शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

आजऱ्यात संजय गांधीचे ३२५ लाभार्थी अपात्र

By admin | Updated: April 4, 2015 00:03 IST

गरिबांची योजना : घोटाळेबाजांची चौकशी करणार कोण ?

कृष्णात सावंत - पेरणोली आजरा तालुक्यात संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, विधवा योजनेमधील एकूण ३२५ लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या गरिबांच्या योजनांची आजरा तालुक्यासह जिल्ह्यातही कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे गरिबांच्या योजनांची चौकशी करणाऱ्या शासनाला घोटाळेबाजांची चौकशी कोण करणार, अशी विचारणा लाभार्थ्यांमधून होत आहे.गरिबातील गरीब जनतेला विधवा, परित्यक्ता, निराधार स्त्रियांना ६५ वर्षांवरील वृद्धांना, अपंग, मतिमंद, दारिद्र्यरेषेखालील वृद्धांना शासनाने श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी या नावाने लाभार्थी निवडून पेन्शन योजना सुरू केली आहे. वृद्धांना, निराधार स्त्रियांना केवळ ६०० रुपये, तर विधवांना केवळ ९०० रुपये देणाऱ्या शासनाने फेरचौकशीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना चौकशीचा ससेमिरा लावला आहे.ज्यांचे मर्यादेपेक्षा उत्पन्न जास्त आहे. मुलगा सरकारी नोकरीत आहे. ते लाभार्थी अपात्र करणे योग्य आहे. वार्षिक ५ ते १० लाख रुपये शेतीचे उत्पन्न व सरकारी नोकरीत मुलगा, असे लाभार्थी हजारात एक आहेत. केवळ असे लाभार्थी न ठरवता जे दिवसभर कष्ट करून घाम गाळतात आणि पोट भरण्याइतपत उत्पन्न मिळवतात. अशांचाच अपात्रतेमध्ये समावेश करण्यात आल्याने जनतेमधून सरकारच्या धोरणाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठ्या रकमेची पेन्शन लागू होते; पण दिवसभर काबाडकष्ट करून देशाच्या उत्पादनात भर घालणाऱ्या शेतकरी, मजूर, असंघटित कामगार, स्त्रिया यांना पेन्शन का लागू होत नाही. लागू केली तर नामंजूर का करण्यात येते, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. त्यांनी असा कोणता गुन्हा व भ्रष्ट कारभार केला आहे, की त्यांची चौकशी केली जाते.कष्टकरी वर्गाची चौकशी केली जाते. मग चौकशी करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील महसूल विभागात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार दररोज होतो, याची चौकशी कोण करणार? याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.आधी भ्रष्टाचाऱ्यांची चौकशी करा, मग कष्टकऱ्यांची चौकशी करा, अशी मागणीही होत आहे. याबाबत अनेक संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.जे दाखले देतात तेच चौकशी करतातज्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी उत्पन्नाचे दाखले दिले. त्यांनीच चौकशी करून काही लाभार्थी अपात्र ठरवले आहेत. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी अपात्र ठरत नाही, असा परिपत्रकात आदेश आहे. तरीही काही लाभार्थी अपात्र ठरविण्यात आले आहेत.