शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

आजऱ्यात संजय गांधीचे ३२५ लाभार्थी अपात्र

By admin | Updated: April 4, 2015 00:03 IST

गरिबांची योजना : घोटाळेबाजांची चौकशी करणार कोण ?

कृष्णात सावंत - पेरणोली आजरा तालुक्यात संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, विधवा योजनेमधील एकूण ३२५ लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या गरिबांच्या योजनांची आजरा तालुक्यासह जिल्ह्यातही कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे गरिबांच्या योजनांची चौकशी करणाऱ्या शासनाला घोटाळेबाजांची चौकशी कोण करणार, अशी विचारणा लाभार्थ्यांमधून होत आहे.गरिबातील गरीब जनतेला विधवा, परित्यक्ता, निराधार स्त्रियांना ६५ वर्षांवरील वृद्धांना, अपंग, मतिमंद, दारिद्र्यरेषेखालील वृद्धांना शासनाने श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी या नावाने लाभार्थी निवडून पेन्शन योजना सुरू केली आहे. वृद्धांना, निराधार स्त्रियांना केवळ ६०० रुपये, तर विधवांना केवळ ९०० रुपये देणाऱ्या शासनाने फेरचौकशीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना चौकशीचा ससेमिरा लावला आहे.ज्यांचे मर्यादेपेक्षा उत्पन्न जास्त आहे. मुलगा सरकारी नोकरीत आहे. ते लाभार्थी अपात्र करणे योग्य आहे. वार्षिक ५ ते १० लाख रुपये शेतीचे उत्पन्न व सरकारी नोकरीत मुलगा, असे लाभार्थी हजारात एक आहेत. केवळ असे लाभार्थी न ठरवता जे दिवसभर कष्ट करून घाम गाळतात आणि पोट भरण्याइतपत उत्पन्न मिळवतात. अशांचाच अपात्रतेमध्ये समावेश करण्यात आल्याने जनतेमधून सरकारच्या धोरणाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठ्या रकमेची पेन्शन लागू होते; पण दिवसभर काबाडकष्ट करून देशाच्या उत्पादनात भर घालणाऱ्या शेतकरी, मजूर, असंघटित कामगार, स्त्रिया यांना पेन्शन का लागू होत नाही. लागू केली तर नामंजूर का करण्यात येते, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. त्यांनी असा कोणता गुन्हा व भ्रष्ट कारभार केला आहे, की त्यांची चौकशी केली जाते.कष्टकरी वर्गाची चौकशी केली जाते. मग चौकशी करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील महसूल विभागात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार दररोज होतो, याची चौकशी कोण करणार? याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.आधी भ्रष्टाचाऱ्यांची चौकशी करा, मग कष्टकऱ्यांची चौकशी करा, अशी मागणीही होत आहे. याबाबत अनेक संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.जे दाखले देतात तेच चौकशी करतातज्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी उत्पन्नाचे दाखले दिले. त्यांनीच चौकशी करून काही लाभार्थी अपात्र ठरवले आहेत. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी अपात्र ठरत नाही, असा परिपत्रकात आदेश आहे. तरीही काही लाभार्थी अपात्र ठरविण्यात आले आहेत.