शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जिल्ह्यात संततधार; भोगावती नदी पात्राबाहेर

By admin | Updated: June 22, 2015 00:47 IST

जनजीवन विस्कळीत : ‘राजाराम’सह बारा बंधारे पाण्याखाली; गगनबावडा, आजऱ्यात १०० मिमी. पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची संततधार राहिली. गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, भोगावती नदीचे पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर आले आहे. पंचगंगा दुथडी भरून वाहू लागली, तर ‘राजाराम’सह बारा बंधारे सकाळीच पाण्याखाली गेले. गगनबावडा व आजरा तालुक्यांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ७१८.१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात रविवारी दिवसभर संततधार पाऊस राहिल्याने सखल भाग जलमय झाला. व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, आदी भागांत रस्त्यावर फूट ते दीड फूट पाणी तुंबले. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. रविवार असल्याने सकाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारावरही पावसाचा परिणाम दिसला. धरणक्षेत्रात तर धुवाधार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणक्षेत्रात १७३, वारणा परिसरात ११०, दूधगंगा परिसरात १४२, कुंभी धरणक्षेत्रात तब्बल २१९, तर कोदे लघू पाटबंधारे प्रकल्प क्षेत्रात चोवीस तासांत ३०७ मिलिमीटर पाऊस झाला. नद्यांच्या पातळीत सकाळपासून झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी शनिवारपेक्षा तब्बल नऊ फुटांनी वाढून ती १७.९ फुटांपर्यंत पोहोचली आहे. या नदीवरील राजाराम, रुई, सुर्वे बंधारे सकाळी दहा वाजताच पाण्याखाली गेले असून, बंधाऱ्यांवर दोन फूट पाणी आहे. भोगावती नदीवरील कोगे, तर कासारी नदीवरील यवलूज, ठाणे, आळवे, पुनाळ, तिरपण, वाळोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण, काटे हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. भोगावती नदीचे पाणी या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले. पंचगंगा नदीचे पाणी अद्याप पात्रात असले तरी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी काठांवरील पिकांत पाणी शिरले आहे. बंधाऱ्यावर पाणी व रस्ते खराब झाल्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून, या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे. गगनबावडा तालुक्यातील असळज ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्रावर झाड कोसळून सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आजऱ्यात नदीपात्रात वाढआजरा : गेले दोन दिवस आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना घरीच थांबविणे पसंत केले, तर पावसामुळे मैदानावर उपक्रम राबविणे शक्य नसल्याने काही शाळांनी व्हरांड्यावर, तर कांही शाळांनी वर्गातच ‘योगा’चे धडे दिल्याने विद्यार्थ्यांच्या पचनी कितपत पडणार? हा संशोधनाचा विषय आहे. एकंदर आजऱ्यात ‘योगा’वर पावसाचे पाणी पडले.राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्पकसबा बावडा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेला. बंधाऱ्याजवळ सध्या १९ फूट इतकी पाण्याची पातळी आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक आता ठप्प झाली आहे.बंधाऱ्याच्या फळ्या (लोखंडी प्लेटा) पाटबंधारे विभागाने १ जूनला काढल्या होत्या. त्यामुळे बंधाऱ्याची पातळी हळूहळू कमी होत गेली होती. नदीपात्र कोरडे झाले होत. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. शनिवारी दिवसरात्र पडलेल्या या पावसामुळे व रविवारीही पहाटेपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे बंधारा पाण्याखाली गेला.बंधारा पाण्याखाली गेल्याचा फटका कसबा बावडा, वडणगे, निगवे, केर्ली, भुयेवाडी, आदी गावाला बसतो. दरम्यान, कसबा बावडा आणि परिसरात पडत असलेल्या या दमदार पावसामुळे बळिराजा चांगलाच सुखावला आहे. सध्या परिसरात उसाला अंतिम रासायनिक खताचा ढोस देण्याचे काम जोरात सुरू आहे. खरीप भात भांगलणीच्या कामालाही आता जोर आला आहे. ताम्रपर्णी, घटप्रभा नदी भरलीचंदगड : गेल्या दोन दिवसांत चंदगड तालुक्यात पावसाने जोर धरल्याने शेतकरी वर्ग रताळी व बटाटे लागवडीमध्ये मग्न आहेत. मृग नक्षत्र सुरू होऊन तब्बल १५ दिवसांनी पावसाने सुरुवात केली. त्यामुळे १५ दिवसांनी शेतीची कामे पुढे गेली आहेत.शनिवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. सोमवारी दिवसभर ८७.१६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ताम्रपर्णी व घटप्रभा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सोमवारी रात्रभर जोर राहिल्यास घटप्रभा व ताम्रपर्णी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडेल. वारणा, कडवी नदीच्या दुथडी भरल्यामलकापूर : शाहूवाडी तालुक्यात पावसाची दिवसभर संततधार सुरू आहे. सरीवर सरी कोसळत आहेत. तालुक्यात रविवारी ८१. मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर तालुक्यात २२४.५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.पावसाळा सुरू होऊन अवघ्या दहाव्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वारणा, कडवी, कासारी व शाळी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. विशाळगड, गेळवडे, निनाईपरळे व चांदोली धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. वादळी वाऱ्यामुळे घराची कौले, उडून गेली आहेत, तर काही ठिकाणी नदीपात्रात झाडे उन्मळून पडली आहेत. पावसातही भाविकांच्या रांगाजोतिबा : परिसरात पावसाने सलग दोन दिवस झोडपून काढले. दाट धुके, गार वारा, संततधार पडणाऱ्या पावसाने वातावरणात बदल झाला आहे. अधिक मास असल्याने जोतिबा दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. भर पावसात भाविकांनी मंदिराभोवती तीन-चार पदरी दर्शन रांगा लावल्या होत्या. गडहिंग्लजमध्ये लक्ष्मी चौकास तळ्याचे स्वरूपगडहिंग्लज : शनिवारी दुपारीनंतर सुरू झालेल्या मान्सूनच्या पावसाची संततधार रविवारीदेखील गडहिंग्लज शहर व तालुक्यात कायम राहिली. शहरातील तुंबलेल्या गटारींमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. लक्ष्मी चौकासह ठिकठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. गडहिंग्लजच्या आठवडा बाजारावरही पावसाचा परिणाम झाला. बाजाराला आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही त्रेधातिरपीठ उडाली. संततधार पावसामुळे नाले, ओढे, तलाव व नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. जोरदार पावसाने शेतकरी सुखावला असून, खोळंबलेल्या खरिपाच्या पेरणीला पुन्हा जोर येणार आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले- १५, शिरोळ- ५.१४, पन्हाळा- ६७.१४, राधानगरी- ४४.८३, गगनबावडा- १८४.५०, करवीर- ३३.१३, कागल- २४.०७, गडहिंग्लज- २५.१४, भुदरगड- ४९.८०, आजरा- १०१.२५, चंदगड- ८७.१७.