शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कोल्हापुर जिल्ह्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:36 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

ठळक मुद्देधरणक्षेत्रात अतिवृष्टी : ‘राधानगरी’चे सातही दरवाजे खुले१५ बंधारे पाण्याखाली; ‘भोगावती’ पात्राबाहेरराधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

मागील आठवड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस रोज हजेरी लावत होता. तासभर कोसळल्यानंतर दिवसभर कडकडीत ऊन पडत होते; पण गेले तीन-चार दिवस एकसारखा पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत तब्बल १०४.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यांत व धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत राधानगरीचे क्रमांक ३ व ६ हे दोन दरवाजे खुले होते; पण त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यातून प्रतिसेकंद १२ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद १२ हजार ५६७, तर दूधगंगा धरणातून २४५० घटफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील सहा नद्यांवरील १५ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात बारा घरांची पडझड झाल्याने चार लाख पाच हजारांचे नुकसान झाले आहे.‘पंचगंगे’च्या पातळीत वाढमंगळवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी १६ फुटांवर होती; पण सायंकाळी सहा वाजता ती २२ फुटांपर्यंत पोहोचली होती. दिवसभर तब्बल सहा फुटांनी पाण्याची पातळी वाढली.तालुकानिहाय पाऊस हातकणंगले- ९.१२, शिरोळ- ७.००, पन्हाळा- २६.००, शाहूवाडी- ३०.६७, राधानगरी- ३३.८३, गगनबावडा- १०४.५०, करवीर- १७, कागल- १५.५७, गडहिंग्लज- १६.५७, भुदरगड- २६.००, आजरा- ३६.२५, चंदगड- ३५.५०.झडीचा पाऊस आणि गारठा!साधारणत: जुलै महिन्यात झडीचा पाऊस सुरू असतो. संततधार पावसाने हवेत गारठा व कुबट वातावरण असते.असेच वातावरण गेले चार दिवस जिल्ह्यात आहे. हवेत गारठा असल्याने नागरिक घरातून बाहेर पडण्यास टाळत आहे.