शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

‘आदर्शग्राम’ निवडीसाठी शनिवारची डेडलाईन

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

प्रत्येक आमदार घेणार तीन गावे दत्तक : पायाभूत सुविधा, खेडेगावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी योजना

प्रकाश पाटील -- कोपार्डे--राज्यात आमदार आदर्शग्राम योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या गावाची निवड करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व आमदारांना आॅक्टोबरअखेर अंतिम मुदत दिली आहे. या योजनेसाठी विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांना प्रत्येकी तीन गावे दत्तक घ्यावी लागणार आहेत. भाजपने सत्तेत आल्यानंतर खेडेगावांचा चेहरा बदलण्यासाठी व पायाभूत सुधारणा करण्यासाठी आमदार आदर्शग्राम योजनेचा संकल्प केला. प्रत्येक आमदारांनी आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत किमान तीन गावांना दत्तक घेण्याचे बंधन घातले आहे. त्यापैकी पहिल्या गावासाठी जुलै २०१७, दुसरे गाव जुलै २०१८, तिसरे गाव जुलै २०१९ पर्यंत आदर्शग्राम म्हणून विकसित करण्याची जबाबदारी आमदारांची राहणार आहे. या संदर्भात ग्राम विकास विभागाने मार्गदर्शक सूचनांचा आदेश जारी केला आहे. आपल्या मतदारसंघातील कोणत्याही तीन गावांची निवड करावयाचे स्वातंत्र्य आमदारांना देण्यात आले आहे. महात्मा गांधींनी भारत देश हा प्रामुख्याने खेड्यात असून, खेड्याकडे वळा, अशी हाक दिली होती. महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण आदर्श गाव निर्माण करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. सक्षम आणि पारदर्शी पंचायत, ग्रामस्थांचा स्थानिक सहभाग वाढवून लोकशाहीची मुळे आणखी घट्ट करणे, हा सुद्धा या योजनेचा लाभ आहे. शहरी मतदारसंघातील सदस्यांना सोईच्या भागातील गावांना प्राधान्य देता येईल, विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, आदींतून प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना राज्यातील कोणतेही गाव दत्तक घेण्याची मुभा आहे. संबंधित आमदारांना स्वत:चे अथवा पत्नीचे गाव दत्तक घेता येणार नाही. या योजनेसाठी आतापासून साधारणपणे पावणेचार वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या गावाची निवड आॅक्टोबर ३१ अखेर करण्याची मुदत आमदारांना देण्यात आली आहे. पहिले गाव जुलै २०१७ पर्यंत आदर्शग्राम होईल, असे नियोजन आमदारांना करावे लागणार आहे. दुसरे गाव २०१६ मध्ये अंतिम करून जुलै २०१८ पर्यंत विकसित करावयाचे आहे. तर तिसरे गाव २०१७ पर्यंत निश्चित करून जुलै २०१९ पर्यंत ते करावयाचे आहे. या योजनेत गावांची निवड करताना एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे गाव निवडावयाचे आहे.पर्यावरणावर भर : सामाजिक एकोपा वाढवावा लागणार