शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

कोल्हापूर-गगनबावडा एस.टी.चे वेळापत्रक विस्कळीत

By admin | Updated: February 4, 2015 23:57 IST

वडापला सुगीचे दिवस : रंकाळा डेपोच्या चुकीच्या वेळापत्रकाचा प्रवाशांना त्रास

प्रकाश पाटील -कोपार्डे  -- ‘वाट बघत थांबू; पण एस.टी.नेच जाऊ’, हे ब्रीदवाक्य आजच्या धावत्या जगात कालबाह्य ठरत असून, आपल्या ब्रीदवाक्यात बदल करून एस.टी.ने व्यावसायिकता जपली नाही तर चाके तोट्यात रुतल्याशिवाय राहणार नाहीत. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर रंकाळा आणि गगनबावडा या दोन्ही आगारांकडून धावणाऱ्या एस.टी. बसेसचे वेळापत्रक विस्कळीत असण्याबरोबरच कमी फेऱ्या असल्याने प्रवासी, विद्यार्थी, नोकरदारांना वडापचा आधार घ्यावा लागत आहे.कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरून करवीर, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यांतील अनेक गावांना रंकाळा, संभाजीनगर व गगनबावडा डेपोंकडून एस.टी.ची प्रवासी सेवा सुरू आहे. या मार्गावर कुंभी-कासारी व डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून मोठा आर्थिक व शैक्षणिक विकास झाला आहे. त्याशिवाय कोपार्डे येथील जनावरांचा बाजार, कळे (ता. पन्हाळा) सारखी ग्रामीण भागात असणारी मोठी बाजारपेठ, कुंभी-कासारी कारखाना तर विकासाचा केंद्रबिंदू असून याठिकाणी एक महाविद्यालय, तीन माध्यमिक शाळा, एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, दोन राष्ट्रीयीकृत बॅँका, दोन सहकारी बॅँका, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे झाल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जवळजवळ २०० ते २५० गावांतील लोकांना येथे येण्यासाठी एस.टी.चाच मोठा आधार आहे. त्याचबरोबर शहरात मोठी शासकीय कार्यालये असल्याने व एम.आय.डी.सी.ला कामाला जाणारा मोठा वर्ग एस.टी.च्या प्रवासाला प्रथम पसंती देतो. मात्र, वरील तिन्ही डेपोंकडून एकतर फेऱ्या कमी आहेतच; शिवाय ज्या एस.टी. बसेस सोडल्या जातात, त्या अनियमित असल्याने जनतेची गैरसोय होते. कामावर अथवा शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी मग वडापचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.या मार्गावर तीनचाकी रिक्षांचे वडाप मोठ्या प्रमाणात असून, पाच प्रवाशांचा वडापचा परवाना असताना अक्षरश: १२ व त्याहून अधिक लोकांना बसवले जाते. त्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नावर डल्ला पडत असून, अतिशय चांगल्या उत्पन्नाचे पॉकेट एस.टी. प्रशासनाकडून दुर्लक्षित होत आहे.कोल्हापूर-कळे जनता गाडी सुरू व्हावीगेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर-कळे व कोल्हापूर-बाजारभोगाव या मार्गावरील जनता गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. अर्ध्या तासाला या गाड्या सोडल्या जात असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय व्हायची. त्यामुळे बंद केलेल्या जनता गाडी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.