शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संकेश्वरकरांना एप्रिलपासून मीटरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST

संकेश्वर : शासनाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून नगरपालिकेतर्फे शहराला मीटर लावून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आता नागरिकांना ...

संकेश्वर : शासनाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून नगरपालिकेतर्फे शहराला मीटर लावून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आता नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार असून नळांना तोटी बसविणे सक्तीची केली जाणार आहे, अशी महिती आमदार उमेश कत्ती यांनी दिली.

पालिकेच्या सभागृहात पाणीपुरवठा विभागाच्या आयोजित खास बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सीमा हतनुरे होत्या.

कत्ती म्हणाले, सध्या जुन्या पद्धतीने कर आकारणी केली जाते. मात्र, २४ तास पाणी योजनेमुळे प्रत्येक नळधारकास प्रति महिना ७ हजार लीटर पाण्यास ५६ रुपये, ८ ते १५ हजार लीटरसाठी १२० रुपये, १५ ते २५ हजार लीटरसाठी २२४ तर २५ हजारांच्या पुढे प्रति हजारी ५२ रुपये माेजावे लागणार आहेत.

शहरात ६५९४ नळधारक असून त्यामध्ये २१२ नळधारक हे संस्थेचे आहेत. मीटर व तोटी बसविणे कामे पूर्ण झाल्याची पाहणी राज्य पाणी पुरवठा मंडळ करेल. शहरातील अनधिकृत बांधकामे व ले-आऊट रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीस उपनगराध्यक्ष अजित करजगी, कर्नाटक राज्य पाणीपुरवठा अभियंता चंद्राप्पा शिरूर, सुरेश नामगथु यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.