शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

सरपंच, ग्रामसेवकांवर लवकरच कारवाई ?

By admin | Updated: March 2, 2016 01:26 IST

आमजाई व्हरवडेतील पेयजल अपहार : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लक्ष

सुनील चौगले -- आमजाई व्हरवडे --आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेत अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी संबंधित पाचजणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर कारवाई का करू नये याबाबत गेल्या आठवड्यात नोटीस बजावून खुलासा देण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले होते. मात्र, समाधानकारक खुलासा नसल्याचा अहवाल राधानगरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार दोन दिवसांत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार असल्याने सर्व तालुक्याच्या कारवाईकडे नजरा लागल्या आहेत.आमजाई व्हरवडे येथे ४९ लाख रुपयांच्या पेयजल योजनेत साडेचार लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.गेल्या तीन महिन्यांपूर्वीच संबंधित पाचजणांच्यावर फौजदारी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तक्रारदार गावकऱ्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी सुभेदार यांच्याकडे केली. या दोघांवर कारवाई झाली नाही, तर उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे सुभेदार यांनी या दोघांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. गेल्याच आठवड्यात या दोघांना नोटीस बजावून सरपंचांना अपात्र करून फौजदारी का करू नये, तर ग्रामसेविकेला निलंबित करून त्यांच्यावरही फौजदारी का करू नये, अशी नोटीस बजावून पाच दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीत हे दोघेही दोषीच असल्याचे प्रत्यक्षदर्शी स्पष्ट होत असल्याने खुलासा काय देणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले होते. गट विकास अधिकारी यांच्याकडे या दोघांनी खुलासा दिला होता. हा खुलासा समाधानकारक नसल्याचा अहवाल मंगळवारी गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारणारच असल्याने संपूर्ण तालुक्याचे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. घुले यांच्याशी संपर्क साधला असता सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. राधानगरीचे गटविकास अधिकारी नाईक यांनी मंगळवारी आमच्याकडे अहवाल दिला असून, या अहवालात समाधानकारक खुलासा नसल्याचे स्पष्ट आहे. हा अहवाल मुख्य कार्यकारी यांच्याकडे सोपविला जाणार असून, कारवाईबाबत तेच अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.