शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराचा फज्जा

By admin | Updated: August 30, 2015 23:11 IST

शाळेत मुले उपाशीच : आहार पुरवठा स्थगित करण्याचा मार्केटिंग फेडरेशनला आदेश

प्रकाश पाटील - कोपार्डे  कोणतेही मूल कुपोषित राहू नये, अधिकाधिक मुले शाळेत येण्यासाठी राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. योजनेचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करून तिची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कडक कायदेही करण्यात आले आहेत. मात्र, गेले वर्षभर पोषण आहारासाठी धान्याचा अनियमित पुरवठा होत असल्याने या योजनेचा फज्जा उडाला आहे. गेले २० ते २५ दिवस करवीरमधील शालेय मुले पोषण आहारापासून वंचित आहेत.ग्रामीण भागात शालेय मुलांच्या आहाराची हेळसांड होते हे लक्षात आल्यानंतर शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. यासाठी मुख्याध्यापकांवर मुलांना योग्य व प्रमाणित आहार देण्याची जबाबदारी सोपविली व ते शिजवून देण्याचे काम बचत गटांकडे सोपविले आहे. शालेय पोषण आहारासाठी लागणारे धान्य यामध्ये तांदूळ, तेल, तिखट व डाळ पुरविण्याचे काम मार्केटिंग फेडरेशनकडे आहे.या योजनेचा समावेश अन्नसुरक्षा योजनेत करण्यात आला आहे. तांदूळ, धान्य, आदी माल संपल्याचे कारण देऊन शालेय पोषण आहार योजनेअंर्तगत धान्य शिजवून न देता लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्याला शाळेच्या मुख्याध्यापकांबरोबर केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. या योजनेत कसूर झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा व अन्न सुरक्षा कायद्याचा भंग केल्यामुळे संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याचा आदेशही काढण्यात आला आहे. यासाठी २० दिवस पुरेल इतका धान्यसाठा असतानाही धान्याची मागणी करून एक दिवसही त्यामध्ये खंड पडू न देता नियमित शालेय पोषण आहार शिजवून देण्याच्या सक्त सूचना आहेत. मात्र, शासकीय पातळीवरच शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी लागणाऱ्या धान्यादी पदार्थांचा अनियमित पुरवठा सुरू असल्याने या शालेय पोषण आहार योजनेचा फज्जा उडाला आहे. याबाबत संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला असता ज्या मार्केटिंग फेडरेशनकडे धान्य पुरवठा करण्याचा ठेका आहे, त्यांचा धान्य पुरवण्याचा करार संपला असून आता याबाबत दरवाढ करून द्यावी, अशी मागणी होत असल्याचे समजते. कारवाई होणार काय?शालेय पोषण आहार देण्यात मुख्याध्यापकांनी कसूर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. काही ठिकाणी शिक्षकांना अशा कारवाईला सामोरेही जावे लागले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारासाठी शासनाच्या अनियमित धान्य पुरवठ्याला जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, अशी प्रतिक्रिया पालक, शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.