शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्शग्राम’ निवडीसाठी शनिवारची डेडलाईन

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

प्रत्येक आमदार घेणार तीन गावे दत्तक : पायाभूत सुविधा, खेडेगावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी योजना

प्रकाश पाटील -- कोपार्डे--राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या गावाची निवड करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व आमदारांना आॅक्टोबरअखेर अंतिम मुदत दिली आहे. या योजनेसाठी विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांना प्रत्येकी तीन गावे दत्तक घ्यावी लागणार आहेत. भाजपने सत्तेत आल्यानंतर खेडेगावांचा चेहरा बदलण्यासाठी व पायाभूत सुधारणा करण्यासाठी आमदार आदर्शग्राम योजनेचा संकल्प केला. प्रत्येक आमदारांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत किमान तीन गावांना दत्तक घेण्याचे बंधन घातले आहे. त्यापैकी पहिल्या गावासाठी जुलै २०१७, दुसरे गाव जुलै २०१८, तिसरे गाव जुलै २०१९ पर्यंत आदर्शग्राम म्हणून विकसित करण्याची जबाबदारी आमदारांची राहणार आहे. या संदर्भात ग्राम विकास विभागाने मार्गदर्शक सूचनांचा आदेश जारी केला आहे. आपल्या मतदारसंघातील कोणत्याही तीन गावांची निवड करावयाचे स्वातंत्र्य आमदारांना देण्यात आले आहे. महात्मा गांधींनी भारत देश हा प्रामुख्याने खेड्यात असून, खेड्याकडे वळा, अशी हाक दिली होती. महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण आदर्श गाव निर्माण करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. सक्षम आणि पारदर्शी पंचायत, ग्रामस्थांचा स्थानिक सहभाग वाढवून लोकशाहीची मुळे आणखी घट्ट करणे, हा सुद्धा या योजनेचा लाभ आहे. शहरी मतदारसंघातील सदस्यांना सोईच्या भागातील गावांना प्राधान्य देता येईल, विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, आदींतून प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना राज्यातील कोणतेही गाव दत्तक घेण्याची मुभा आहे. संबंधित आमदारांना स्वत:चे अथवा पत्नीचे गाव दत्तक घेता येणार नाही. या योजनेसाठी आतापासून साधारणपणे पावणेचार वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या गावाची निवड आॅक्टोबर ३१ अखेर करण्याची मुदत आमदारांना देण्यात आली आहे. पहिले गाव जुलै २०१७ पर्यंत आदर्शग्राम होईल, असे नियोजन आमदारांना करावे लागणार आहे. दुसरे गाव २०१६ मध्ये अंतिम करून जुलै २०१८ पर्यंत विकसित करावयाचे आहे. तर तिसरे गाव २०१७ पर्यंत निश्चित करून जुलै २०१९ पर्यंत ते करावयाचे आहे. या योजनेत गावांची निवड करताना एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे गाव निवडावयाचे आहे.पर्यावरणावर भर : सामाजिक एकोपा वाढवावा लागणार