शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

सरपंच, सदस्य अपात्रतेबाबत दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:54 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गैरकारभार केलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हा परिषदांच्या मुख्य ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गैरकारभार केलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावण्याच न घेतल्याने पुणे विभागातील ३२ गावांची प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करताना विभागीय आयुक्त कार्यालयाला अडचणी येत आहेत.यांतील अनेक प्रकरणे गेली दोन वर्षे सुरू असून, आता मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अहवालानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पुढील कार्यवाही होणार आहे. यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत.ग्रामपंचायतीचे अनियमित कामकाज, गैरकारभार, अपहार, अतिक्रमणे या संदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ नुसार संबंधितांविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातील पहिला टप्पा पार पाडून विभागीय आयुक्तांनी या ३२ गावांची सुनावणी घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेआहेत.पुणे जिल्ह्यातील बोरी बु. (ता. जुन्नर), कुरणेवाडी (ता. बारामती), नारायणगाव, पोंधवडी (ता. इंदापूर), खानवटे, बोरी खुर्द, आंबवणे (ता. मुळशी), कुरळी, केसनंद, चिंबळी (ता. खेड), संतोष नागवडे, रा. खामगाव, मांंजरी बु. आणि तुळापूर (ता. हवेली) या १३ गावांच्या प्रकरणांचा समावेश आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सात प्रकरणे यामध्ये असून, कणेरीवाडी, आंबेवाडी, उचगाव (ता. करवीर), बुधवार पेठ (ता. पन्हाळा), टाकवडे (ता. शिरोळ), नूल (ता. गडहिंग्लज), टोप-संभापूर (ता. हातकणंगले) या प्रकरणांचा समावेश आहे.सांगली जिल्ह्यातील मर्दवाडी (ता. वाळवा) आणि वायफळ (ता. जत) यांसह अन्य एका ग्रामपंचायतीची अशी एकूण तीन प्रकरणे आहेत; तर सोलापूर जिल्ह्यातील गारअकोले (ता. माढा), तडवळ (ता. अक्कलकोट), टेंभुर्णी (ता. माढा), कोरवली (ता. मोहोळ) या गावांच्या प्रकरणांचा समावेश आहे.अहवालाअभावी प्रलंबित प्रकरणेअ.नं. जिल्हा प्रलंबित प्रकरणे१ पुणे १३२ सातारा ०५३ सांगली ०३४ सोलापूर ०४५ कोल्हापूर ०७एकूण ३२सातारा जिल्ह्यातील पाच गावच्या तक्रारीसातारा जिल्ह्यातील हेळवाक- गासावेवाडी रस्त्यावरील गाळे, सटालेवाडी (ता. वाई), उंब्रज (ता. कराड), अरबवाडी आणि नागझरी (ता. कोरेगाव) या पाच गावांच्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत तक्रारी आहेत.