शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

रब्बीच्या पेरणीत सांगली आघाडीवर

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

कोल्हापूर जिल्हा मात्र पिछाडीवर

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -परतीचा मान्सून समाधानकारक झाल्यामुळे विभागात रब्बी पिकांच्या पेरणीत सांगली जिल्हा सध्या आघाडीवर आहे. तब्बल ५३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याउलट कोल्हापूर जिल्हा मात्र पिछाडीवर आहे. या जिल्ह्यात पेरक्षेत्र अतिशय नगण्य आहे. विभागीय कृषी कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात अपेक्षेइतकी रब्बीची पेरणी झालेली नाही.  खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे वेध लागत असतात. यंदा जून महिन्यात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत खरीप पिकांच्या काढणीला वेग आला आहे. शेतकरी खरीप पिकांची काढणी झालेल्या जमिनीची मशागत करून प्रत्येक वर्षी रब्बी पिकांची पेरणी करीत असतो. सांगली, सातारा जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीला गती आली आहे. सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्वच तालुक्यांत परतीच्या मान्सूनने चांगली ‘कृपा’ केली. यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीमध्ये चांगली ओल निर्माण झाली आहे. हवामानही पोषक आहे. यामुळे हा हंगाम साधण्यासाठी शेतकरी जोरदार तयारीला लागले आहेत. ओल कमी होण्याआधीच पेरणीचे काम संपविण्यासाठी धडपड सुरू आहे. सातारा जिल्ह्यात ज्वारी ३३५ हेक्टर, मका ११००, इतर तृणधान्ये ३४६००, इतर अन्नधान्ये ३४६०० हेक्टर; तर सांगली जिल्ह्यात ज्वारी ४८७०० हेक्टर, मका ३६००, इतर तृणधान्ये ५२३००, अन्नधान्य ५२३००, करडई ८००, सूर्यफूल ४००, इतर धान्य १००, अन्य धान्ये १३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. परतीचा मान्सूनही सर्वत्र बरसला आहे. यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा रब्बीचे क्षेत्र वाढेल असे वाटते. ज्वारी, गहू, हरभरा यांचे पेरक्षेत्र वाढेल. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत शेतकरी रब्बी पिकांची पेरणी करीत आहेत. - डॉ. एन. टी. शिसोदे (सहसंचालक, कृषी विभाग)एकाच वेळी धांदलअनेक ठिकाणी खरीप पिकांच्या काढणीचे आणि रब्बी पिकांच्या पेरणीचे काम जोरात सुरू आहे. यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह शिवारात दिसत आहेत. शिवारे फुलून गेली आहेत. मागणी वाढल्यामुळे मजुरांची चणचण भासत आहे. जादा मजुरी देऊन मजुरांना बोलाविले जात आहे. मजुरांचाही भाव वधारला आहे.