शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

कोगे, खुपिरे, शिरटी, मजरेवाडी, तळेवाडीचे सरपंच आरक्षण ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोगे, खुपिरे, शिरोळ तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी तर गडहिंग्लज तालुक्यातील तळेवाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोगे, खुपिरे, शिरोळ तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी तर गडहिंग्लज तालुक्यातील तळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण कायम राखले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी याबाबतचा निकाल दिला. फणसवाडी (ता. भुदरगड) व तमदलगे (ता. शिरोळ) आरक्षणाबाबत आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर सरपंचपदासाठी आरक्षण काढण्यात आले, त्यानुसार ९ फेब्रुवारीला सरपंच निवडीचा कार्यक्रमही जाहीर झाला. मात्र, कोगे आरक्षणावर ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, खुपिरे आरक्षणावर ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे, शिरटी आरक्षणावर ग्रामपंचायत सदस्य रामदास भंडारे व कुमार रोजे, मजरेवाडी आरक्षणावर ग्रामपंचायत सदस्य किशोर जुगळे व लक्ष्मण चौगुले, तळेवाडी आरक्षणावर सदस्य लक्ष्मीबाई सुतार यांनी उच्च न्यायालयात हरकत घेतली होती. न्यायालयाने संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊन निकाल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊन आतापर्यंत उंड्री, कोगे, खुपिरे, मजरेवाडी, तळेवाडी सहा ग्रामपंचायतींचे आरक्षण कायम ठेवल्याचा निकाल दिला. त्यामुळे करवीर, गडहिंग्लज तालुक्यातील सरपंच निवडींचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला.

निमशिरगाव, दानोळी, शिरदवाडचे आरक्षण बदलणार?

शिरोळ तालुक्यातील ‘नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गा’साठी निश्चित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे आरक्षण प्रक्रिया तपासली असता, निमशिरगाव, दानोळी, शिरदवाड, तमदलगे येथे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ किंवा ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रवर्ग’ असा बदल होऊ शकतो. निमशिरगाव गावास २००० मध्ये ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ आरक्षण असल्याने तेथे आळीपाळीचे तत्त्वाने ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री’ आरक्षण देय होते. असे सकृतदर्शनी निदर्शनास येते. त्यामुळे दानोळी, शिरदवाड, तमदलगे या गावांतून चिठ्ठीद्वारे एका ग्रामपंचायतीचे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री’ आरक्षण काढणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.