शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

शाळा २ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

By admin | Updated: January 19, 2015 23:59 IST

तिसऱ्या टप्प्यांतील आंदोलन : दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा

कोल्हापूर : शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासंंबंधी शासन उदासीन आहे. त्यामुळे २ फेब्रुवारीपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी शिवाजी पार्कवरील विद्याभवन येथे आज, सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मागण्यांबद्दल सकारात्मक कार्यवाही न झाल्यास दहावी, बारावी परीक्षांवर बहिष्कारही टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. लाड म्हणाले, शासनाने २ मे २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी आणली आहे. त्यामुळे अनेक शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गुणवत्ता वाढीवर होत आहे. २३ आॅक्टोबर २०१३ रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर सेवकांसाठी सुधारित आकृतिबंध लागू झाला. हा आकृतिबंध अन्यायकारक आहे. सध्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन नियमानुसार करावे, शालेय शिक्षण विभागाचे महसूल विभागात विलीनीकरण करणारे शासनाचे आदेश तातडीने रद्द करावेत, वेतनेतर अनुदान सर्वांना पूर्वीप्रमाणे मिळावे, डी.एड्. व बी.एड्. झालेल्यांना पुन्हा ‘टीईटी’ देण्याची अट रद्द करावी, आदी मागण्या आहेत. या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. ६ जानेवारीला संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, यांनी काळ्या फिती लावून काम केले. याशिवाय मागण्या मान्य होईपर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, विभागीय एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड यांनी बोलाविलेल्या सर्व बैठकींवर बहिष्कार टाकून असहकाराचे आंदोलन केले. १३ जानेवारीला एक दिवस सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. त्यानंतर शिक्षणमंत्री यांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मागण्या पूर्ण करण्यासंबंधी आश्वासन दिले. परंतु, लेखी हमी मागितली असता ती मिळली नाही. त्यामुळे २ फेब्रुवारीपासून शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील, के. बी. पोवार, व. ज. देशमुख, प्रभाकर आरडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.शासकीय शाळा बंदमध्ये नाहीत...२ फेब्रुवारीला होणाऱ्या शाळा बंद आंदोलनात शासकीय माध्यमिक, उच्च माध्यमिक, जिल्हा परिषदेच्या शाळा सहभागी होणार नाहीत. रयत आणि विवेकानंद शाळांनी बंद संंबंधी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे या दोन संस्था बंदमध्ये सहभागी होणार किंवा नाही, याबद्दल संभ्रम आहे. खासगी माध्यमिक, उच्च माध्यमिक जिल्ह्यातील ७५० शाळा बंद राहणार आहेत.