शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संजय घाटगे गटाचा आबिटकर गटाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:32 IST

म्हाकवे : ऊन, वारा, पाऊस यांसह नैसर्गिक आपत्तींचा सामना करून अख्खे शेतकरी कुटुंब ऊस पिकविते. त्यांच्या घामाचे दाम त्यांना मिळवून देण्याचे आणि बिद्री कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्याचे काम

ठळक मुद्देसत्तेची हाव असणारे मुश्रीफ खुर्ची सोडत नाहीत.‘बिद्री’ला राजकीय अड्डा बनविणाºया आणि ‘खोटे बोल, पण रेटून बोल,’ अशी प्रवृत्ती जोपसाणाºयांना या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करूया.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : ऊन, वारा, पाऊस यांसह नैसर्गिक आपत्तींचा सामना करून अख्खे शेतकरी कुटुंब ऊस पिकविते. त्यांच्या घामाचे दाम त्यांना मिळवून देण्याचे आणि बिद्री कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्याचे काम केवळ दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच करू शकते. म्हणूनच आम्ही त्यांना ‘बिद्री’च्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्धार केला असल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी स्पष्ट केले. शेतकºयांची असणारी जिल्हा बँक, भूविकास बँकेसह दहा वर्षांच्या काळात बिद्री साखर कारखान्यालाही आर्थिक अडचणीत आणणाºया आमदार मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांच्या अप्प्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आपल्या गटाचा हा निर्णय असल्याचे घाटगे म्हणाले.व्हन्नाळी (ता. कागल) येथे ‘बिद्री’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गटाची भूमिका जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, विजयसिंह मोरे, के. जी. नांदेकर, दत्ता उगले, नंदकुमार सूर्यवंशी, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी घाटगे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला फार मोठी संधी मिळाली आहे. त्याच्या माध्यमातून पाटील यांनी चांगले कार्य केले आहे. म्हणूनच त्यांच्यासोबत राहण्याची आमची इच्छा आहे. आमदार सुरेश हाळवणकर आणि मंत्री पाटील यांच्याशी आमच्या चर्चा सुरू आहेत. त्यांना आमच्यासोबत घेण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू. जाईल तिथे गुण उधळणाºया हसन-किसन प्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आम्ही दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु यापुढे पडद्यामागूनचे वार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि दहशत एका बाजूला असताना आम्ही केवळ सभासदांच्या विश्वासार्हतेच्या जोरावर ‘मिशन बिद्री’ यशस्वी करू. यामध्ये संजय घाटगेंची भूमिका लाखमोलाची असून, त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन आमच्या विजयाची मुहूर्तमेढच रोवली आहे.माजी आमदार दिनकरराव जाधव म्हणाले, के. पी. पाटील यांनी केवळ ‘बिद्री’ची सत्ता राखण्यासाठी सभासद वाढीचा एककलमी कार्यक्रम राबविला. देशात कुठल्याही कारखान्यात नाहीत एवढे कारखान्याशी दुरान्वये संबंध नसणारे सभासद करून ठेवले. यावरूनच त्यांच्या भोंगळ कारभाराची कल्पना येते. केवळ पै-पाहुण्यांचे हित जोपासून ‘बिद्री’ला राजकीय अड्डा बनविणाºया आणि ‘खोटे बोल, पण रेटून बोल,’ अशी प्रवृत्ती जोपसाणाºयांना या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करूया.

धनराज घाटगे यांनी स्वागत केले. के. जी. नांदेकर, दत्ता उगले, विजयसिंह मोरे, दिलीप पाटील (यमगे), आनंदा साठे (बोरवडे), आदींनी आपल्या मनोगतात ‘बिद्री’च्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. यावेळी ए. वाय. पाटील (म्हाकवे), अन्नपूर्णाचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सत्यजित जाधव, सिद्राम गंगाधरे, धनाजी गोधडे, संतोष ढवण, बालाजी फराकटे, विश्वजित जाधव, अन्नपूर्णाचे सचिव आकाराम बचाटे, राजू भराडे, आदी प्रमुख उपस्थित होते. दत्तोपंत वालावलकर यांनी आभार मानले.भेटलो म्हणजे गट बदलला नव्हेआम्ही राष्टÑवादी-भाजप आघाडीसोबत गेल्याच्या वावड्या उठल्या; परंतु के. पीं.चा पराभव हेच आमचे ध्येय आहे. म्हणूनच चंद्रकांतदादांनी निरोप दिल्यानंतर हसन-किसनच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचण्यासाठी आणि आमची त्यांच्या विरोधातील भूमिका स्पष्ट करण्यासाठीच आम्ही गेलो होतो. आपणही आमच्या आघाडीसोबत यावे, अशी विनंतीही त्यांना केल्याचे के. जी. नांदेकर आणि विजयसिंह मोरे यांनी स्पष्ट केले.मुश्रीफ खुर्ची सोडत नाहीतआमदार मुश्रीफांनीच बँक संपविली. त्यांनाच अध्यक्ष केले गेले. दोन वर्षांनंतर मुश्रीफांचा राजीनामा घेऊन माजी आमदार पी. एन. पाटील यांना अध्यक्ष करण्याचे ठरले असताना देखील सत्तेची हाव असणारे मुश्रीफ खुर्ची सोडत नाहीत.याला विरोध होईल म्हणूनच त्यांनी संचालकांना परदेश वारी घडवून आणली. हे जिल्ह्याचे केवढे मोठे दुर्दैव आहे, असे घाटगे म्हणाले.