शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक पाऊस, उघडीपीमुळे शेतकऱ्याची चिंता वाढली

By admin | Updated: July 7, 2017 17:32 IST

भात, नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0७ : गेले दोन-तीन दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भात व नागलीचे तरू लागणीस आले आणि पावसाने उघडीप दिल्याने रोपलागणीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे नुसती भूरभूर सुरू असून चोवीस तासांत सरासरी ३.७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू झाल्याने खरीप पिके जोमात आहेत; पण पश्चिमेकडील पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तालुक्यात भात व नागलीची रोपलागण मोठ्या प्रमाणात केली जाते. रोपलागणीस चिखल करण्यासाठी पावसाची गरज असते, पण गेली दोन-तीन दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यातच भात व नागलीचा तरवा टाकल्याने महिन्याभरात तरू (रोप) लागणीसाठी परिपक्व झाले आहे. त्यात पावसाने उघडीप दिल्याने रोपलागणी लांबणीवर पडली आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३.७४ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ९ मिलीमीटर झाला. हातकणंगले, शिरोळ तालुक्यात निरंक तर करवीर, कागल, पन्हाळा तालुक्यात तुरळक सरी कोसळल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने नद्यांची पातळी कमी झाली असून पंचगंगेची पातळी १७ फुटांपर्यंत खाली आली आहे. अद्याप नऊ बंधारे पाण्याखाली आहेत.

राधानगरी निम्मे भरले!

जिल्ह्यात पाऊस कमी असला तरी धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस असल्याने धरणांची पातळी हळू-हळू वाढू लागली आहे. राधानगरी धरण ५१ टक्के भरले असून तुळशी, कडवी, कुंभी, पाटगांव, कासारी धरणात ५० टक्क्यांपेक्षा जादा पाणीसाठा आहे.