शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

पेंढारवाडीकरांनी भरवली पंचायत समितीत शाळा

By admin | Updated: November 20, 2015 00:04 IST

शिक्षण आमच्या हक्काचे : २० पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

आजरा : २० पटाखालील शाळा बंद करणे ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाचे दरवाजे बंद करण्यास कारणीभूत ठरणार असून, शासनाने हा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी पेंढारवाडी ग्रामस्थांनी आजरा तहसील कार्यालय व आजरा पंचायत समितीसमोर मोर्चाने जाऊन पंचायत समिती कार्यालयासमोरच पालक व विद्यार्थ्यांची शाळा भरवली.यावेळी कॉ. शिवाजी गुरव म्हणाले, या निर्णयातून शासनाचा दुबळेपणा स्पष्ट होत आहे. राज्य व केंद्र सरकारचा कारभार म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्याचा प्रकार आहे. अत्यंत पोरकटपणाचे निर्णय शासन घेत आहे. २० पटाच्या आतील शाळा बंद करून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. शासनाने आपला निर्णयावर फेरविचार करावा, अन्यथा पुन्हा एकवेळ महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांची भूमिका सर्वसामान्य शिक्षित मंडळींना घ्यावी लागणार आहे. अन्यथा ग्रामीण व आदिवासी भागातील आदिवासी वस्त्या, पाडे, दुर्गम भाग येथील बालके शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.गाव तिथे शासकीय शाळा व वर्ग तेथे शिक्षक या धोरणानुसार वीस पटाखालील शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध असल्याचे स्पष्ट केले.यावेळी निवासी नायब तहसीलदार बी. डी. कोळी व गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांना निवेदन देऊन पंचायत समिती आवारात शाळा भरविण्यात आली.आंदोलनामध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साहेबराव लोखंडे, लक्ष्मण लोहार, तुकाराम आजगेकर, एकनाथ आजगेकर, गीतांजली शिंत्रे, संगीता आजगेकर, रंजना आजगेकर, अनिल आजगेकर यांच्यासह ग्रामस्थ, मुले सहभागी झाले होते. आंदोलन ठिकाणी सुभाष विभूते, संयोगीता सुतार, सुनिल सुतार यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)