शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

संजय घाटगे गटाचा आबिटकर गटाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:32 IST

म्हाकवे : ऊन, वारा, पाऊस यांसह नैसर्गिक आपत्तींचा सामना करून अख्खे शेतकरी कुटुंब ऊस पिकविते. त्यांच्या घामाचे दाम त्यांना मिळवून देण्याचे आणि बिद्री कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्याचे काम

ठळक मुद्देसत्तेची हाव असणारे मुश्रीफ खुर्ची सोडत नाहीत.‘बिद्री’ला राजकीय अड्डा बनविणाºया आणि ‘खोटे बोल, पण रेटून बोल,’ अशी प्रवृत्ती जोपसाणाºयांना या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करूया.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : ऊन, वारा, पाऊस यांसह नैसर्गिक आपत्तींचा सामना करून अख्खे शेतकरी कुटुंब ऊस पिकविते. त्यांच्या घामाचे दाम त्यांना मिळवून देण्याचे आणि बिद्री कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्याचे काम केवळ दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच करू शकते. म्हणूनच आम्ही त्यांना ‘बिद्री’च्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्धार केला असल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी स्पष्ट केले. शेतकºयांची असणारी जिल्हा बँक, भूविकास बँकेसह दहा वर्षांच्या काळात बिद्री साखर कारखान्यालाही आर्थिक अडचणीत आणणाºया आमदार मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांच्या अप्प्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आपल्या गटाचा हा निर्णय असल्याचे घाटगे म्हणाले.व्हन्नाळी (ता. कागल) येथे ‘बिद्री’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गटाची भूमिका जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, विजयसिंह मोरे, के. जी. नांदेकर, दत्ता उगले, नंदकुमार सूर्यवंशी, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी घाटगे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला फार मोठी संधी मिळाली आहे. त्याच्या माध्यमातून पाटील यांनी चांगले कार्य केले आहे. म्हणूनच त्यांच्यासोबत राहण्याची आमची इच्छा आहे. आमदार सुरेश हाळवणकर आणि मंत्री पाटील यांच्याशी आमच्या चर्चा सुरू आहेत. त्यांना आमच्यासोबत घेण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू. जाईल तिथे गुण उधळणाºया हसन-किसन प्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आम्ही दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु यापुढे पडद्यामागूनचे वार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि दहशत एका बाजूला असताना आम्ही केवळ सभासदांच्या विश्वासार्हतेच्या जोरावर ‘मिशन बिद्री’ यशस्वी करू. यामध्ये संजय घाटगेंची भूमिका लाखमोलाची असून, त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन आमच्या विजयाची मुहूर्तमेढच रोवली आहे.माजी आमदार दिनकरराव जाधव म्हणाले, के. पी. पाटील यांनी केवळ ‘बिद्री’ची सत्ता राखण्यासाठी सभासद वाढीचा एककलमी कार्यक्रम राबविला. देशात कुठल्याही कारखान्यात नाहीत एवढे कारखान्याशी दुरान्वये संबंध नसणारे सभासद करून ठेवले. यावरूनच त्यांच्या भोंगळ कारभाराची कल्पना येते. केवळ पै-पाहुण्यांचे हित जोपासून ‘बिद्री’ला राजकीय अड्डा बनविणाºया आणि ‘खोटे बोल, पण रेटून बोल,’ अशी प्रवृत्ती जोपसाणाºयांना या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करूया.

धनराज घाटगे यांनी स्वागत केले. के. जी. नांदेकर, दत्ता उगले, विजयसिंह मोरे, दिलीप पाटील (यमगे), आनंदा साठे (बोरवडे), आदींनी आपल्या मनोगतात ‘बिद्री’च्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. यावेळी ए. वाय. पाटील (म्हाकवे), अन्नपूर्णाचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सत्यजित जाधव, सिद्राम गंगाधरे, धनाजी गोधडे, संतोष ढवण, बालाजी फराकटे, विश्वजित जाधव, अन्नपूर्णाचे सचिव आकाराम बचाटे, राजू भराडे, आदी प्रमुख उपस्थित होते. दत्तोपंत वालावलकर यांनी आभार मानले.भेटलो म्हणजे गट बदलला नव्हेआम्ही राष्टÑवादी-भाजप आघाडीसोबत गेल्याच्या वावड्या उठल्या; परंतु के. पीं.चा पराभव हेच आमचे ध्येय आहे. म्हणूनच चंद्रकांतदादांनी निरोप दिल्यानंतर हसन-किसनच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचण्यासाठी आणि आमची त्यांच्या विरोधातील भूमिका स्पष्ट करण्यासाठीच आम्ही गेलो होतो. आपणही आमच्या आघाडीसोबत यावे, अशी विनंतीही त्यांना केल्याचे के. जी. नांदेकर आणि विजयसिंह मोरे यांनी स्पष्ट केले.मुश्रीफ खुर्ची सोडत नाहीतआमदार मुश्रीफांनीच बँक संपविली. त्यांनाच अध्यक्ष केले गेले. दोन वर्षांनंतर मुश्रीफांचा राजीनामा घेऊन माजी आमदार पी. एन. पाटील यांना अध्यक्ष करण्याचे ठरले असताना देखील सत्तेची हाव असणारे मुश्रीफ खुर्ची सोडत नाहीत.याला विरोध होईल म्हणूनच त्यांनी संचालकांना परदेश वारी घडवून आणली. हे जिल्ह्याचे केवढे मोठे दुर्दैव आहे, असे घाटगे म्हणाले.