुदानास पात्र ठरल्या; परंतु निधीचा अभाव व प्रशासनाचा ढिम्म कारभार यामुळे अजूनही निकष पूर्ण केलेल्या शाळांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे संघटना व संस्थाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शाळांमध्ये शैक्षणिक सामग्री, इमारत भाडे, देखभाल खर्च करण्यासाठी या निधीचा उपयोग शाळांना होणार आहे; परंतु अनुदान न मिळाल्याने संस्थाचालकांमध्ये कमालीची नाराजी आहे. राज्य शासन मान्यताप्राप्त शाळांना १९९३ पासून वेतनेतर अनुदान देत होते. मात्र, २००४-०५ पासून अनुदान बंद केले होते. तेव्हापासून शाळेच्या भौतिक सुविधांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. विद्यार्थ्यांच्यादृष्टीने आवश्यक सोयी-सुविधा पुरविणे शाळा, संस्थाचालकांना कठीण झाले होते. वेतनेतर अनुदान पुन्हा सुरू करण्याची मागणी संस्थाचालकांनी शासनदरबारी लावून धरली होती. त्याला शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार मंत्रिमंडळ समितीची त्याच्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर वेतनेतर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले; परंतु काही जाचक अटी व प्रशासकीय कागदपत्रांमध्ये एक वर्षाहून अधिक काळ गेला. परंतु, अजूनही बहुतेक निकष पूर्ण केलेल्या शाळांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे विविध संघटना व संस्थाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.