शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईचे सावट गडद

By admin | Updated: April 25, 2016 00:52 IST

धरणांच्या पातळीत झपाट्याने घट : जिल्ह्यात सध्या केवळ ३२.५६ टीएमसी साठा

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर --जिल्ह्यात मोठ्या, मध्यम, लघु अशा सर्वच धरणांत गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या निम्म्याहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी १३ एप्रिलअखेर सर्व तलावांत ५६.९६ टीएमसी, तर यंदा त्याच तारखेला केवळ ३२.५६ टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यामध्ये चार दिवसांत पुन्हा घट झाली आहे. दरम्यान, पाऊस सुरू होईपर्यंत शिल्लक साठा पिण्यासाठी, सिंचनासाठी वापरावा लागणार आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने पाणी वापरासंबंधी केलेल्या नियोजनाचे काटेकर पालन न झाल्यास शहरासह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. ‘पाण्याचा जिल्हा’ अशी कोल्हापूरची राज्यात ख्याती आहे. १९७२ नंतर येथे कधीही पाणीटंचाईचे गडद सावट जाणवले नाही; परंतु, गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सर्व धरणे क्षमतेइतकी भरली नाहीत. विहिरी, ओढे, नाले भरून वाहिले नाहीत. त्यामुळे दीर्घ काळानंतर पहिल्यादांच जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्रपणे जाणवत आहे.उष्णता वाढल्याने सर्वच तलावांतील पाणी उपसा वाढला आहे. परिणामी, पाणीपातळी झपाट्याने खाली येत आहे. पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी आरक्षित केले आहे. शिल्लक पाणी उपसाबंदी करून सिंचनासाठी दिले जात आहे; परंतु, उन्हाच्या झळा वाढल्याने ऊस, भाजीपाला, आदी पिके वाळत असल्याने सैरभैर झालेले काही संबंधित शेतकरी उपसा बंदीच्या वेळी आकडा टाकून वीज घेऊन विद्युत पंप सुरू करत आहे. त्यामुळे आरक्षित पाणी नियोजन कोलमडत आहे. हे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे म्हणूनच वीज वितरण कंपनीला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.५३ लघुपाटबंधारे प्रकल्पराधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा असे चार मोठे प्रकल्प आहेत. या धरणांत १४.७८ टीएमसी पाणी आहे. गतवर्षापेक्षा २८.८७ टीएमसी पाणी कमी आहे. नऊ मध्यम धरणात ७.५९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा २.५४ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. ५३ लघुपाटबंधारे प्रकल्पांत गेल्यावर्षी पेक्षा ३.३८ टीएमसी पाणी कमी आहे, तर सध्या २४.६० टीएमसी पाणी शिल्लक आहे. कमी लघुप्रकल्पांतही १.१५ टीएमसी पाणी गतवर्षापेक्षा कमी आहे.