शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

सरपंचांना तुटपुंजे मानधन...

By admin | Updated: July 17, 2015 23:06 IST

उपसरपंचांना मानधन नाही.. : मानधनात वाढ करण्याची मागणी

नाना जाधव - भादोले -ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांना शासन आणि ग्रामपंचायतीकडून अतिशय तुटपुंजे मानधन मिळत असून, उपसरपंचांना तर मानधनच मिळत नाही. शासनाच्या विविध योजनांची गावात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच, उपसरपंचांना तसेच ग्रामपंचायत सदस्यांना तालुक्यात, जिल्ह्यात पदरमोड करून हेलपाटे मारावे लागत असल्याने शासनाने सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.ग्रामपंचायत सरपंचांना शासन आणि ग्रामपंचायतीमार्फत मानधन देण्यात येते. हे मानधन लोकसंख्येच्या प्रमाणात तीन टप्प्यांवर निश्चित करण्यात आले आहे. दोन हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचांना मासिक ४०० रुपये, तर दोन हजार ते आठ हजारांपर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावातील सरपंचांना ६०० रुपये, तर आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचांना ८०० रुपये मानधन देण्यात येते. यापैकी ७५ टक्के मानधन शासनाकडून, तर २५ टक्के मानधन ग्रामपंचायतीकडून देण्यात येते.एकंदरीत सरपंचांना अतिशय तुटपुंजे मानधन मिळते. सरपंचांच्या गैरहजेरीत कार्यभार पाहणाऱ्या उपसरपंचांना मासिक २५ रुपये मानधन देण्यात येते. तसेच महिला सरपंच असणाऱ्या अनेक गावांत उपसरपंचांना विकासकामांचा पाठपुरावा करावा लागतो. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अनेक योजना थेट गावांमध्ये राबविण्यात येतात. या योजनेच्या माहितीसाठी तालुकास्तरावर, जिल्हा स्तरावर बैठकीचे आयोजन होते. यासाठी सरपंचांना उपस्थित राहावे लागते. विविध कामांचा निधी मिळविण्यासाठी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार व खासदार यांना भेटून निधीसाठी पाठपुरावा करावा लागतो. या प्रवास खर्चासाठी सरपंच, उपसरपंच यांना पदरमोड करावी लागते. याची शासनाने दखल घेऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागातील केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांना अतिशय कमी मानधन मिळते. त्यांच्या मानधनात वाढ करावी. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. - सुजित मिणचेकर, आमदार