शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सतरा गावे होणार शंभर टक्के बायोगॅसयुक्त

By admin | Updated: March 10, 2016 23:54 IST

जिल्हा परिषद : संकल्पना राबविण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम, गतवर्षापासून योजना कार्यान्वित

आयुब मुल्ला -- खोची -जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक-दोन गावे बायोगॅसयुक्त करण्याचे घेतलेले उद्दिष्ट कृषी विभागाने अंतिम टप्प्यात आणले आहे. सतरा गावांत बायोगॅसयुक्तची मोहीम हाती घेतली होती. यापैकी दोन गावे वगळता अन्य ठिकाणी जवळपास उद्दिष्टपूर्ती होत आली आहे. मार्चअखेर ती संपूर्णपणे होईल. राज्यात अशी मोहीम राबविणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा ठरणार आहे.केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ती राबविली जाते. गेल्या आठ वर्षांत संपूर्ण राज्यात उद्दिष्टापेक्षा अधिक पूर्ती करण्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे प्रथम क्रमांक राज्यात पटकाविण्याची परंपराही कायम राखली आहे.जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व जाणीवजागृती झाल्याने चांगल्याप्रकारे योजनेला गती मिळाली आहे. संपूर्ण देशात कोल्हापूरकडे योजनेच्या माध्यमातून बायोगॅस योजनेचा यशस्वी पॅटर्न म्हणून पाहिले जाते. राज्यात एकूण ३५ जिल्हे आहेत. म्हणजे राज्याच्या एकूण उद्दिष्टांपैकी निम्म्यापेक्षा जास्त उद्दिष्ट जिल्ह्याला दिले जाते. त्याच्या पुढे जाऊन उद्दिष्टपूर्ती केली जाते. यापेक्षा अधिक नावीन्यपूर्ण ओळख व्हावी. योजना प्रत्येकाने राबवावी. ती घराघरांत पोहोचवावी या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक तालुक्यातील एक-दोन गावांत लोकसंख्येच्या आधारावर पात्र कुटुंबानुसार संख्या निश्चित करून उद्दिष्ट दिले. त्यानुसार ती संख्या २ हजार ४ इतकी आहे. यापैकी सुमारे सतराशेपेक्षा जास्त पूर्ण झाले आहेत. दोनशे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित शंभर मार्चअखेर पूर्ण होतील.जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. बायोगॅसयुक्त ही संकल्पना राज्यात प्रभावीपणे राबविणारा कोल्हापूर एकमेव जिल्हा आहे. निवड केलेल्या गावांत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. एक-दोन गावांत प्रमाण कमी आहे. मार्चपर्यंत त्यात वाढ झालेली दिसेल. शंभर टक्के बायोगॅसयुक्त गावे करून पहिल्या टप्प्यातील यश प्राप्त करू.- चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.वाटचाल बायोगॅसयुक्तीकडेसतरांपैकी चार गावे बायोगॅसयुक्त झाली आहेत. ९० ते ९८ टक्क्यांपर्यंत वाटचाल केलेली सहा गावे आहेत. ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेली पाच गावे आहेत. फक्त शिरोळ तालुक्यातील लाटवाडी गावात प्रमाण अत्यल्प आहे, तर गगनबावडा तालुक्यातील धुंडवडे गावात ४६ टक्के काम झाले आहे.