शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

घोटाळ्यांमुळे सत्तेत असल्याची लाज वाटते

By admin | Updated: July 19, 2015 23:53 IST

क्षीरसागर यांचा ‘भाजप’वर निशाणा : शिवसेनेत स्वबळाची धमक : अरुण दुधवडकर

कोल्हापूर : चिक्की घोटाळा, बोगस डिग्रीसह मित्रपक्षाच्या अन्य भानगडींनी कोणाबरोबर सत्तेत बसलो आहोत, याची लाज वाटते. शिवसेना सोडली तर एकही पक्ष स्वच्छ म्हणता येणार नाही, अशा शब्दांत आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘भाजप’वर निशाणा साधला. श्राद्ध, जावळाच्या कार्यक्रमात जाऊन पैशासह महापालिकेची उमेदवारी जाहीर करण्याचा सपाटा काही मंडळींनी लावला आहे; पण आमचे कार्यकर्ते कडवे शिवसैनिक आहेत. ते कधीही फुटणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. टाऊन हॉल येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात रविवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर होते. आमदार क्षीरसागर म्हणाले, आजची राजकीय परिस्थिती वाईट आहे. मित्रपक्षाच्या मंत्र्यांच्या घोटाळ्याने सरकारची बदनामी होत आहे. शिवसेना सोडली तर सर्वच पक्ष बदनाम झाले असून, जनता मोठ्या विश्वासाने आमच्याकडे बघत आहे. गेले आठ-दहा महिने महापालिका निवडणुकीची तयारी करीत आहोत. जनतेमध्ये जाऊन, तिचा विश्वास संपादन करून, एकजुटीने कामाला लागून कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भगवा फडकवायचा निर्धार केल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. अरुण दुधवडकर म्हणाले, येथे पक्षाशिवाय नातेगोते पाहूनच मतदान होते. त्यानुसार निवडणुकीची तयारी करा. अजूनही वेळ गेलेली नाही. महापालिकेत भगवा फडकविण्यासाठी ७७ प्रभागांत तयारी ठेवा. मित्रपक्ष साद घालू लागला तर ठीक; अन्यथा बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला स्वबळाची धमक दिली आहे. विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी असल्याने युतीबाबत गाफील राहू नका, असा सल्लाही दुधवडकर यांनी दिला.माजी उपमहापौर उदय पोवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव, नंदकुमार वळंजू, प्रा. विजय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. दुर्गेश लिंग्रस, स्मिता माळी, पूजा भोरे, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते. ‘महाडिक पॅटर्न’साठीलाल दिवा द्यायेथे ‘महाडिक पॅटर्न’ चालतो. यासाठी पक्षाने काही गोष्टी करणे गरजेचे आहे. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद द्या, अशी मागणी विजय कुलकर्णी यांनी केली. हाच धागा पकडत, तीनचे सहा आमदार कोल्हापूरने दिल्याने त्याची दखल पक्षप्रमुखांनी घेतली आहे. त्यामुळे लाल दिवा तुम्हालाच मिळाला पाहिजे, असे सूचक वक्तव्य दुधवडकर यांनी केले. भाजपच्या अधिवेशनाला ‘भगव्या सप्ताहा’चे उत्तरमित्रपक्षाला काय बोलणार? माझ्यावर मर्यादा असल्याचे सांगत, अधिवेशनाच्या निमित्ताने अखंड मंत्रिमंडळ आले, दिल्लीवरून अमित शहाही आले; पण त्याला राजेश क्षीरसागर यांनी ‘भगव्या सप्ताहा’च्या माध्यमातून चोख उत्तर दिल्याचे अरुण दुधवडकर यांनी सांगितले. जिल्ह्यात साडेचार पालकमंत्री मित्रपक्षाचे कार्य कमी आणि कारवायाच अधिक आहेत. जिल्ह्यात साडेचार पालकमंत्री कार्यरत आहेत. ते कोणाची माती, श्राद्ध, जावळ सोडत नाहीत. अशा प्रवृत्तीला लगाम घालून जिल्ह्याला राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने कर्तबगार पालकमंत्री द्या, अशी मागणी विजय कुलकर्णी यांनी केली.