शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चादिवशी जिल्ह्यातील शाळांना हवी सुटी

By admin | Updated: September 22, 2016 01:08 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा : सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करावी, अशी मागणी कोरेगाव विकास मंचच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. त्यामुळे या समाजातील तरुण पिढीला विशेषत: उच्च शिक्षित तरुणांना गुणवत्ता असूनही डावलले जात आहे. मराठा समाजातील मागील पिढी गुणवत्ता असूनही आरक्षणाच्या नावाखाली मागे ढकलली गेली. तसेच गुणवत्ता असूनही हाताला योग्यतेनुसार काम नसल्याने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे़ परिणामी मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फार मोठा परिणाम मराठा समाजावर झाला आहे़ पुढील पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकत्र येत आहे. आरक्षणासाठी दि. ३ आॅक्टोबरच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार आहोत़ मराठा समाज आरक्षणाची मागणी मुख्यत: पुढील पिढी म्हणजे आताची शाळा, कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांनी या मोर्चात सहभागी होणे योग्यच आहे़ त्यांना तशी संधी मिळावी यासाठी दि. ३ आॅक्टोबर रोजी शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर कोरेगाव विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे, दिलीपराव बर्गे, रामचंद्र बोतालजी, संतोष बर्गे, महेश बर्गे, विठ्ठलराव काटे, रोहित जाधव, अनिल बर्गे, अनिल पवार, राजेंद्र बर्गे, अधिक जाधव, विनोद गोरे, अरुणराव बर्गे, श्रीकांत बर्गे, संतोष कदम, चंद्रकांत शिंदे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी) जावळीतील मुस्लीम समाजाचा मोर्चाला पाठिंबा कुडाळ : जावळी तालुक्याच्या कुडाळ परिसरातील साठ गावांची मराठा मोर्चासाठी बैठक झाली. या मोर्चाला जावळी तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दि. ३ आॅक्टोबर मराठ्यांची राजधानी सातारा येथे ‘न भूतो न भविष्यती’ असा मोर्चा करण्याचा संकल्प यावेळी जावळीकरांनी केला. या मोर्चाला सहकार्य व जाहीर पाठिंबा जावळीतून करण्याचा निर्णय जावळीतील मुस्लीम समाजाने घेतला आहे. कुडाळ येथील गजानन मंगल कार्यालय येथे मराठा समाजाची बैठक झाली. ‘मराठा समाज हा मुस्लीम समाजाचा मोठा भाऊ आहे,’ असे मुस्लीम बांधवांनी म्हटले. मराठा क्रांती मोर्चास ‘रिपाइं’चा पाठिंबा वाठार स्टेशन : ‘आपल्या न्याय हक्कासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मोर्चा काढून मागणी करणे हा घटनेने दिलेला अधिकार असून, त्याबद्दल विनाकारण गैरसमज पसरवून सामाजिक दरी निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. आपण आपल्या कार्यकर्त्याबरोबर मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार आहे,’ असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे यांनी जाहीर केले आहे. गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगून केवळ स्वत:ची घरे भरणाऱ्या नेतेमंडळींकडून मराठा समाजाचा अपेक्षा भंग झाला आहे. महाराष्ट्रात निघत असलेले मोर्चे त्याचे प्रतीक आहेत. कोपर्डीची घटना निश्चितपणे निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेधच करतो याशिवाय अशा गुन्हेगारास कुणीही पाठीशी घालणार नाही. गुन्हेगारांना कोणतीही जात नसते विनाकारण जातीय तेढ वाढू नये. या मोचार्ला प्रति मोर्चा काढून जसास तसे उत्तर देण्याची तयारी होत असल्याची माहिती मिळत आहे. माझे सर्व दलित संघटना आणि बांधवांना आवाहन आहे की, आपण असे करू नये असेही आवळे यानी म्हटले आहे. (प्रतिनिधी)