शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, सदस्य अपात्रतेबाबत दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:54 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गैरकारभार केलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हा परिषदांच्या मुख्य ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गैरकारभार केलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावण्याच न घेतल्याने पुणे विभागातील ३२ गावांची प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करताना विभागीय आयुक्त कार्यालयाला अडचणी येत आहेत.यांतील अनेक प्रकरणे गेली दोन वर्षे सुरू असून, आता मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अहवालानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पुढील कार्यवाही होणार आहे. यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत.ग्रामपंचायतीचे अनियमित कामकाज, गैरकारभार, अपहार, अतिक्रमणे या संदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ नुसार संबंधितांविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातील पहिला टप्पा पार पाडून विभागीय आयुक्तांनी या ३२ गावांची सुनावणी घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेआहेत.पुणे जिल्ह्यातील बोरी बु. (ता. जुन्नर), कुरणेवाडी (ता. बारामती), नारायणगाव, पोंधवडी (ता. इंदापूर), खानवटे, बोरी खुर्द, आंबवणे (ता. मुळशी), कुरळी, केसनंद, चिंबळी (ता. खेड), संतोष नागवडे, रा. खामगाव, मांंजरी बु. आणि तुळापूर (ता. हवेली) या १३ गावांच्या प्रकरणांचा समावेश आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सात प्रकरणे यामध्ये असून, कणेरीवाडी, आंबेवाडी, उचगाव (ता. करवीर), बुधवार पेठ (ता. पन्हाळा), टाकवडे (ता. शिरोळ), नूल (ता. गडहिंग्लज), टोप-संभापूर (ता. हातकणंगले) या प्रकरणांचा समावेश आहे.सांगली जिल्ह्यातील मर्दवाडी (ता. वाळवा) आणि वायफळ (ता. जत) यांसह अन्य एका ग्रामपंचायतीची अशी एकूण तीन प्रकरणे आहेत; तर सोलापूर जिल्ह्यातील गारअकोले (ता. माढा), तडवळ (ता. अक्कलकोट), टेंभुर्णी (ता. माढा), कोरवली (ता. मोहोळ) या गावांच्या प्रकरणांचा समावेश आहे.अहवालाअभावी प्रलंबित प्रकरणेअ.नं. जिल्हा प्रलंबित प्रकरणे१ पुणे १३२ सातारा ०५३ सांगली ०३४ सोलापूर ०४५ कोल्हापूर ०७एकूण ३२सातारा जिल्ह्यातील पाच गावच्या तक्रारीसातारा जिल्ह्यातील हेळवाक- गासावेवाडी रस्त्यावरील गाळे, सटालेवाडी (ता. वाई), उंब्रज (ता. कराड), अरबवाडी आणि नागझरी (ता. कोरेगाव) या पाच गावांच्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत तक्रारी आहेत.