शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

टंचाईचे सावट गडद

By admin | Updated: April 25, 2016 00:52 IST

धरणांच्या पातळीत झपाट्याने घट : जिल्ह्यात सध्या केवळ ३२.५६ टीएमसी साठा

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर --जिल्ह्यात मोठ्या, मध्यम, लघु अशा सर्वच धरणांत गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या निम्म्याहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी १३ एप्रिलअखेर सर्व तलावांत ५६.९६ टीएमसी, तर यंदा त्याच तारखेला केवळ ३२.५६ टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यामध्ये चार दिवसांत पुन्हा घट झाली आहे. दरम्यान, पाऊस सुरू होईपर्यंत शिल्लक साठा पिण्यासाठी, सिंचनासाठी वापरावा लागणार आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने पाणी वापरासंबंधी केलेल्या नियोजनाचे काटेकर पालन न झाल्यास शहरासह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. ‘पाण्याचा जिल्हा’ अशी कोल्हापूरची राज्यात ख्याती आहे. १९७२ नंतर येथे कधीही पाणीटंचाईचे गडद सावट जाणवले नाही; परंतु, गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सर्व धरणे क्षमतेइतकी भरली नाहीत. विहिरी, ओढे, नाले भरून वाहिले नाहीत. त्यामुळे दीर्घ काळानंतर पहिल्यादांच जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्रपणे जाणवत आहे.उष्णता वाढल्याने सर्वच तलावांतील पाणी उपसा वाढला आहे. परिणामी, पाणीपातळी झपाट्याने खाली येत आहे. पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी आरक्षित केले आहे. शिल्लक पाणी उपसाबंदी करून सिंचनासाठी दिले जात आहे; परंतु, उन्हाच्या झळा वाढल्याने ऊस, भाजीपाला, आदी पिके वाळत असल्याने सैरभैर झालेले काही संबंधित शेतकरी उपसा बंदीच्या वेळी आकडा टाकून वीज घेऊन विद्युत पंप सुरू करत आहे. त्यामुळे आरक्षित पाणी नियोजन कोलमडत आहे. हे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे म्हणूनच वीज वितरण कंपनीला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.५३ लघुपाटबंधारे प्रकल्पराधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा असे चार मोठे प्रकल्प आहेत. या धरणांत १४.७८ टीएमसी पाणी आहे. गतवर्षापेक्षा २८.८७ टीएमसी पाणी कमी आहे. नऊ मध्यम धरणात ७.५९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा २.५४ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. ५३ लघुपाटबंधारे प्रकल्पांत गेल्यावर्षी पेक्षा ३.३८ टीएमसी पाणी कमी आहे, तर सध्या २४.६० टीएमसी पाणी शिल्लक आहे. कमी लघुप्रकल्पांतही १.१५ टीएमसी पाणी गतवर्षापेक्षा कमी आहे.