शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

महाविद्यालयांमध्ये अडकले १७ हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि अनुसूचित जाती (एससी) या प्रवर्गातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमांच्या ३९० महाविद्यालयांमध्ये एकूण १७०२८ विद्यार्थ्यांचे या शिष्यवृत्तीचे अर्ज अडकले आहेत. मार्च एन्डिंग (अखेर) आठ दिवसांवर येऊन ठेपली असून देखील अद्याप ४५ टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडून कोल्हापुरातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाकडे दाखल झालेले नाहीत.

कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमासह व्यवस्थापन, फार्मसी, पॉलिटेक्निक, कलानिकेतन आदी विविध महाविद्यालयांतील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. अभ्यासक्रमाच्या शुल्कनिहाय ही शिष्यवृत्ती मिळते. गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ४१३७० विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली होती. मात्र, यावर्षी आतापर्यंत ३४५४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ८० टक्के आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज छाननी करून महाविद्यालयांनी समाजकल्याण कार्यालयाकडे ऑनलाईन प्रणालीतून पाठविण्याचे प्रमाण कमी दिसत आहे. त्याबाबत समाजकल्याण विभागाच्या पुणे विभागातील प्रादेशिक आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी राज्य शासनाने दिलेला निधी दि. ३१ मार्चपूर्वी वितरित करणे आवश्यक असते. शासनाने निधीही दिला आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे महाविद्यालयांकडून अद्याप ४५ टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण कार्यालयाकडे आलेले नाहीत. हे अर्ज लवकर पाठवून देण्याबाबत मार्चच्या सुरुवातीपासून या कार्यालयाकडून महाविद्यालयांना वारंवार पत्रे पाठविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून अजूनही कार्यवाहीची गती वाढली नसल्याचे चित्र आहे. मार्च एन्डिंगला आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे वेळेत अर्ज केलेल्या १७०२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार हा प्रश्न आहे.

चौकट

महाविद्यालयांना शुक्रवारची डेडलाईन

कोल्हापुरातील महाविद्यालयांतील एकूण ३४५४९ विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली. त्यातील १७५२१ विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांकडून प्राप्त झालेले अर्ज समाजकल्याण कार्यालयाने मंजूर केले आहेत. अद्याप १७०२८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडून प्राप्त झालेले नाहीत. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही तत्काळ करावी. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस उरले आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांनी शुक्रवार (दि. २६) पर्यंत ऑनलाईन प्रणालीतून समाजकल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

चौकट

तांत्रिक अडचणी

या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाची केलेली दुहेरी नोंदणी, मोबाईल क्रमांक बदलल्याने मिळत नसलेला ओटीपी, आदी तांत्रिक अडचणींचा महाविद्यालयांना भेडसावत आहेत.

पॉंईंटर्स

१) जिल्ह्यातील महाविद्यालये : ३९०

२) महाविद्यालयांत एकूण प्रलंबित अर्ज : १७०२८

प्रवर्गनिहाय प्रलंबित अर्ज

१) ओबीसी : ५६८७

२) एसबीसी : ११६३

३) व्हीजेएनटी :३५८०

४) एससी : ६५९८