शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

मोर्चादिवशी जिल्ह्यातील शाळांना हवी सुटी

By admin | Updated: September 22, 2016 01:08 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा : सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करावी, अशी मागणी कोरेगाव विकास मंचच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. त्यामुळे या समाजातील तरुण पिढीला विशेषत: उच्च शिक्षित तरुणांना गुणवत्ता असूनही डावलले जात आहे. मराठा समाजातील मागील पिढी गुणवत्ता असूनही आरक्षणाच्या नावाखाली मागे ढकलली गेली. तसेच गुणवत्ता असूनही हाताला योग्यतेनुसार काम नसल्याने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे़ परिणामी मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फार मोठा परिणाम मराठा समाजावर झाला आहे़ पुढील पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकत्र येत आहे. आरक्षणासाठी दि. ३ आॅक्टोबरच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार आहोत़ मराठा समाज आरक्षणाची मागणी मुख्यत: पुढील पिढी म्हणजे आताची शाळा, कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांनी या मोर्चात सहभागी होणे योग्यच आहे़ त्यांना तशी संधी मिळावी यासाठी दि. ३ आॅक्टोबर रोजी शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर कोरेगाव विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे, दिलीपराव बर्गे, रामचंद्र बोतालजी, संतोष बर्गे, महेश बर्गे, विठ्ठलराव काटे, रोहित जाधव, अनिल बर्गे, अनिल पवार, राजेंद्र बर्गे, अधिक जाधव, विनोद गोरे, अरुणराव बर्गे, श्रीकांत बर्गे, संतोष कदम, चंद्रकांत शिंदे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी) जावळीतील मुस्लीम समाजाचा मोर्चाला पाठिंबा कुडाळ : जावळी तालुक्याच्या कुडाळ परिसरातील साठ गावांची मराठा मोर्चासाठी बैठक झाली. या मोर्चाला जावळी तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दि. ३ आॅक्टोबर मराठ्यांची राजधानी सातारा येथे ‘न भूतो न भविष्यती’ असा मोर्चा करण्याचा संकल्प यावेळी जावळीकरांनी केला. या मोर्चाला सहकार्य व जाहीर पाठिंबा जावळीतून करण्याचा निर्णय जावळीतील मुस्लीम समाजाने घेतला आहे. कुडाळ येथील गजानन मंगल कार्यालय येथे मराठा समाजाची बैठक झाली. ‘मराठा समाज हा मुस्लीम समाजाचा मोठा भाऊ आहे,’ असे मुस्लीम बांधवांनी म्हटले. मराठा क्रांती मोर्चास ‘रिपाइं’चा पाठिंबा वाठार स्टेशन : ‘आपल्या न्याय हक्कासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मोर्चा काढून मागणी करणे हा घटनेने दिलेला अधिकार असून, त्याबद्दल विनाकारण गैरसमज पसरवून सामाजिक दरी निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. आपण आपल्या कार्यकर्त्याबरोबर मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार आहे,’ असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे यांनी जाहीर केले आहे. गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगून केवळ स्वत:ची घरे भरणाऱ्या नेतेमंडळींकडून मराठा समाजाचा अपेक्षा भंग झाला आहे. महाराष्ट्रात निघत असलेले मोर्चे त्याचे प्रतीक आहेत. कोपर्डीची घटना निश्चितपणे निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेधच करतो याशिवाय अशा गुन्हेगारास कुणीही पाठीशी घालणार नाही. गुन्हेगारांना कोणतीही जात नसते विनाकारण जातीय तेढ वाढू नये. या मोचार्ला प्रति मोर्चा काढून जसास तसे उत्तर देण्याची तयारी होत असल्याची माहिती मिळत आहे. माझे सर्व दलित संघटना आणि बांधवांना आवाहन आहे की, आपण असे करू नये असेही आवळे यानी म्हटले आहे. (प्रतिनिधी)