शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘आदर्शग्राम’ निवडीसाठी शनिवारची डेडलाईन

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

प्रत्येक आमदार घेणार तीन गावे दत्तक : पायाभूत सुविधा, खेडेगावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी योजना

प्रकाश पाटील -- कोपार्डे--राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या गावाची निवड करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व आमदारांना आॅक्टोबरअखेर अंतिम मुदत दिली आहे. या योजनेसाठी विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांना प्रत्येकी तीन गावे दत्तक घ्यावी लागणार आहेत. भाजपने सत्तेत आल्यानंतर खेडेगावांचा चेहरा बदलण्यासाठी व पायाभूत सुधारणा करण्यासाठी आमदार आदर्शग्राम योजनेचा संकल्प केला. प्रत्येक आमदारांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत किमान तीन गावांना दत्तक घेण्याचे बंधन घातले आहे. त्यापैकी पहिल्या गावासाठी जुलै २०१७, दुसरे गाव जुलै २०१८, तिसरे गाव जुलै २०१९ पर्यंत आदर्शग्राम म्हणून विकसित करण्याची जबाबदारी आमदारांची राहणार आहे. या संदर्भात ग्राम विकास विभागाने मार्गदर्शक सूचनांचा आदेश जारी केला आहे. आपल्या मतदारसंघातील कोणत्याही तीन गावांची निवड करावयाचे स्वातंत्र्य आमदारांना देण्यात आले आहे. महात्मा गांधींनी भारत देश हा प्रामुख्याने खेड्यात असून, खेड्याकडे वळा, अशी हाक दिली होती. महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण आदर्श गाव निर्माण करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. सक्षम आणि पारदर्शी पंचायत, ग्रामस्थांचा स्थानिक सहभाग वाढवून लोकशाहीची मुळे आणखी घट्ट करणे, हा सुद्धा या योजनेचा लाभ आहे. शहरी मतदारसंघातील सदस्यांना सोईच्या भागातील गावांना प्राधान्य देता येईल, विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, आदींतून प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना राज्यातील कोणतेही गाव दत्तक घेण्याची मुभा आहे. संबंधित आमदारांना स्वत:चे अथवा पत्नीचे गाव दत्तक घेता येणार नाही. या योजनेसाठी आतापासून साधारणपणे पावणेचार वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या गावाची निवड आॅक्टोबर ३१ अखेर करण्याची मुदत आमदारांना देण्यात आली आहे. पहिले गाव जुलै २०१७ पर्यंत आदर्शग्राम होईल, असे नियोजन आमदारांना करावे लागणार आहे. दुसरे गाव २०१६ मध्ये अंतिम करून जुलै २०१८ पर्यंत विकसित करावयाचे आहे. तर तिसरे गाव २०१७ पर्यंत निश्चित करून जुलै २०१९ पर्यंत ते करावयाचे आहे. या योजनेत गावांची निवड करताना एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे गाव निवडावयाचे आहे.पर्यावरणावर भर : सामाजिक एकोपा वाढवावा लागणार