शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

सरकारकडून ‘फुल ना फुलाची पाकळी’ तरीसुद्धा समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राज्यशासनाने लाॅकडाऊन काळात १५०० रुपये मदत अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. आजपर्यंत अशा पद्धतीने गोरगरीब रिक्षाचालकांचा ...

कोल्हापूर : राज्यशासनाने लाॅकडाऊन काळात १५०० रुपये मदत अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. आजपर्यंत अशा पद्धतीने गोरगरीब रिक्षाचालकांचा विचार कुठल्याही सरकारने केला नव्हता. त्यामुळे मिळालेली मदत कमी असली तरी ‘फुल ना फुलाची पाकळी’ समजून आम्ही तिचा स्वीकार करू, अशी भावना रिक्षाचालकांकडून व्यक्त होत आहे. या अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील १६ हजार परवानाधारक रिक्षाचालकांना मिळणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक अंग असलेल्या रिक्षाचालकांचा विचार राज्य शासनाने करून एकप्रकारे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे मदत जरी थोडकी असली तरी अनेकांना ती काहीअंशी दिलासा देणारी आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाचे रिक्षाचालकांतून स्वागत होत आहे. आतापर्यंत अनेक पक्षांची सत्ता राज्यात आली. मात्र, हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालकांचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांचा विचार उद्धव ठाकरे सरकारने केला. त्यामुळे त्यांनी जी १५०० रुपयांची मदत देऊ केली आहे. ती रक्कम जरी कमी असली तरी ती आमच्यासारख्या गोरगरीब रिक्षाव्यावसायिकांना मोठी दिलासा देणारी ठरणारी आहे. अशी भावना अनेक रिक्षाचालकांनी व्यक्त केली.

चौकट

जिल्ह्यात परवानाधारक रिक्षाचालक संख्या -१६०००

व्यवसायावर निर्भर संख्या : लाखोंच्या घरात

कोट

आतापर्यंत कुठल्याही सरकारने रिक्षा व्यावसायिकांचा विचार केलेला नव्हता; परंतु या सरकारने १५०० रुपयांची का होईना मदत देऊन एकप्रकारे अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे. हा विसरण्यासारखा नाही.

-चंद्रकांत भोसले,

रिक्षाचालक व अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा वाहतूक सेना

कोट

अनुदानाची रक्कम कितीही असु दे. मात्र, ती आमच्यासारख्या हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालकांचा काही अंशी रोजीरोटीचा प्रश्न मिटला आहे. मदत कमी असली तरी दिलासा देणारी आहे.

- विजय गायकवाड, रिक्षाचालक

कोट

लाॅकडाऊनच्या काळात ही मदत लाखमोलाची आहे. त्यामुळे सरकारकडून अपेक्षा मोठ्या असल्या तरी त्यांनी देऊ केलेली मदत चांगलीच आहे.

- दत्तात्रय साळोखे, रिक्षाचालक, लाड चौक रिक्षा मंडळ