शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुर जिल्ह्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:36 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

ठळक मुद्देधरणक्षेत्रात अतिवृष्टी : ‘राधानगरी’चे सातही दरवाजे खुले१५ बंधारे पाण्याखाली; ‘भोगावती’ पात्राबाहेरराधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

मागील आठवड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस रोज हजेरी लावत होता. तासभर कोसळल्यानंतर दिवसभर कडकडीत ऊन पडत होते; पण गेले तीन-चार दिवस एकसारखा पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत तब्बल १०४.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यांत व धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत राधानगरीचे क्रमांक ३ व ६ हे दोन दरवाजे खुले होते; पण त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यातून प्रतिसेकंद १२ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद १२ हजार ५६७, तर दूधगंगा धरणातून २४५० घटफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील सहा नद्यांवरील १५ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात बारा घरांची पडझड झाल्याने चार लाख पाच हजारांचे नुकसान झाले आहे.‘पंचगंगे’च्या पातळीत वाढमंगळवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी १६ फुटांवर होती; पण सायंकाळी सहा वाजता ती २२ फुटांपर्यंत पोहोचली होती. दिवसभर तब्बल सहा फुटांनी पाण्याची पातळी वाढली.तालुकानिहाय पाऊस हातकणंगले- ९.१२, शिरोळ- ७.००, पन्हाळा- २६.००, शाहूवाडी- ३०.६७, राधानगरी- ३३.८३, गगनबावडा- १०४.५०, करवीर- १७, कागल- १५.५७, गडहिंग्लज- १६.५७, भुदरगड- २६.००, आजरा- ३६.२५, चंदगड- ३५.५०.झडीचा पाऊस आणि गारठा!साधारणत: जुलै महिन्यात झडीचा पाऊस सुरू असतो. संततधार पावसाने हवेत गारठा व कुबट वातावरण असते.असेच वातावरण गेले चार दिवस जिल्ह्यात आहे. हवेत गारठा असल्याने नागरिक घरातून बाहेर पडण्यास टाळत आहे.