शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

सावित्रीबाई रुग्णालयाचा ‘आयुष्यमान’मध्ये समावेश- सामान्य रुग्णांना मिळणार आधार :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:54 IST

केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत आता कोल्हापूर महापालिकेच्या रविवार पेठेतील सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा लवकरच समावेश होणार आहे. त्यामुळे सामान्य

ठळक मुद्दे पाच महिन्यांत ३०० जणांवर उपचार; अत्याधुनिक सुविधा

गणेश शिंदे ।कोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत आता कोल्हापूर महापालिकेच्या रविवार पेठेतील सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा लवकरच समावेश होणार आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना आधार मिळणार आहे. गेल्या पाच महिन्यांत ‘आयुष्यमान’मधून कोल्हापूरतील ३०० जणांनी उपचार घेतले आहेत.

पहिल्या टप्प्यात सरकारी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ८३ सरकारी रुग्णालयांत ही योजना सध्या सुरू आहे. या योजनेत एका कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मिळणार आहेत. या योजनेत १३०० आजारांचा समावेश आहे. जिल्ह्यात २५ सप्टेंबर २०१८ ला ही योजना सरकारी रुग्णालयांत सुरू झाली. गेल्या पाच महिन्यांत ३०० लाभार्थ्यांनी ( २६ फेब्रुवारी २०१९ अखेर) उपचार घेतले आहेत.दरम्यान, सावित्रीबाई फुले रुग्णालयात सर्वप्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागात सहा खाट, ३६ डॉक्टर, २७ नर्सिंग आदींचा समावेश आहे. या सर्व सुविधा असल्यामुळे ‘आयुष्यमान’मध्ये समावेश होण्यासाठी केंद्र स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे. या रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीच ‘महात्मा फुले’ योजना सुरू झाली. त्यामुळे आता महात्मा फुले योजनेबरोबर ‘आयुष्यमान’मधील उपचाराचाही लाभ सर्वसामान्यांना मिळणार आहे.महात्मा फुले, ‘आयुष्यमान’चे एकत्रिकरणराज्य सरकारची महात्मा जोतिबा फुले योजना व केंद्र सरकारची ‘आयुष्यमान जनआरोग्य योजना’ आहे. या दोन्ही योजनांत एकसारख्या आजारांचा समावेश आहे. या दोन्ही योजनांचे एकत्रिकरण सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सर्वसामान्यांना (पिवळे व केशरी रेशनकार्डधारक) होणार आहे. या दोन्ही योजनांमुळे रेशनकार्ड लिंक होणार आहे. दोन्ही योजनांतील साडेसहा लाख रुपयांचे वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होणार आहे. मात्र; यासाठी ‘आयुष्यमान’च्या पत्रकात (ओळखपत्र) संबंधित कुटुंबप्रमुखाचे नाव असले पाहिजे.‘आयुष्यमान’चे ब्रॅडिंगखासगी रुग्णालयात सुरूकोल्हापूर जिल्ह्यात ‘महात्मा फुले’मध्ये ३१ रुग्णालये समाविष्ट आहेत. या अंगीकृत रुग्णालयांत ‘आयुष्यमान’चे बॅ्रडिंग सुरू झाले आहे. योजनेचे फलक या खासगी रुग्णालयात लावण्यात आले आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवरून निविदा काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच खासगी रुग्णालयात आयुष्यमान सुरू होण्याची शक्यता आहे. 

सर्वसामान्यांचे आधारवड ठरलेली आयुष्यमान योजना येत्या ५ दिवसांत सावित्रीबाई फुले रुग्णालयात सुरू करण्याचा मानस आहे. - डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक,आयुष्यमान भारत योजना,कोल्हापूर.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलgovernment schemeसरकारी योजना