शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

टंचाईचे सावट गडद

By admin | Updated: April 25, 2016 00:52 IST

धरणांच्या पातळीत झपाट्याने घट : जिल्ह्यात सध्या केवळ ३२.५६ टीएमसी साठा

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर --जिल्ह्यात मोठ्या, मध्यम, लघु अशा सर्वच धरणांत गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या निम्म्याहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी १३ एप्रिलअखेर सर्व तलावांत ५६.९६ टीएमसी, तर यंदा त्याच तारखेला केवळ ३२.५६ टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यामध्ये चार दिवसांत पुन्हा घट झाली आहे. दरम्यान, पाऊस सुरू होईपर्यंत शिल्लक साठा पिण्यासाठी, सिंचनासाठी वापरावा लागणार आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने पाणी वापरासंबंधी केलेल्या नियोजनाचे काटेकर पालन न झाल्यास शहरासह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. ‘पाण्याचा जिल्हा’ अशी कोल्हापूरची राज्यात ख्याती आहे. १९७२ नंतर येथे कधीही पाणीटंचाईचे गडद सावट जाणवले नाही; परंतु, गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सर्व धरणे क्षमतेइतकी भरली नाहीत. विहिरी, ओढे, नाले भरून वाहिले नाहीत. त्यामुळे दीर्घ काळानंतर पहिल्यादांच जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्रपणे जाणवत आहे.उष्णता वाढल्याने सर्वच तलावांतील पाणी उपसा वाढला आहे. परिणामी, पाणीपातळी झपाट्याने खाली येत आहे. पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी आरक्षित केले आहे. शिल्लक पाणी उपसाबंदी करून सिंचनासाठी दिले जात आहे; परंतु, उन्हाच्या झळा वाढल्याने ऊस, भाजीपाला, आदी पिके वाळत असल्याने सैरभैर झालेले काही संबंधित शेतकरी उपसा बंदीच्या वेळी आकडा टाकून वीज घेऊन विद्युत पंप सुरू करत आहे. त्यामुळे आरक्षित पाणी नियोजन कोलमडत आहे. हे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे म्हणूनच वीज वितरण कंपनीला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.५३ लघुपाटबंधारे प्रकल्पराधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा असे चार मोठे प्रकल्प आहेत. या धरणांत १४.७८ टीएमसी पाणी आहे. गतवर्षापेक्षा २८.८७ टीएमसी पाणी कमी आहे. नऊ मध्यम धरणात ७.५९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा २.५४ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. ५३ लघुपाटबंधारे प्रकल्पांत गेल्यावर्षी पेक्षा ३.३८ टीएमसी पाणी कमी आहे, तर सध्या २४.६० टीएमसी पाणी शिल्लक आहे. कमी लघुप्रकल्पांतही १.१५ टीएमसी पाणी गतवर्षापेक्षा कमी आहे.