शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील, महाडिक गटात रस्सीखेच--बिद्री निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 18:43 IST

सरवडे : लोकमत.न्यूज नेटवर्क --दत्ता लोकरे--- बिद्री ता.कागल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करवीर मतदारसंघातील सात गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देगट क्रमांक ७ वार्तापत्रआम.महाडीक हे राष्ट्रवादी च्या आघाडीबरोबर विधान परिषदेचे आमदार पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष दिसून येण्याची शक्यतामाघारीनंतर कार्यकर्त्यांच्या लढतीचे चित्र स्पष्ट

लोकमत.न्यूज नेटवर्कसरवडे : दत्ता लोकरे---  बिद्री ता.कागल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करवीर मतदारसंघातील सात गावांचा समावेश आहे. या मतदारसंघावर प्रभाव असणा?्या आ.सत्तेज उर्फ बंटी पाटील आणि आ.अमल महाडीक याच्यातील रस्सीखेच या निवडणुकीत तीव्र होणार आहे.शिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांचेही या गटावर वर्चस्व आहे. त्यामुळेच निवडणूक जरी बिद्रीची असले तरी पाटील आणि महाडिक गटाचा प्रभाव या गटावर असणार आहे.बदलत्या राजकीय समीकरणातुन या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप युती सोबत आ.अमल महाडिक यांची सर्व रसद असणार आहे. तर विरोधी माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांच्या राजर्षी शाहू आघाडीला माजी आ. पी.एन.पाटील यांची ताकद मिळणार आहे. तर आ. सतेज पाटील ही महाडीक यांच्या विरोधात ताकद उभे करतील अशी शक्यता आहे. यामुळे येथे महाडिक आणि पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.तरीही बिद्रीच्या निवडणुकीत यापूर्वी कधीच करवीर मधील एकाही प्रमुख नेत्यांनी कोणत्याही आघाडीच्या व्यासपीठावर येऊन उघड प्रचार केला नाही. परंतु पाटील आणि महाडिक यांचे कार्यकर्ते मात्र बिद्रीच्या रणांगणात एकाकी झुंज देणार हे निश्चित.

गतपंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीला माजी आमदार पी.एन. पाटील. यांच्या पाठिंबा होता . त्यांच्या कडून कृष्णात उर्फ बाळासाहेब पाटील(वडकशिवाले) याची उमेदवारी होती. तर विरोधी माजी आमदार के.पी. पाटील यांच्या महालक्ष्मी आघाडी ला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा.पाठिंबा होता. त्याच्याकडून श्रीपती पाटील(निगवे खालसा) यांच्यात लढत झाली. त्यात श्रीपती पाटील हे २२ हजार ८८१ मते घेऊन विजयी झाले. तर कृष्णात पाटील यांना १६हजार ९२५ मते पडली. त्यामुळे महालक्ष्मी आघाडीचे पाटील हे ५ हजार ९५६ मते घेऊन विजयी झाले.सध्या करवीर तालुक्यातील सात गावांच्या राजकीय समीकरणात बदल झाला आहे. आता करवीर मतदार. संघात येवती हे एकमेव गाव आहे. तर उर्वरित सहा गावांचा समावेश हा दक्षिण मतदार संघात झाला आहे. पूर्वीच्या रचनेनुसार पी.एन.पाटील यांचे प्राबल्य दिसून येत होते. सध्या या विधानसभा मतदारसंघातून आमदार अमल महाडीक हे प्रतिनिधित्व करत आहेत. तर आमदार सतेज पाटील हे विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करत आहेत. पी.एन.पाटील यांचा  जाधव यांच्या आघाडीला पाठिंबा आहे तर राष्ट्रवादी व भाजप आघाडी असल्याने आम.महाडीक हे राष्ट्रवादी च्या आघाडीबरोबर विधान परिषदेचे आमदार पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे. तर दोन्ही आघाडी तून कोणत्या गटाला उमेदवारी यावर समीकरणांची जुळणी होणार आहे.त्यामुळे २८ सप्टेंबर च्या माघारीनंतर कार्यकर्त्यांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.बिद्रीच्या निवडणूकीत करवीर तालुक्यातील ७ गावांचा गट क्रमांक ७ मध्ये समावेश आहे. तर ३५१२ मतदार आहेत.सर्वाधिक १०९१ मतदार निगवे खालसा येथेआहेत.तर.बिद्रीसाठी एकूण मतदान ५७ हजार ८०९ इतके आहे.त्यामुळे निर्णायक मतदान असल्याने या गटाकडे. दोन्ही आघाडीचे लक्ष असणार आहे.गट क्रमांक ७ मधील गावे : निगवे खालसा १०९१, खेबवडे ६३५, चुये ५२३, कावणे ४४८, वडकशिवाले ४८९ ,इस्पूर्ली १३, येवती ३१२.यापूर्वी गत क्रमांक सात मधून प्रतिनिधित्व केलेले संचालक असे : १९९० ते ९५ :नामदेव कोंडीबा चौगले (निगवे.खालसा) ,१९९५ ते २०००: नामदेव कोंडीबा चौगले (निगवे खालसा) २००० त २००५ कृष्णात बंडू पाटील (वडकशिवाले) २००५ त २०१० :शशिकांत आनंदराव पाटील (चुये) ,२०१० त २०१५:श्रीपती बापू पाटील (निगवे खालसा)