शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कोल्हापुर जिल्ह्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:36 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

ठळक मुद्देधरणक्षेत्रात अतिवृष्टी : ‘राधानगरी’चे सातही दरवाजे खुले१५ बंधारे पाण्याखाली; ‘भोगावती’ पात्राबाहेरराधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

मागील आठवड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस रोज हजेरी लावत होता. तासभर कोसळल्यानंतर दिवसभर कडकडीत ऊन पडत होते; पण गेले तीन-चार दिवस एकसारखा पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत तब्बल १०४.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यांत व धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत राधानगरीचे क्रमांक ३ व ६ हे दोन दरवाजे खुले होते; पण त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यातून प्रतिसेकंद १२ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद १२ हजार ५६७, तर दूधगंगा धरणातून २४५० घटफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील सहा नद्यांवरील १५ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात बारा घरांची पडझड झाल्याने चार लाख पाच हजारांचे नुकसान झाले आहे.‘पंचगंगे’च्या पातळीत वाढमंगळवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी १६ फुटांवर होती; पण सायंकाळी सहा वाजता ती २२ फुटांपर्यंत पोहोचली होती. दिवसभर तब्बल सहा फुटांनी पाण्याची पातळी वाढली.तालुकानिहाय पाऊस हातकणंगले- ९.१२, शिरोळ- ७.००, पन्हाळा- २६.००, शाहूवाडी- ३०.६७, राधानगरी- ३३.८३, गगनबावडा- १०४.५०, करवीर- १७, कागल- १५.५७, गडहिंग्लज- १६.५७, भुदरगड- २६.००, आजरा- ३६.२५, चंदगड- ३५.५०.झडीचा पाऊस आणि गारठा!साधारणत: जुलै महिन्यात झडीचा पाऊस सुरू असतो. संततधार पावसाने हवेत गारठा व कुबट वातावरण असते.असेच वातावरण गेले चार दिवस जिल्ह्यात आहे. हवेत गारठा असल्याने नागरिक घरातून बाहेर पडण्यास टाळत आहे.