शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

घोटाळ्यांमुळे सत्तेत असल्याची लाज वाटते

By admin | Updated: July 19, 2015 23:53 IST

क्षीरसागर यांचा ‘भाजप’वर निशाणा : शिवसेनेत स्वबळाची धमक : अरुण दुधवडकर

कोल्हापूर : चिक्की घोटाळा, बोगस डिग्रीसह मित्रपक्षाच्या अन्य भानगडींनी कोणाबरोबर सत्तेत बसलो आहोत, याची लाज वाटते. शिवसेना सोडली तर एकही पक्ष स्वच्छ म्हणता येणार नाही, अशा शब्दांत आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘भाजप’वर निशाणा साधला. श्राद्ध, जावळाच्या कार्यक्रमात जाऊन पैशासह महापालिकेची उमेदवारी जाहीर करण्याचा सपाटा काही मंडळींनी लावला आहे; पण आमचे कार्यकर्ते कडवे शिवसैनिक आहेत. ते कधीही फुटणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. टाऊन हॉल येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात रविवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर होते. आमदार क्षीरसागर म्हणाले, आजची राजकीय परिस्थिती वाईट आहे. मित्रपक्षाच्या मंत्र्यांच्या घोटाळ्याने सरकारची बदनामी होत आहे. शिवसेना सोडली तर सर्वच पक्ष बदनाम झाले असून, जनता मोठ्या विश्वासाने आमच्याकडे बघत आहे. गेले आठ-दहा महिने महापालिका निवडणुकीची तयारी करीत आहोत. जनतेमध्ये जाऊन, तिचा विश्वास संपादन करून, एकजुटीने कामाला लागून कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भगवा फडकवायचा निर्धार केल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. अरुण दुधवडकर म्हणाले, येथे पक्षाशिवाय नातेगोते पाहूनच मतदान होते. त्यानुसार निवडणुकीची तयारी करा. अजूनही वेळ गेलेली नाही. महापालिकेत भगवा फडकविण्यासाठी ७७ प्रभागांत तयारी ठेवा. मित्रपक्ष साद घालू लागला तर ठीक; अन्यथा बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला स्वबळाची धमक दिली आहे. विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी असल्याने युतीबाबत गाफील राहू नका, असा सल्लाही दुधवडकर यांनी दिला.माजी उपमहापौर उदय पोवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव, नंदकुमार वळंजू, प्रा. विजय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. दुर्गेश लिंग्रस, स्मिता माळी, पूजा भोरे, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते. ‘महाडिक पॅटर्न’साठीलाल दिवा द्यायेथे ‘महाडिक पॅटर्न’ चालतो. यासाठी पक्षाने काही गोष्टी करणे गरजेचे आहे. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद द्या, अशी मागणी विजय कुलकर्णी यांनी केली. हाच धागा पकडत, तीनचे सहा आमदार कोल्हापूरने दिल्याने त्याची दखल पक्षप्रमुखांनी घेतली आहे. त्यामुळे लाल दिवा तुम्हालाच मिळाला पाहिजे, असे सूचक वक्तव्य दुधवडकर यांनी केले. भाजपच्या अधिवेशनाला ‘भगव्या सप्ताहा’चे उत्तरमित्रपक्षाला काय बोलणार? माझ्यावर मर्यादा असल्याचे सांगत, अधिवेशनाच्या निमित्ताने अखंड मंत्रिमंडळ आले, दिल्लीवरून अमित शहाही आले; पण त्याला राजेश क्षीरसागर यांनी ‘भगव्या सप्ताहा’च्या माध्यमातून चोख उत्तर दिल्याचे अरुण दुधवडकर यांनी सांगितले. जिल्ह्यात साडेचार पालकमंत्री मित्रपक्षाचे कार्य कमी आणि कारवायाच अधिक आहेत. जिल्ह्यात साडेचार पालकमंत्री कार्यरत आहेत. ते कोणाची माती, श्राद्ध, जावळ सोडत नाहीत. अशा प्रवृत्तीला लगाम घालून जिल्ह्याला राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने कर्तबगार पालकमंत्री द्या, अशी मागणी विजय कुलकर्णी यांनी केली.